ETV Bharat / city

गौतम नवलखा यांची जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल - Gautam Navlakha file petition in supreme court

सामाजिक कार्यकर्ते आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. या आदेशाला गौतम नवलाखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

गौतम नवलखा
गौतम नवलखा
author img

By

Published : Mar 1, 2021, 10:40 PM IST

मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचारामधील आरोपी व सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 167 (2) नुसार राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) 90 दिवसांच्या मर्यादेमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात अपयशी ठरली आहे. या कारणावरून नवलखा यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. या आदेशाला गौतम नवलाखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हेही वाचा-अँटिलिया प्रकरण : अंबानी कुटुंबियांना जैश-उल-हिंदने धमकी दिली नाही; टेलीग्रामवर खुलासा


90 दिवसांच्या आत एनआयएने आरोपपत्र दाखल केले नाही-

तपास यंत्रणांकडून 90 दिवसांच्या आ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते. त्यामुळे भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलाखा यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गौतम नवलखा यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले होते, 'ऑगस्ट 2018 मध्ये गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांना तब्बल एक महिना घरामध्ये नजर कैद ठेवण्यात आलेले होते. त्यानंतर त्यांना तुरुंगामध्ये पाठवल्यानंतर जवळपास शंभर दिवसाहून अधिक दिवस त्यांनी तुरुंगात काढलेले आहेत. याप्रकरणी तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. यानंतर लागणारा अधिकचा वेळ हा 100 दिवसानंतर न्यायालयात एनआयएने मागून घेतला होता.

हेही वाचा-धक्कादायक : कोविड रुग्णालयात कोरोना बाधित महिलेशी अश्लील चाळे, वार्डबॉयवर गुन्हा दाखल

मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचारामधील आरोपी व सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 167 (2) नुसार राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) 90 दिवसांच्या मर्यादेमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात अपयशी ठरली आहे. या कारणावरून नवलखा यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. या आदेशाला गौतम नवलाखा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हेही वाचा-अँटिलिया प्रकरण : अंबानी कुटुंबियांना जैश-उल-हिंदने धमकी दिली नाही; टेलीग्रामवर खुलासा


90 दिवसांच्या आत एनआयएने आरोपपत्र दाखल केले नाही-

तपास यंत्रणांकडून 90 दिवसांच्या आ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते. त्यामुळे भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलाखा यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गौतम नवलखा यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले होते, 'ऑगस्ट 2018 मध्ये गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांना तब्बल एक महिना घरामध्ये नजर कैद ठेवण्यात आलेले होते. त्यानंतर त्यांना तुरुंगामध्ये पाठवल्यानंतर जवळपास शंभर दिवसाहून अधिक दिवस त्यांनी तुरुंगात काढलेले आहेत. याप्रकरणी तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. यानंतर लागणारा अधिकचा वेळ हा 100 दिवसानंतर न्यायालयात एनआयएने मागून घेतला होता.

हेही वाचा-धक्कादायक : कोविड रुग्णालयात कोरोना बाधित महिलेशी अश्लील चाळे, वार्डबॉयवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.