ETV Bharat / city

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करा, विधिमंडळाच्या दिशेने कर्मचाऱ्यांचा लॉंगमार्च

author img

By

Published : Dec 24, 2021, 3:49 PM IST

शासकीय सेवेत (Government Servent) 2005 पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना (Government Employees Pension) निवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने वृद्धपकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून संबधित कर्मचारी आंदोलन करत आहेत. जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

old pension scheme
old pension scheme

मुंबई - राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी विविध संघटना मुंबईच्या वेशीवर धडकल्या आहेत. शासकीय सेवेत 2005 पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बंद (Old Pension Scheme) करण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय सेवेत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने वृद्धपकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. यासाठी पेन्शनर संघटनेच्या वतीने विधानपरिषदेवर मोर्चा (Protest for Old Pension Scheme) काढण्यात आलेला आहे. मात्र या मोर्चाला मुलुंड जकात नाका येथे अडवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहेत. मात्र कर्मचारी आक्रमक पवित्र्यात आहेत.

विधिमंडळाच्या दिशेने कर्मचाऱ्यांचा लॉंगमार्च
शासनाने या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांच्या समितीचे समन्वयक वितेश खांडेकर यांनी केली आहे. आतापर्यंत चार हजार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा रोष विविध शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असल्याने त्यांना न्याय मागण्यासाठी निर्वाणीचा लढा देण्यात येत आहे. त्यामुळेच विधिमंडळावर लॉन्ग मार्च काढला असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी विधानभवनावर शासकीय कर्मचाऱ्यांनी पेन्शन मार्च (Old Pension Scheme) आयोजित केला आहे.

भिवंडीपासून निघालेला हा मोर्चा काल रात्री मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर टोल नाका येथे पोहोचला. या ठिकाणी पोलिसांनी हा मोर्चा अडविला आहे. आज सकाळी हे आंदोलक विधी मंडळाकडे कूच करणार आहेत, त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आले आहे. पोलीस या आंदोलकांना बसने आझाद मैदानाकडे घेऊन जाण्यास तयार आहेत. परंतु आंदोलक मात्र पायी जाण्यावर ठाम आहेत, या आंदोलकांना भेट देण्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी हे सुद्धा आले होते

मुंबई - राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी विविध संघटना मुंबईच्या वेशीवर धडकल्या आहेत. शासकीय सेवेत 2005 पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बंद (Old Pension Scheme) करण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय सेवेत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने वृद्धपकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. यासाठी पेन्शनर संघटनेच्या वतीने विधानपरिषदेवर मोर्चा (Protest for Old Pension Scheme) काढण्यात आलेला आहे. मात्र या मोर्चाला मुलुंड जकात नाका येथे अडवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहेत. मात्र कर्मचारी आक्रमक पवित्र्यात आहेत.

विधिमंडळाच्या दिशेने कर्मचाऱ्यांचा लॉंगमार्च
शासनाने या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांच्या समितीचे समन्वयक वितेश खांडेकर यांनी केली आहे. आतापर्यंत चार हजार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा रोष विविध शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असल्याने त्यांना न्याय मागण्यासाठी निर्वाणीचा लढा देण्यात येत आहे. त्यामुळेच विधिमंडळावर लॉन्ग मार्च काढला असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी विधानभवनावर शासकीय कर्मचाऱ्यांनी पेन्शन मार्च (Old Pension Scheme) आयोजित केला आहे.

भिवंडीपासून निघालेला हा मोर्चा काल रात्री मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर टोल नाका येथे पोहोचला. या ठिकाणी पोलिसांनी हा मोर्चा अडविला आहे. आज सकाळी हे आंदोलक विधी मंडळाकडे कूच करणार आहेत, त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आले आहे. पोलीस या आंदोलकांना बसने आझाद मैदानाकडे घेऊन जाण्यास तयार आहेत. परंतु आंदोलक मात्र पायी जाण्यावर ठाम आहेत, या आंदोलकांना भेट देण्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी हे सुद्धा आले होते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.