ETV Bharat / city

कोरोना प्रादुर्भाव: संघाचा विजयादशमी कार्यक्रम होणार की नाही; अद्याप निर्णय नाही

author img

By

Published : Sep 28, 2020, 4:35 PM IST

Updated : Sep 28, 2020, 4:42 PM IST

या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच सरसंघचालक मोहन भागवत देशातील राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक सह अनेक विषयांवर भाष्य करत असतात,त्यामुळे या कार्यक्रमाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या वर्षी गेल्या अनेक वर्षाची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थिती कार्यक्रम होणार आहे. त्याच प्रमाणे संघ देखील मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीच शस्त्रपूजन होण्याची शक्यता आहे.

corona pandemic effect on nagpur rss vijay dashmi function
संघाचा विजयादशमी कार्यक्रम होणार की नाही

नागपूर - राज्याची उपराजधानी नागपूर शहर हे बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीकरता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयाकरता ओळखले जाते. सर्वात महत्वाचे म्हण्जे दोन्ही ठिकाणी ऑक्टोबर महिन्यांतच सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमांवर अनिश्चितेचे सावट असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून दीक्षाभूमी येथे १४ ऑक्टोबर आणि विजयादशमीचा कार्यक्रम रद्द करण्याचे जाहीर केले असताना संघाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संघ कार्यक्रमा संदर्भात काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कोरोना प्रादुर्भाव: संघाचा विजयादशमी कार्यक्रम होणार की नाही; अद्याप निर्णय नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला देशातील गणमान्य व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच सरसंघचालक मोहन भागवत देशातील राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक सह अनेक विषयांवर भाष्य करत असतात,त्यामुळे या कार्यक्रमाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या वर्षी गेल्या अनेक वर्षाची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थिती कार्यक्रम होणार आहे. त्याच प्रमाणे संघ देखील मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीच शस्त्रपूजन होण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व अंदाजित आहे, अद्याप संघाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण आहे. संघांच्या पथासंचलनाकडे सुद्धा साऱ्यांचे लक्ष लागेलले असते मात्र कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे तो कार्यक्रम देखील अनिश्चितच आहे.

नागपूर - राज्याची उपराजधानी नागपूर शहर हे बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीकरता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयाकरता ओळखले जाते. सर्वात महत्वाचे म्हण्जे दोन्ही ठिकाणी ऑक्टोबर महिन्यांतच सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमांवर अनिश्चितेचे सावट असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून दीक्षाभूमी येथे १४ ऑक्टोबर आणि विजयादशमीचा कार्यक्रम रद्द करण्याचे जाहीर केले असताना संघाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संघ कार्यक्रमा संदर्भात काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कोरोना प्रादुर्भाव: संघाचा विजयादशमी कार्यक्रम होणार की नाही; अद्याप निर्णय नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला देशातील गणमान्य व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच सरसंघचालक मोहन भागवत देशातील राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक सह अनेक विषयांवर भाष्य करत असतात,त्यामुळे या कार्यक्रमाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या वर्षी गेल्या अनेक वर्षाची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थिती कार्यक्रम होणार आहे. त्याच प्रमाणे संघ देखील मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीच शस्त्रपूजन होण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व अंदाजित आहे, अद्याप संघाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण आहे. संघांच्या पथासंचलनाकडे सुद्धा साऱ्यांचे लक्ष लागेलले असते मात्र कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे तो कार्यक्रम देखील अनिश्चितच आहे.
Last Updated : Sep 28, 2020, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.