मुंबई - 1992 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील ( Mumbai Bomb Blast Case 1992 ) आरोपींच्या माफीसाठी ( Apology For Bomb Blast Accused ) राष्ट्रपतींकडे पत्र लिहिणारे आमदार (MLA Letter To President ) आजही विधानसभेत आहेत. अशा आमदारांना विधानसभेच्या बाहेर काढावे, अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा ( MLA Mangal Prabhat Lodha ) यांनी विधानसभेत ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.
रझा अकादमीला कोण संरक्षण देत आहे
राज्यातील आणि मुंबईतील एकूणच परिस्थितीवरून हिंदू समाज घाबरलेला आहे सनातन संस्थेवर बंदी घालण्याची चर्चा सभागृहात होते मात्र त्याच वेळेस रझा अकादमीवर बंदी ( Ban Raza Academy ) घालण्याची कोणतीही चर्चा सभागृहात का होत नाही. रझा अकादमीला कोण संरक्षण देत आहे. असा सवाल लोढा यांनी सभागृहात उपस्थित केला.
वक्फ बोर्डाच्या जमिनी कुणी लाटल्या?
नवरात्री आणि गणेशोत्सवावर ( Navratri Ganeshotsav ) कोरोना महामारीचे कारण सांगत निर्बंध लादले जातात. मात्र दर शुक्रवारी रस्त्यावर पडल्या जाणाऱ्या नमाजवर कोणतेही प्रतिबंधक का लावले जात नाही? अशी विचारणा त्यांनी केली. मुंबईतील कोळी भगिनींचा मत्स्य विक्रीचा व्यवसाय कोणी हिसकावून घेतला आहे, याची सरकारने एकदा चौकशी करावी. वक्फ बोर्डाच्या हजारो एकर जमिनी ( Waqf Board Lands ) कोणी लाटल्या याचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी लोढा यांनी सभागृहात केली.