ETV Bharat / city

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना तूर्तास उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही!

author img

By

Published : Sep 29, 2021, 7:05 PM IST

ईडीने पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिले आहे. तसेच समन्स बजावण्यात आल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशमुखाना तातडीचा कोणताही दिलासा न देता न्यायालयाने त्यांची याचिका सुनावणीसाठी 29 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली होती.

अनिल देशमुख
अनिल देशमुख

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होण्याचे चिन्ह नाहीत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात वारंवार समन्स बजावण्यात आल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज (बुधवारी) दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयात ईडी कारवाई विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. पुढील आठवड्यात नव्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला नाही.

याचिका ऐकण्यास नकार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखावर झालेल्या आरोपांचा तपास सध्या ईडीकडूनही सुरु आहे. याप्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. याशिवाय परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी प्राथमिक चौकशी व आवश्यक असल्यास कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. आतापर्यंत ईडीने पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिले आहे. तसेच समन्स बजावण्यात आल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशमुखाना तातडीचा कोणताही दिलासा न देता न्यायालयाने त्यांची याचिका सुनावणीसाठी 29 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली होती. आता दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयातही याचिकेवर सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. पुढील आठवड्यात नव्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार आहे.

काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्याआधारे सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासान्वये 'ईडी'ने सुद्धा पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत 'ईडी'ने आत्तापर्यंत पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्स देखील बजावण्याची तयारी 'ईडी'ने केली आहे, पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. आता देशमुखांनी न्यायालयीन लढाई सुरु केली आहे.

हेही वाचा - सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी; विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळला!

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होण्याचे चिन्ह नाहीत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात वारंवार समन्स बजावण्यात आल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज (बुधवारी) दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयात ईडी कारवाई विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. पुढील आठवड्यात नव्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला नाही.

याचिका ऐकण्यास नकार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखावर झालेल्या आरोपांचा तपास सध्या ईडीकडूनही सुरु आहे. याप्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. याशिवाय परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी प्राथमिक चौकशी व आवश्यक असल्यास कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. आतापर्यंत ईडीने पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिले आहे. तसेच समन्स बजावण्यात आल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशमुखाना तातडीचा कोणताही दिलासा न देता न्यायालयाने त्यांची याचिका सुनावणीसाठी 29 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली होती. आता दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयातही याचिकेवर सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. पुढील आठवड्यात नव्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार आहे.

काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्याआधारे सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासान्वये 'ईडी'ने सुद्धा पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत 'ईडी'ने आत्तापर्यंत पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्स देखील बजावण्याची तयारी 'ईडी'ने केली आहे, पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. आता देशमुखांनी न्यायालयीन लढाई सुरु केली आहे.

हेही वाचा - सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी; विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळला!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.