मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी 'गंगाने बुलाया है' असे म्हटले होते. मात्र, पंतप्रधान होऊन साडेसात वर्ष होऊन गेली. परंतु अजूनपर्यंत गंगा नदी स्वच्छ झालेली नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik slammed PM over Ganga cleanness ) यांनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी येथे केलेल्या कार्यक्रवर ( NCP slammed after PM programs in Kashi ) राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे ते निवडणूकीचे क्षेत्र आहे. केंद्रात मोदी सरकार येऊन साडेसात वर्षे झाली आहेत. मात्र, काशीच्याबाबतीतदेखील पंतप्रधानांनी दिलेले आश्वासने अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. पावसाळ्यात संपूर्ण काशीमध्ये गुडघाभर पाणी भरते, यावर अद्यापही उपाय योजना करण्यात आलेली नाही, यावरही नवाब मलिक यांनी बोट ठेवले. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंतप्रधानांना निवडणूक क्षेत्र आणि आजूबाजूच्या कमीत कमी चार ठिकाणी पराभव पत्करावा लागणार आहे. ज्याठिकाणी ते निवडणूक लढतात तिथे आणि आजूबाजूच्या ४ जागाही निवडून येणार नाहीत, असा टोला अल्पसंख्यांक मंत्री मलिक ( Nawab Malik takes jibe at PM ) यांनी लगावला आहे.
हेही वाचा-Soldier Shoots Self : कुपवारामध्ये जवानाची स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या
सामूहिक नेतृत्वाखाली एकजूट होण्याची तयारी
केंद्रातील आघाडीबाबत चर्चा सुरू असताना देशाचे पंतप्रधान कोण होतील हा विषय महत्वाचा नाही. तर सामूहिक नेतृत्वाखाली एकजूट होण्याची तयारी सुरू आहे. प्रशांत किशोर हे रणनीतीकार आहेत. ते जे ठरवतील तेच होईल असे नाही. देशात २०१४ मध्ये युपीएच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले होते. तसेच ( Nawab Malik over opposition alliance ) मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा-BMC Election : शिवसेना-काँग्रेससोबत जायला तयार पण, एमआयएमसोबत नाही - प्रकाश आंबेडकर
त्या आक्षेपार्ह या शब्दाचा वापर योगी यांनीही केला
खासदार संजय राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील 'त्या' शब्दाचा प्रयोग केला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा भाजप कधी दाखल करणार ? हा प्रश्न नवाब मलिक ( NCP leader demand case against UP CM ) यांनी उपस्थित केला. ज्या पत्रकाराबाबत शब्द वापरला त्यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.
काशीच्या दौऱ्यात पंतप्रधान काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण केले ( Kashi Vishwanath Corridor inauguration ). यावेळी हे भव्य धाम भाविकांना गतवैभवाची अनुभुती करून देईल. आता मी बाबांबरोबरच कालभैरवजीचे दर्शन करून आलो आहे, देशावासीयांसाठी त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दहशतवाद्यांनी या शहरावर हल्ले केले. औरंगजेबने तलवारीच्या सहाय्याने सभ्यता चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाची माती वेगळीच आहे. इकडे औरंगजेब आल्यास शिवाजी उठून उभे होतात. आज काळाचे चक्र पाहा, दहशतवादाचे ते पर्याय इतिहासाच्या काळ्या पानात बंदिस्त झाले आहेत. आणि माझी काशी पुढे जात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.