ETV Bharat / city

Election Commission Proposal : एका उमेदवाराने दोन जागेवरून निवडणूक लढवण्यास बंदी, निवडणूक आयोगाचा केंद्राकडे प्रस्ताव

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एकाच उमेदवाराने दोन किंवा त्यापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवू नये हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तसेच निवडणूक जाहीर झाल्यानंतर जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर दाखवण्यास बंदी आणणे याबाबतचे प्रस्तावही केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवले आहेत.

author img

By

Published : Jun 14, 2022, 1:54 PM IST

Election Commission
संग्रहित छायाचित्र

मुंबई - एकाच उमेदवाराने दोन किंवा त्यापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवू नये, याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. नवनिर्वाचित मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तसेच काही महत्त्वाचे बदल ही राजकुमार यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात दिले आहेत.

जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर दाखवण्यास बंदी - नव मतदाराचे मतदार कार्ड लिंक असणे. तसेच निवडणूक जाहीर झाल्यानंतर जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर दाखवण्यास बंदी आणणे याबाबतचे प्रस्तावही केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित केल्या जाऊ नयेत, याबाबतचा महत्वाचा प्रस्ताव दिल्याने केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे.

एका उमेदवाराने दोन जागेवरून निवडणूक लढवण्यास बंदी - केंद्र सरकारने हे बदल मान्य केल्यास लोकप्रतिनिधी कायदा 1991 च्या नुसार कलम 37 (1) माझे मोठे बदल होतील. महत्त्वाचे म्हणजे एकाच वेळी दोन जागेवर आपले नशीब आज आजमावणाऱ्या उमेदवाराला असे करता येणार नाही. तसेच राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाकडे सोपवावे, याबाबत काही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला सुचवलेले हे महत्त्वाचे बदल होतील, का याबाबत आता केंद्र सरकार विचार विनिमय करणार आहे.

मुंबई - एकाच उमेदवाराने दोन किंवा त्यापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवू नये, याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. नवनिर्वाचित मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तसेच काही महत्त्वाचे बदल ही राजकुमार यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात दिले आहेत.

जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर दाखवण्यास बंदी - नव मतदाराचे मतदार कार्ड लिंक असणे. तसेच निवडणूक जाहीर झाल्यानंतर जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर दाखवण्यास बंदी आणणे याबाबतचे प्रस्तावही केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित केल्या जाऊ नयेत, याबाबतचा महत्वाचा प्रस्ताव दिल्याने केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे.

एका उमेदवाराने दोन जागेवरून निवडणूक लढवण्यास बंदी - केंद्र सरकारने हे बदल मान्य केल्यास लोकप्रतिनिधी कायदा 1991 च्या नुसार कलम 37 (1) माझे मोठे बदल होतील. महत्त्वाचे म्हणजे एकाच वेळी दोन जागेवर आपले नशीब आज आजमावणाऱ्या उमेदवाराला असे करता येणार नाही. तसेच राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाकडे सोपवावे, याबाबत काही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला सुचवलेले हे महत्त्वाचे बदल होतील, का याबाबत आता केंद्र सरकार विचार विनिमय करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.