ETV Bharat / city

Aarey Forest Argument : पुन्हा पेटला आरे जंगल वादाचा वणवा; पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन

नवीन सरकार राज्यात येताच ,आरे (Aarey Forest Argument) मधील मेट्रो-3 च्या कामाला पुन्हा एकदा गती आली. नविन सरकारच्या या निर्णया विरोधात आरे येथील पिकनिक पॉईंट जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत आवाज उठविला आहे. तर माजी पर्यावरण मंत्री व आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray joined the agitation in this Aarey)देखील या आरेतील आंदोलनात सहभागी झालेत.

author img

By

Published : Jul 10, 2022, 4:08 PM IST

Aarey Forest
आरे जंगल

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर काही तासात लगेचच आरे (Aarey Forest Argument) मधील मेट्रो-3 च्या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचे आदेश दिले. यामुळे पुन्हा एकदा आरे जंगलात वादाचा वणवा पेटला आहे. नविन सरकारच्या या निर्णया विरोधात आज आरे येथील पिकनिक पॉईंट जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत आवाज उठविला आहे. माजी पर्यावरण मंत्री व आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray joined the agitation in this Aarey) देखील या आरेतील आंदोलनात सहभागी होत मेट्रो कारशेडला विरोध केला आहे.


आम्हाला मुंबईतील ही जैवविवीधता वाचवायची आहे: यासंदर्भात बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “या नवीन सरकारला आमच्याबद्दल काही राग किंवा नाराजी असेल तर त्यांनी ती मुंबईकरांवर काढू नये. आरेची लढाई ही मुंबईची लढाई आहे, ती आपल्या देशाच्या, आपल्या जंगलांसाठीची लढाई आहे. आम्ही सरकारमध्ये असताना या आरेतील 808 एकर इतका परिसर जंगल घोषित केला. महानगरातील जैवविविधता वाचवण्यासाठी या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास बिबट्या वारंवार दिसतो. आरेशी संबंधित विरोध हा केवळ 2,700 हून अधिक झाडे वाचवण्यासाठी नाही. तर हा जैवविविधतेशी संबंधित विषय आहे. आम्हाला मुंबईतील ही जैवविवीधता वाचवायची आहे.” अशी प्रतिक्रिया युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.


आरे मुंबईचं फुफुस: आरेच्या हे 1,800 एकर वनक्षेत्र 'मुंबईचे फुफुस' म्हणून ओळख जाते. आरेच्या जंगलात बिबट्यांशिवाय जवळपास 300 प्रजातींचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडलेले आहे. इथं मुंबईच्या कानाकोपऱ्यातील लोक शनिवार रविवारी स्वच्छ प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या मते, जंगले केवळ शहरातील लोकांना ताजी हवा देत नाहीत. तर वन्यजीवांसाठी एक प्रमुख स्थानिक अधिवास देखील आहेत. या जंगलात सुमारे पाच लाख झाडे असून अनेक नद्या आणि तलाव येथून जातात.


2014 पासून आरे वादात : आरेमध्ये मेट्रो-3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव प्रथम 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. ज्याला स्थानिक एनजीओ वनशक्तीने, मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर फडणवीस यांनीही हाच प्रस्ताव पुढे केला. मात्र कारशेडसाठी आरेतील झाडे तोडण्यास कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. मग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कारशेडसाठी कांजूर मार्ग निवडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कांजूर मार्गाऐवजी आरे कॉलनीत कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच राज्याचे महाधिवक्ता आणि प्रशासनाला दिले.


दरम्यान, 2019 मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथे मेट्रो कारशेडला स्थगिती आणली. आरे येतील जंगलाला संरक्षित वनाचा दर्जा दिला. व मेट्रो तीनच्या कामासाठी कांजूर मार्ग पूर्व उपनगरात मेट्रो-3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा निर्णय कायदेशीर वादात अडकला. आता या सर्वांवर शिंदे फडणवीस सरकार नेमकं काय निर्णय घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Rain Update : पुढच्या २४ तासांसाठी मुंबई अलर्टवर, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर काही तासात लगेचच आरे (Aarey Forest Argument) मधील मेट्रो-3 च्या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचे आदेश दिले. यामुळे पुन्हा एकदा आरे जंगलात वादाचा वणवा पेटला आहे. नविन सरकारच्या या निर्णया विरोधात आज आरे येथील पिकनिक पॉईंट जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत आवाज उठविला आहे. माजी पर्यावरण मंत्री व आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray joined the agitation in this Aarey) देखील या आरेतील आंदोलनात सहभागी होत मेट्रो कारशेडला विरोध केला आहे.


आम्हाला मुंबईतील ही जैवविवीधता वाचवायची आहे: यासंदर्भात बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “या नवीन सरकारला आमच्याबद्दल काही राग किंवा नाराजी असेल तर त्यांनी ती मुंबईकरांवर काढू नये. आरेची लढाई ही मुंबईची लढाई आहे, ती आपल्या देशाच्या, आपल्या जंगलांसाठीची लढाई आहे. आम्ही सरकारमध्ये असताना या आरेतील 808 एकर इतका परिसर जंगल घोषित केला. महानगरातील जैवविविधता वाचवण्यासाठी या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास बिबट्या वारंवार दिसतो. आरेशी संबंधित विरोध हा केवळ 2,700 हून अधिक झाडे वाचवण्यासाठी नाही. तर हा जैवविविधतेशी संबंधित विषय आहे. आम्हाला मुंबईतील ही जैवविवीधता वाचवायची आहे.” अशी प्रतिक्रिया युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.


आरे मुंबईचं फुफुस: आरेच्या हे 1,800 एकर वनक्षेत्र 'मुंबईचे फुफुस' म्हणून ओळख जाते. आरेच्या जंगलात बिबट्यांशिवाय जवळपास 300 प्रजातींचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडलेले आहे. इथं मुंबईच्या कानाकोपऱ्यातील लोक शनिवार रविवारी स्वच्छ प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या मते, जंगले केवळ शहरातील लोकांना ताजी हवा देत नाहीत. तर वन्यजीवांसाठी एक प्रमुख स्थानिक अधिवास देखील आहेत. या जंगलात सुमारे पाच लाख झाडे असून अनेक नद्या आणि तलाव येथून जातात.


2014 पासून आरे वादात : आरेमध्ये मेट्रो-3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव प्रथम 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. ज्याला स्थानिक एनजीओ वनशक्तीने, मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर फडणवीस यांनीही हाच प्रस्ताव पुढे केला. मात्र कारशेडसाठी आरेतील झाडे तोडण्यास कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. मग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कारशेडसाठी कांजूर मार्ग निवडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कांजूर मार्गाऐवजी आरे कॉलनीत कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच राज्याचे महाधिवक्ता आणि प्रशासनाला दिले.


दरम्यान, 2019 मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथे मेट्रो कारशेडला स्थगिती आणली. आरे येतील जंगलाला संरक्षित वनाचा दर्जा दिला. व मेट्रो तीनच्या कामासाठी कांजूर मार्ग पूर्व उपनगरात मेट्रो-3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा निर्णय कायदेशीर वादात अडकला. आता या सर्वांवर शिंदे फडणवीस सरकार नेमकं काय निर्णय घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Rain Update : पुढच्या २४ तासांसाठी मुंबई अलर्टवर, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.