ETV Bharat / city

धक्कादायक; उपचारासाठी पैसे नसल्याने पीएमसी बँक ग्राहकाचा मृत्यू

author img

By

Published : Oct 18, 2019, 6:20 PM IST

Updated : Oct 18, 2019, 11:37 PM IST

गेल्या काही दिवसात पीएमसी बँक घोटाळा उजेडात आल्यानंतर चौथ्या खातेदाराचा मृत्यू झाला आहे.

पीएमसी बँक ग्राहकाचा मृत्यू

मुंबई - पीएमसी बँकेत झालेल्या घोटाळ्यानंतर ग्राहकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. त्यामुळे उपचारासाठीही पैसे काढता न आल्याने उपचाराअभावी ग्राहकाचा मृत्यू झाल्याचा आरोप बँक ग्रहकाच्या नातेवाईकांनी केला आहे. मुरलीधर धार असे मृत्यू झालेल्या बँकेच्या ग्राहकाचे नाव असून ते मुलूंड परिसरातील रहिवासी आहेत. दरम्यान पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर हा चौथ्या ग्राहकाचा मृत्यू झाला आहे.

मुरलीधर धार यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्यांचे पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत. बँकेतील पैसे काढता न आल्याने मुरलीधर धार यांच्यावर उपचार करता आले नसल्याची माहिती त्यांचा मुलगा प्रेम धार यांनी दिली आहे. पीएमसी बँकेमध्ये मुरलीधर धार यांची मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवी स्वरुपात ठेवण्यात आली होती. मात्र बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे ही रक्कम काढता येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नव्हते. मुरलीधर धार यांना बायपास सर्जरी करण्याची गरज असल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. मात्र, उपचारासाठी पैसे नसल्यामुळे बायपास सर्जरी करता आली नाही. राहत्या घरी मुरलीधर धार यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबई - पीएमसी बँकेत झालेल्या घोटाळ्यानंतर ग्राहकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. त्यामुळे उपचारासाठीही पैसे काढता न आल्याने उपचाराअभावी ग्राहकाचा मृत्यू झाल्याचा आरोप बँक ग्रहकाच्या नातेवाईकांनी केला आहे. मुरलीधर धार असे मृत्यू झालेल्या बँकेच्या ग्राहकाचे नाव असून ते मुलूंड परिसरातील रहिवासी आहेत. दरम्यान पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर हा चौथ्या ग्राहकाचा मृत्यू झाला आहे.

मुरलीधर धार यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्यांचे पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत. बँकेतील पैसे काढता न आल्याने मुरलीधर धार यांच्यावर उपचार करता आले नसल्याची माहिती त्यांचा मुलगा प्रेम धार यांनी दिली आहे. पीएमसी बँकेमध्ये मुरलीधर धार यांची मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवी स्वरुपात ठेवण्यात आली होती. मात्र बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे ही रक्कम काढता येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नव्हते. मुरलीधर धार यांना बायपास सर्जरी करण्याची गरज असल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. मात्र, उपचारासाठी पैसे नसल्यामुळे बायपास सर्जरी करता आली नाही. राहत्या घरी मुरलीधर धार यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Intro:पीएमसी बँक झालेला घोटल्यानंतर यासंदर्भात आणखीन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .मुंबईतील मुलुंड परिसरात राहणारे मुरलीधर धार या व्यक्तीचा बायपास सर्जरी न झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. गेल्या काही दिवसात पीएमसी बँक ग्राहकाचा हा झालेला 4 था मृत्यू आहे.

Body:पीएमसी बँकेमध्ये पैसे अडकल्यामुळे उपचार करता आले नाहीत असे मुरलीधर यांचा मुलगा प्रेम धार यांनी म्हटले आहे . पीएमसी बँक मध्ये मुरलीधर धार यांची मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवी स्वरुपात ठेवण्यात आलेली होती. मात्र बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे ही रक्कम काढता येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नव्हते. मुरलीधर धार यांना बायपास सर्जरी करण्याची गरज असल्याचं त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं मात्र उपचारासाठी पैसे नसल्यामुळे बायपास सर्जरी करता आली नाही आणि राहत्या घरी मुरलीधर धार यांचा मृत्यू झाला आहे. Conclusion:
Last Updated : Oct 18, 2019, 11:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.