ETV Bharat / city

कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यानेच झेडपीच्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला यश- नाना पटोले

author img

By

Published : Oct 7, 2021, 4:38 AM IST

नाना पटोले म्हणाले, की नागपूरमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री, आरएसएसचे मुख्यालय आहे. तेथे भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिलेली आहे. पंचायत समित्यांमध्येही काँग्रेस पक्षच सरस ठरला आहे.

नाना पटोले
नाना पटोले

मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली आहे. ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की लोकशाहीत जनता हीच मोठी असते. जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो. आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करू शकलो. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यापूर्वीही संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला. परंतु मागील काही वर्षात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाची धोरणे ही शेतकरीविरोधी, कामगारविरोधी, बहुजनविरोधी आणि देश विकायला निघालेली आहेत. याला फक्त काँग्रेस पक्षच थोपवू शकतो.

हेही वाचा-वाशिम जिल्हा परिषद महाविकास आघाडीला राखण्यात यश, 52 पैकी 31 जागा

निवडणुकीत यश संपादन केलेल्या उमेदवारांना शुभेच्छा

संविधान, लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करू शकतो ही जनतेची धारणा आहे म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. या यशाबद्दल पटोले यांनी राज्यातील जनता व कार्यकर्ते यांचे आभार मानले. तसेच जिंकणाऱ्या काँग्रेस उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

हेही वाचा-Maharashtra Bandh : लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

काँग्रेसला मतदानाच्या रुपाने भरभरून आशिर्वाद
पुढे नाना पटोले म्हणाले, की नागपूरमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री, आरएसएसचे मुख्यालय आहे. तेथे भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिलेली आहे. पंचायत समित्यांमध्येही काँग्रेस पक्षच सरस ठरला आहे. केंद्रातील सरकार हे महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. नैसर्गिक संकट आलेले असताना गुजरातला एक हजार कोटी रुपये दिले जातात. पण महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली जातात. हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. आजचे यश हे कार्यकर्त्यांचे यश आहे. जनतेनेही काँग्रेसला मतदानाच्या रुपाने भरभरून आशिर्वाद दिला आहे. या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची आणखी उर्जा निर्माण झाली आहे.

हेही वाचा-नंदुरबार जि.प वर महाविकास आघाडीची सत्ता; नंदुरबार व शहादा पंचायत समितीत सत्तांतराची चिन्हे

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार

महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला होता. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यात व केंद्रात काँग्रेस हाच पर्याय आहे. काही लोक काँग्रेसला संपवायचा विचार सातत्याने करत असतात त्यांना जनतेने या निकालातून चोख उत्तर दिलेले आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली आहे. ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की लोकशाहीत जनता हीच मोठी असते. जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो. आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करू शकलो. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यापूर्वीही संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला. परंतु मागील काही वर्षात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाची धोरणे ही शेतकरीविरोधी, कामगारविरोधी, बहुजनविरोधी आणि देश विकायला निघालेली आहेत. याला फक्त काँग्रेस पक्षच थोपवू शकतो.

हेही वाचा-वाशिम जिल्हा परिषद महाविकास आघाडीला राखण्यात यश, 52 पैकी 31 जागा

निवडणुकीत यश संपादन केलेल्या उमेदवारांना शुभेच्छा

संविधान, लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करू शकतो ही जनतेची धारणा आहे म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. या यशाबद्दल पटोले यांनी राज्यातील जनता व कार्यकर्ते यांचे आभार मानले. तसेच जिंकणाऱ्या काँग्रेस उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

हेही वाचा-Maharashtra Bandh : लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

काँग्रेसला मतदानाच्या रुपाने भरभरून आशिर्वाद
पुढे नाना पटोले म्हणाले, की नागपूरमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री, आरएसएसचे मुख्यालय आहे. तेथे भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिलेली आहे. पंचायत समित्यांमध्येही काँग्रेस पक्षच सरस ठरला आहे. केंद्रातील सरकार हे महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. नैसर्गिक संकट आलेले असताना गुजरातला एक हजार कोटी रुपये दिले जातात. पण महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली जातात. हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. आजचे यश हे कार्यकर्त्यांचे यश आहे. जनतेनेही काँग्रेसला मतदानाच्या रुपाने भरभरून आशिर्वाद दिला आहे. या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची आणखी उर्जा निर्माण झाली आहे.

हेही वाचा-नंदुरबार जि.प वर महाविकास आघाडीची सत्ता; नंदुरबार व शहादा पंचायत समितीत सत्तांतराची चिन्हे

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार

महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला होता. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यात व केंद्रात काँग्रेस हाच पर्याय आहे. काही लोक काँग्रेसला संपवायचा विचार सातत्याने करत असतात त्यांना जनतेने या निकालातून चोख उत्तर दिलेले आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.