ETV Bharat / city

शेतकऱ्यांना दिलेलं वचन सरकार विसरलं... कर्जमाफीवरून निशाणा

author img

By

Published : Mar 14, 2020, 8:28 PM IST

कर्जमाफीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सरसकट कर्जमाफी करू असे सरकार म्हणाले होते, असे आश्वासन सरकारने दिले होते. तेही त्यांनी पाळले नाही. एका गावातल्या 25 ते 30 टक्के शेतकऱ्यांची नावे नाहीत. दुसरीकडे सीएए, एनआरसी, एनपीआरबाबत आम्ही प्रस्ताव दाखल केला होता, सरकारने तो चर्चेला घेतला नाही.

कर्जमाफीवरून त्यांनी सरकारवर निशाणा
कर्जमाफीवरून त्यांनी सरकारवर निशाणा

मुंबई - शेतकऱ्यांना दिलेलं वचन सरकार विसरलं. ९४ हजार हेक्टवरच्या शेतकऱ्यांना सरकारनं पैसा दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधिमंडळाचे कामकाज संस्थगित झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कर्जमाफीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सरसकट कर्जमाफी करू असे सरकार म्हणाले होते, असे आश्वासन सरकारने दिले होते. तेही त्यांनी पाळले नाही. एका गावातल्या 25 ते 30 टक्के शेतकऱ्यांची नावे नाहीत. दुसरीकडे सीएए, एनआरसी, एनपीआरबाबत आम्ही प्रस्ताव दाखल केला होता, पण सरकारने तो चर्चेला घेतला नाही.

कोणतीही भूमिका न घेता आंदोलने सुरू ठेवून सरकारी पक्ष अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेवून काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकारमध्येच विसंवाद असल्याचे या अधिवेशनात स्पष्ट झाले. परिषदेत मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा मांडला. बाहेर आल्यावर मुख्यमंत्री अशी कोणती चर्चाच झाली नसल्याचे सांगतात, असेही फडणवीस म्हणाले.

मुंबई - शेतकऱ्यांना दिलेलं वचन सरकार विसरलं. ९४ हजार हेक्टवरच्या शेतकऱ्यांना सरकारनं पैसा दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधिमंडळाचे कामकाज संस्थगित झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कर्जमाफीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सरसकट कर्जमाफी करू असे सरकार म्हणाले होते, असे आश्वासन सरकारने दिले होते. तेही त्यांनी पाळले नाही. एका गावातल्या 25 ते 30 टक्के शेतकऱ्यांची नावे नाहीत. दुसरीकडे सीएए, एनआरसी, एनपीआरबाबत आम्ही प्रस्ताव दाखल केला होता, पण सरकारने तो चर्चेला घेतला नाही.

कोणतीही भूमिका न घेता आंदोलने सुरू ठेवून सरकारी पक्ष अल्पसंख्याकांच्या मतावर डोळा ठेवून काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकारमध्येच विसंवाद असल्याचे या अधिवेशनात स्पष्ट झाले. परिषदेत मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा मांडला. बाहेर आल्यावर मुख्यमंत्री अशी कोणती चर्चाच झाली नसल्याचे सांगतात, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - इराणहून आलेले 44 भारतीय घाटकोपरच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली

हेही वाचा - कोरोनाची धास्ती : राज्यातील शाळा-महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.