ETV Bharat / city

Dilip Kumar passes away : वाचा, दिलीप कुमार यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराला शिवसेनाप्रमुखांनी का केला होता विरोध?

1998 मध्ये पाकिस्तानने दिलीप कुमार यांना 'निशान-ए-इम्तियाज' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. यानंतर दुसऱ्याच वर्षी 1999 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान कारगिल युद्ध झाले. यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान परत करावा अशी मागणी करत त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र कुमार यांनी याला नकार दिला आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली.(Dilip Kumar passes away : read, why balasaheb thackeray opposed nishan e imtiaz award to dilip kumar)

author img

By

Published : Jul 7, 2021, 12:32 PM IST

Dilip Kumar passes away : वाचा, दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्काराला शिवसेनाप्रमुखांनी का केला होता विरोध?
Dilip Kumar passes away : वाचा, दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्काराला शिवसेनाप्रमुखांनी का केला होता विरोध?

मुंबई : दिलीप कुमार यांना 1998 मध्ये पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-इम्तियाज’ मिळाल्यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याला कडाडून विरोध केला होता. या मुद्द्यावरून तेव्हा मोठा गदारोळ बघायला मिळाला होता.

पाकिस्तानच्या पुरस्कारावरून काय झाला होता वाद?

1998 मध्ये पाकिस्तानने दिलीप कुमार यांना 'निशान-ए-इम्तियाज' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. यानंतर दुसऱ्याच वर्षी 1999 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान कारगिल युद्ध झाले. यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान परत करावा अशी मागणी करत त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र कुमार यांनी याला नकार दिला आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी कुमार यांचा पुरस्कार कायम ठेवत त्यांच्या देशभक्तीवर शंका घेण्याची काही गरज नसल्याचे परखडपणे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते.

शिवसैनिकांनी केले होते अंडरविअर आंदोलन

बाळासाहेबांच्या विरोधानंतर शिवसैनिकांनी दिलीप कुमार यांच्या घरासमोर अंडरविअर आंदोलनही केले होते. विशेष म्हणजे तत्पूर्वी बाळासाहेब आणि दिलीप कुमार यांच्यात चांगली मैत्री होती. दोघेही एकमेकांच्या घरी येत-जात होते. मात्र बाळासाहेबांनी या पुरस्काराला कडाडून विरोध दर्शविला. यासंदर्भातील वादावर दिलीप कुमार यांनी त्यांचे आत्मचरीत्र 'द सबस्टन्स ऑफ शॅडो'मध्येही लिहिले आहे.

दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दरम्यान, दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - Dilip Kumar Died : 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार यांचे फेमस डॉयलॉग...

मुंबई : दिलीप कुमार यांना 1998 मध्ये पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-इम्तियाज’ मिळाल्यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याला कडाडून विरोध केला होता. या मुद्द्यावरून तेव्हा मोठा गदारोळ बघायला मिळाला होता.

पाकिस्तानच्या पुरस्कारावरून काय झाला होता वाद?

1998 मध्ये पाकिस्तानने दिलीप कुमार यांना 'निशान-ए-इम्तियाज' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. यानंतर दुसऱ्याच वर्षी 1999 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान कारगिल युद्ध झाले. यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान परत करावा अशी मागणी करत त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र कुमार यांनी याला नकार दिला आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी कुमार यांचा पुरस्कार कायम ठेवत त्यांच्या देशभक्तीवर शंका घेण्याची काही गरज नसल्याचे परखडपणे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते.

शिवसैनिकांनी केले होते अंडरविअर आंदोलन

बाळासाहेबांच्या विरोधानंतर शिवसैनिकांनी दिलीप कुमार यांच्या घरासमोर अंडरविअर आंदोलनही केले होते. विशेष म्हणजे तत्पूर्वी बाळासाहेब आणि दिलीप कुमार यांच्यात चांगली मैत्री होती. दोघेही एकमेकांच्या घरी येत-जात होते. मात्र बाळासाहेबांनी या पुरस्काराला कडाडून विरोध दर्शविला. यासंदर्भातील वादावर दिलीप कुमार यांनी त्यांचे आत्मचरीत्र 'द सबस्टन्स ऑफ शॅडो'मध्येही लिहिले आहे.

दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दरम्यान, दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - Dilip Kumar Died : 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार यांचे फेमस डॉयलॉग...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.