ETV Bharat / city

Nana Patole : ...तर भाजपला दोन खासदारांचा पक्ष होण्यास वेळ लागणार नाही -नाना पटोले

author img

By

Published : Mar 11, 2022, 1:23 PM IST

Updated : Mar 11, 2022, 1:31 PM IST

राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे त्यांचा आनंद आम्ही समजू शकतो. मात्र, या लोकशाहीमध्ये इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे दिग्गज नेते निवडणुका हरले आहेत हे भाजपाने विसरू नये. (Congress State President Nana Patole) नाहीतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष दोन खासदारांचा पक्ष होईल असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई - पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे त्यांचा आनंद आम्ही समजू शकतो. मात्र, या लोकशाहीमध्ये इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे दिग्गज नेते निवडणुका हरले आहेत हे भाजपाने विसरू नये. (Congress State President Nana Patole) नाहीतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष दोन खासदारांचा पक्ष होईल असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका

भारतीय जनता पक्षाला चार राज्यांमध्ये विजय मिळाला असला तरी, त्यांनी महाराष्ट्रासाठी भारावून जाऊ नये. महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करेल. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून नेहमीच भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मांडण्यात आली आहे. मात्र, यामध्ये कधीच भाजपाला यश मिळणार नाही असेही नाना पटोले यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

भ्रष्टाचाराचा एक पॅरामिटर ठरला पाहिजे

महाराष्ट्रात आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. मात्र, अनेक नेत्यांवर भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. खास करून आता भाजपमध्ये असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही गंभीर प्रकाराचे भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणीस यांनी केले. मात्र, आता तेच भारतीय जनता पक्षात केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचा पॅरामिटर ठरला पाहिजे असे मतही नाना पाटोले यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - PM MODI Gujrat Visit : पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो; आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर

मुंबई - पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे त्यांचा आनंद आम्ही समजू शकतो. मात्र, या लोकशाहीमध्ये इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे दिग्गज नेते निवडणुका हरले आहेत हे भाजपाने विसरू नये. (Congress State President Nana Patole) नाहीतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष दोन खासदारांचा पक्ष होईल असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका

भारतीय जनता पक्षाला चार राज्यांमध्ये विजय मिळाला असला तरी, त्यांनी महाराष्ट्रासाठी भारावून जाऊ नये. महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करेल. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून नेहमीच भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मांडण्यात आली आहे. मात्र, यामध्ये कधीच भाजपाला यश मिळणार नाही असेही नाना पटोले यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

भ्रष्टाचाराचा एक पॅरामिटर ठरला पाहिजे

महाराष्ट्रात आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. मात्र, अनेक नेत्यांवर भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. खास करून आता भाजपमध्ये असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही गंभीर प्रकाराचे भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणीस यांनी केले. मात्र, आता तेच भारतीय जनता पक्षात केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचा पॅरामिटर ठरला पाहिजे असे मतही नाना पाटोले यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - PM MODI Gujrat Visit : पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो; आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर

Last Updated : Mar 11, 2022, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.