मुंबई - देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी घराबाहेर न पडता आपापल्या घरीच राहून साजरी करा. कोरोनाशी एकजूटीने लढा देण्यासाठी आंबेडकरी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मंगळवारी महाराष्ट्रमध्ये 55 हजार तर मुंबईमध्ये दहा हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरी साजरी करावी. घरच्या घरीच जयंतीचा आनंद उत्सव साजरा करावा. त्याबरोबर दादर येथील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करु नये, त्य ऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा घरी राहून साजरी करा, रामदास आठवलेंचे आवाहन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी घराबाहेर न पडता आपापल्या घरीच राहून साजरी करा. कोरोनाशी एकजूटीने लढा देण्यासाठी आंबेडकरी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

मुंबई - देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी घराबाहेर न पडता आपापल्या घरीच राहून साजरी करा. कोरोनाशी एकजूटीने लढा देण्यासाठी आंबेडकरी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मंगळवारी महाराष्ट्रमध्ये 55 हजार तर मुंबईमध्ये दहा हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरी साजरी करावी. घरच्या घरीच जयंतीचा आनंद उत्सव साजरा करावा. त्याबरोबर दादर येथील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करु नये, त्य ऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.