ETV Bharat / city

'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!

author img

By

Published : Jan 7, 2020, 4:33 AM IST

हे सरकार खोटारडे आहे, हे जेव्हा तोंड उघडतात तेव्हा खोटंच बोलतात, अशी प्रतिक्रिया बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दिली आहे. ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते. जेएनयूमध्ये पाच जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, मुंबईमध्ये 24 तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे.

This is a liar governmet, Anurag Kashyap Strikes in Mumbai Protest against JNU attack
'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!

मुंबई - हे सरकार खोटारडे आहे, हे जेव्हा तोंड उघडतात तेव्हा खोटंच बोलतात, अशी प्रतिक्रिया बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दिली आहे. ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते. जेएनयूमध्ये पाच जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, मुंबईमध्ये 24 तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे.

'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!

जेएनयूमधील हल्ल्याविरोधात मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही आपला सहभाग नोंदवला. तसेच दुपारी काही नेत्यांनीही या आंदोलकांना भेट दिली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपही या आंदोलनांमध्ये सक्रियरित्या सहभाग घेत आहेत. बांद्र्याला सुरू असलेल्या एका आंदोलनामधून ते 'गेटवे' समोरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाबाजीही केली.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, की आपण ज्या लोकांविरोधात लढत आहोत, ते खरंतर खूपच अशिक्षित आहेत. त्यांना आपल्या अशिक्षित असण्याबद्दल लाज वाटते, म्हणून ते आपण शिक्षित असल्याचा दिखावा करतात. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की या तरुण मुलांची उर्जा पाहून मलाही उर्जा मिळाली. मी बांद्र्यामध्ये आंदोलन करत होतो, इथल्या आंदोलनाचे व्हिडिओ पाहून इथे आलो.

जेएनयूमधील हल्लेखोर सरकारचेच लोक..

जेएनयूमधील प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले, की या घटनेमध्ये अजूनही कोणाला अटक झाली नाही, कारण सरकारला त्यांना अटक करायचीच नाही. ते (हल्लेखोर) हे सरकारचेच लोक होते, हे स्पष्ट आहे. सरकार वेगवेगळ्या विद्यापीठांना वेगवेगळे नियम लागू करत आहे. जामिया विद्यापीठात पोलीस आत शिरून विद्यार्थ्यांना मारहाण करतात, तर जेएनयूच्या वेळी बाहेर उभे राहतात. जिथे सरकारविरोधी आंदोलक आहेत, तिथे पोलीस मारहाण करतात आणि जिथे सरकारचेच लोक मारहाण करत आहेत, तिथे पोलीस शांत उभे राहतात. पोलिसांना सरकार पूर्णपणे ताब्यात ठेवत आहे.

हे खोटारड्यांचं सरकार..

दिल्ली पोलिसांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, अनुराग म्हणाले की ते काय सांगत आहेत ते मला ऐकायचंच नाही. कारण हे सरकार खोटारड्यांचं सरकार आहे. हे सरकार कधी खोटं बोलते असे विचाराल, तर मी सांगतो, की जेव्हा कधी हे सरकार तोंड उघडते, तेव्हा ते खोटं बोलते.

हेही वाचा : हिंदू रक्षा दलाने स्वीकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी; पुन्हा हल्ला करण्याची दिली धमकी

मुंबई - हे सरकार खोटारडे आहे, हे जेव्हा तोंड उघडतात तेव्हा खोटंच बोलतात, अशी प्रतिक्रिया बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दिली आहे. ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते. जेएनयूमध्ये पाच जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, मुंबईमध्ये 24 तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे.

'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!

जेएनयूमधील हल्ल्याविरोधात मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही आपला सहभाग नोंदवला. तसेच दुपारी काही नेत्यांनीही या आंदोलकांना भेट दिली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपही या आंदोलनांमध्ये सक्रियरित्या सहभाग घेत आहेत. बांद्र्याला सुरू असलेल्या एका आंदोलनामधून ते 'गेटवे' समोरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाबाजीही केली.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, की आपण ज्या लोकांविरोधात लढत आहोत, ते खरंतर खूपच अशिक्षित आहेत. त्यांना आपल्या अशिक्षित असण्याबद्दल लाज वाटते, म्हणून ते आपण शिक्षित असल्याचा दिखावा करतात. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की या तरुण मुलांची उर्जा पाहून मलाही उर्जा मिळाली. मी बांद्र्यामध्ये आंदोलन करत होतो, इथल्या आंदोलनाचे व्हिडिओ पाहून इथे आलो.

जेएनयूमधील हल्लेखोर सरकारचेच लोक..

जेएनयूमधील प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले, की या घटनेमध्ये अजूनही कोणाला अटक झाली नाही, कारण सरकारला त्यांना अटक करायचीच नाही. ते (हल्लेखोर) हे सरकारचेच लोक होते, हे स्पष्ट आहे. सरकार वेगवेगळ्या विद्यापीठांना वेगवेगळे नियम लागू करत आहे. जामिया विद्यापीठात पोलीस आत शिरून विद्यार्थ्यांना मारहाण करतात, तर जेएनयूच्या वेळी बाहेर उभे राहतात. जिथे सरकारविरोधी आंदोलक आहेत, तिथे पोलीस मारहाण करतात आणि जिथे सरकारचेच लोक मारहाण करत आहेत, तिथे पोलीस शांत उभे राहतात. पोलिसांना सरकार पूर्णपणे ताब्यात ठेवत आहे.

हे खोटारड्यांचं सरकार..

दिल्ली पोलिसांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, अनुराग म्हणाले की ते काय सांगत आहेत ते मला ऐकायचंच नाही. कारण हे सरकार खोटारड्यांचं सरकार आहे. हे सरकार कधी खोटं बोलते असे विचाराल, तर मी सांगतो, की जेव्हा कधी हे सरकार तोंड उघडते, तेव्हा ते खोटं बोलते.

हेही वाचा : हिंदू रक्षा दलाने स्वीकारली जेएनयू हल्ल्याची जबाबदारी; पुन्हा हल्ला करण्याची दिली धमकी

Intro:Body:

'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!

मुंबई - हे सरकार खो़टारडे आहे, हे जेव्हा तोंड उघडतात तेव्हा खोटंच बोलतात, अशी प्रतिक्रिया बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दिली आहे. ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते. जेएनयूमध्ये पाच जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, मुंबईमध्ये 24 तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे.

जेएनयूमधील हल्ल्याविरोधात मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही आपला सहभाग नोंदवला. तसेच दुपारी काही नेत्यांनीही या आंदोलकांना भेट दिली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपही या आंदोलनांमध्ये सक्रियरित्या सहभाग घेत आहेत. बांद्र्याला सुरू असलेल्या एका आंदोलनामधून ते 'गेटवे' समोरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाबाजीही केली.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, की आपण ज्या लोकांविरोधात लढत आहोत, ते खरंतर खूपच अशिक्षित आहेत. त्यांना आपल्या अशिक्षित असण्याबद्दल लाज वाटते, म्हणून ते आपण शिक्षित असल्याचा दिखावा करतात. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की या तरुण मुलांची उर्जा पाहून मलाही उर्जा मिळाली. मी बांद्र्यामध्ये आंदोलन करत होतो, इथल्या आंदोलनाचे व्हिडिओ पाहून इथे आलो.

जेएनयूमधील हल्लेखोर सरकारचेच लोक...

जेएनयूमधील प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले, की या घटनेमध्ये अजूनही कोणाला अटक झाली नाही, कारण सरकारला त्यांना अटक करायचीच नाही. ते (हल्लेखोर) हे सरकारचेच लोक होते, हे स्पष्ट आहे. सरकार वेगवेगळ्या विद्यापीठांना वेगवेगळे नियम लागू करत आहे. जामिया विद्यापीठात पोलीस आत शिरून विद्यार्थ्यांना मारहाण करतात, तर जेएनयूच्या वेळी बाहेर उभे राहतात. जिथे सरकारविरोधी आंदोलक आहेत, तिथे पोलीस मारहाण करतात आणि जिथे सरकारचेच लोक मारहाण करत आहेत, तिथे पोलीस शांत उभे राहतात. पोलिसांना सरकार पूर्णपणे ताब्यात ठेवत आहे.

हे खोटारड्यांचं सरकार..

दिल्ली पोलिसांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, अनुराग म्हणाले की ते काय सांगत आहेत ते मला ऐकायचंच नाही. कारण हे सरकार खोटारड्यांचं सरकार आहे. हे सरकार कधी खोटं बोलते असे विचाराल, तर मी सांगतो, की जेव्हा कधी हे सरकार तोंड उघडते, तेव्हा ते खोटं बोलते.



हेही वाचा :


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.