ETV Bharat / city

राष्ट्रवादी महापुरुषांचा वारसा शेवटपर्यंत जपणार - जयंत पाटील

author img

By

Published : Jun 10, 2020, 10:34 PM IST

राज्यावर एकामागून एक संकट येत आहेत. काल परवा कोकणात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे झोकून काम करावे. लोकांच्या मदतीला धावून जावे, आपण कोकणाला पुन्हा उभे करू, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मंत्री जयंत पाटील
मंत्री जयंत पाटील

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा, धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा जपला आहे आणि शेवटपर्यंत तो जपला जाणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यावर एकामागून एक संकट येत आहेत. काल परवा कोकणात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे झोकून काम करावे. लोकांच्या मदतीला धावून जावे, आपण कोकणाला पुन्हा उभे करू, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

२०१९ निवडणूक ही अभूतपूर्व होती. अनेकांना पवार साहेबांनी सर्व काही दिले मात्र ते पक्ष सोडून गेले. पक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र, आपला पक्ष पुन्हा उठून उभा राहिला. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पराभव केला आहे, याची आठवण जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. आपल्याला सर्वच घटकांसाठी काम करायचे आहे, म्हणून आपण सामाजिक न्याय हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतले. त्यामाध्यमातून आपल्याला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. तशाप्रकारे कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार निवडून आला आहे. येत्या काळात आपल्याला मुंबईत पक्ष मजबूत करायचा आहे. औरंगाबाद, नवी मुंबई, ठाणे इतर शहरातही निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांनी त्यासाठी आतापासूनच तयार रहावे. ग्रामपंचायत निवडणुकाही येणार आहेत त्यासाठीही सज्ज व्हावे. आज वर्धापनदिनीही पवारसाहेब कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणाने कधी पवारसाहेबांची साथ सोडली नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा आपल्या त्या कार्यकर्त्यांशी जोडलं जायचे आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस ही युवकांच्या हातात द्यायची आहे. आम्ही तिशीत असताना आदरणीय पवारसाहेबांनी आमच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या. आम्ही त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या याची आठवण जयंत पाटील यांनी सांगितली. तेव्हा युवकांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी युवकांना केले. आज आपल्या ५४ जागा निवडून आल्या आहेत, त्या जागा आपल्याला १०० च्या पलिकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोरोनाची महामारी संपली की, आम्ही सर्वच नेते राज्याचा दौरा करणार आहोत. आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायची आहे. पवारसाहेबांचे विचार घरोघरी पोहोचवायचे आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांनाच प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

या संकटाच्या काळात अनेक कोविड योद्धा फिल्डवर जाऊन काम करत आहेत. पोलीस बांधव असतील, डॉक्टर असतील, आरोग्य सेवक असतील, सफाई कर्मचारी असतील, आशा वर्कर्स असतील सर्वच जण मोठ्या चिकाटीने या युद्धात लढत आहेत. आज सावित्रीबाई फुलेंची आठवण होत आहे. प्लेगची साथ होती त्यावेळी सावित्रीबाई अशाचप्रकारे लोकांची सेवा करत होत्या. लोकांची सेवा करताना प्रसंगी त्यांना प्लेगमुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र, त्या मागे हटल्या नाहीत. म्हणून आता जे कोणी लढा देत आहेत. त्यांच्याप्रतीही जयंत पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा, धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा जपला आहे आणि शेवटपर्यंत तो जपला जाणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यावर एकामागून एक संकट येत आहेत. काल परवा कोकणात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे झोकून काम करावे. लोकांच्या मदतीला धावून जावे, आपण कोकणाला पुन्हा उभे करू, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

२०१९ निवडणूक ही अभूतपूर्व होती. अनेकांना पवार साहेबांनी सर्व काही दिले मात्र ते पक्ष सोडून गेले. पक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र, आपला पक्ष पुन्हा उठून उभा राहिला. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पराभव केला आहे, याची आठवण जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. आपल्याला सर्वच घटकांसाठी काम करायचे आहे, म्हणून आपण सामाजिक न्याय हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतले. त्यामाध्यमातून आपल्याला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. तशाप्रकारे कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार निवडून आला आहे. येत्या काळात आपल्याला मुंबईत पक्ष मजबूत करायचा आहे. औरंगाबाद, नवी मुंबई, ठाणे इतर शहरातही निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांनी त्यासाठी आतापासूनच तयार रहावे. ग्रामपंचायत निवडणुकाही येणार आहेत त्यासाठीही सज्ज व्हावे. आज वर्धापनदिनीही पवारसाहेब कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणाने कधी पवारसाहेबांची साथ सोडली नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा आपल्या त्या कार्यकर्त्यांशी जोडलं जायचे आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस ही युवकांच्या हातात द्यायची आहे. आम्ही तिशीत असताना आदरणीय पवारसाहेबांनी आमच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या. आम्ही त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या याची आठवण जयंत पाटील यांनी सांगितली. तेव्हा युवकांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी युवकांना केले. आज आपल्या ५४ जागा निवडून आल्या आहेत, त्या जागा आपल्याला १०० च्या पलिकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोरोनाची महामारी संपली की, आम्ही सर्वच नेते राज्याचा दौरा करणार आहोत. आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायची आहे. पवारसाहेबांचे विचार घरोघरी पोहोचवायचे आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांनाच प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

या संकटाच्या काळात अनेक कोविड योद्धा फिल्डवर जाऊन काम करत आहेत. पोलीस बांधव असतील, डॉक्टर असतील, आरोग्य सेवक असतील, सफाई कर्मचारी असतील, आशा वर्कर्स असतील सर्वच जण मोठ्या चिकाटीने या युद्धात लढत आहेत. आज सावित्रीबाई फुलेंची आठवण होत आहे. प्लेगची साथ होती त्यावेळी सावित्रीबाई अशाचप्रकारे लोकांची सेवा करत होत्या. लोकांची सेवा करताना प्रसंगी त्यांना प्लेगमुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र, त्या मागे हटल्या नाहीत. म्हणून आता जे कोणी लढा देत आहेत. त्यांच्याप्रतीही जयंत पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.