ETV Bharat / city

Maharashtra Bandh : संसदेत कृषी विधेयक मंजूर होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? - मनसे

लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या विरोधात राज्यात महाविकास आघाडीने बंदची हाक दिली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जेव्हा शेतकरी कायदा संसदेत पास झाला त्यावेळी महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का?, असा सवाल उपस्थित केला आहे.

author img

By

Published : Oct 11, 2021, 4:41 PM IST

Updated : Oct 11, 2021, 4:51 PM IST

Maharashtra bandh
Maharashtra bandh

मुंबई - लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या विरोधात राज्यात महाविकास आघाडीने बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील छोट्या-मोठ्या पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र विरोध केला आहे. मनसेने देखील या बंदवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जेव्हा शेतकरी कायदा संसदेत पास झाला त्यावेळी महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? हे महाविकास आघाडीने सांगावे, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे
आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. सणसूद जवळ आलेली आहे. यामुळे काहीसा व्यापार करण्याची संधी व्यापारांना मिळत आहे. मात्र असे असताना हा बंद करणे योग्य आहे का ? हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद आहे. पोलीस लोकांची दुकाने बंद करीत आहेत. ही कुठली पद्धत? मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला का ? असा सवाल देखील देशपांडे यांनी विचारला आहे. शिवसेनेत आता ताकद उरली नाही म्हणून पोलीस वापरावे लागत आहेत. पोलीस दुकाने बंद करीत आहेत, अशी परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रात कधी दिसली नव्हती, असेही देशपांडें म्हणाले.

हे ही वाचा - ठरलं! शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार

भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केला आहे. हा योगायोग नाही. ज्यावेळी भाजप चुकले तेव्हाही राज ठाकरे भाजप विरोधात बोलले आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले.

मुंबई - लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या विरोधात राज्यात महाविकास आघाडीने बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील छोट्या-मोठ्या पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र विरोध केला आहे. मनसेने देखील या बंदवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जेव्हा शेतकरी कायदा संसदेत पास झाला त्यावेळी महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? हे महाविकास आघाडीने सांगावे, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे
आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. सणसूद जवळ आलेली आहे. यामुळे काहीसा व्यापार करण्याची संधी व्यापारांना मिळत आहे. मात्र असे असताना हा बंद करणे योग्य आहे का ? हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद आहे. पोलीस लोकांची दुकाने बंद करीत आहेत. ही कुठली पद्धत? मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला का ? असा सवाल देखील देशपांडे यांनी विचारला आहे. शिवसेनेत आता ताकद उरली नाही म्हणून पोलीस वापरावे लागत आहेत. पोलीस दुकाने बंद करीत आहेत, अशी परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रात कधी दिसली नव्हती, असेही देशपांडें म्हणाले.

हे ही वाचा - ठरलं! शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार

भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केला आहे. हा योगायोग नाही. ज्यावेळी भाजप चुकले तेव्हाही राज ठाकरे भाजप विरोधात बोलले आहेत, असेही देशपांडे यांनी सांगितले.

Last Updated : Oct 11, 2021, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.