ETV Bharat / city

CORONA VIRUS : रुग्णसंख्येत किंचित वाढ.. राज्यात ३,७८३ नवे रुग्ण, ५६ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 15, 2021, 10:05 PM IST

आज राज्यात करोना बाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६४ रूग्ण बरे झाले, तर ३ हजार ७८३ नवीन करोनाबाधित आढळले. याशिवाय, ५२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

corona update maharashtra
corona update maharashtra

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी रुग्णसंख्या घटून २,७४० रुग्ण आढळून आले होते तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. काल मंगळवारी त्यात वाढ होऊन ३५३० नवे रुग्ण आढळून आले होते. आज बुधवारी त्यात काही प्रमाणात वाढ होऊन ३७८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४,३६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात ४९,०३४ सक्रिय रुग्ण -

राज्यात आज दिवसभरात ४,३६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,१७,०७० कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३७८३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३८,२७७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६३ लाख ६१ हजार ३०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ०७ हजार ९३० (११.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३५६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ४९,०३४ सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा - लस घेतल्यानंतरही २३ हजार मुंबईकरांना कोरोनाची लागण


रुग्णसंख्येत चढउतार -

२६ ऑगस्टला ५,१०८, ३० ऑगस्टला ३,७४१, ३१ ऑगस्टला ४,१९६, १ सप्टेंबरला ४,४५६, २ सप्टेंबरला ४,३४२, ३ सप्टेंबरला ४,३१३, ४ सप्टेंबरला ४,१३०, ५ सप्टेंबरला ४,०५७, ६ सप्टेंबरला ३,६२६, ७ सप्टेंबरला ३,९८८, ८ सप्टेंबरला ४,१७४, ९ सप्टेंबरला ४,२१९, १० सप्टेंबरला ४,१५४, ११ सप्टेंबरला ३,०७५, १२ सप्टेंबरला ३,६२३, १३ सप्टेंबरला २,७४०, १४ सप्टेंबरला ३,५३०, १५ सप्टेंबरला ३,७८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा - 2020 मध्ये रोज 77 बलात्काराच्या घटना; राजस्थानचा पहिला तर महाराष्ट्राचा चौथा क्रमांक


मृत्यूदर २.१२ टक्के -


१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबआ ५२, १५ सप्टेंबरला ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.

..या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - ५१५
  • अहमदनगर - ७०६
  • पुणे - ५९६
  • पुणे पालिका - २२२
  • पिपरी चिंचवड पालिका - १५१
  • सोलापूर - २८३
  • सातारा - २२७
  • सांगली - १२०

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी रुग्णसंख्या घटून २,७४० रुग्ण आढळून आले होते तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. काल मंगळवारी त्यात वाढ होऊन ३५३० नवे रुग्ण आढळून आले होते. आज बुधवारी त्यात काही प्रमाणात वाढ होऊन ३७८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४,३६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात ४९,०३४ सक्रिय रुग्ण -

राज्यात आज दिवसभरात ४,३६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,१७,०७० कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३७८३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३८,२७७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६३ लाख ६१ हजार ३०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ०७ हजार ९३० (११.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३५६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ४९,०३४ सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा - लस घेतल्यानंतरही २३ हजार मुंबईकरांना कोरोनाची लागण


रुग्णसंख्येत चढउतार -

२६ ऑगस्टला ५,१०८, ३० ऑगस्टला ३,७४१, ३१ ऑगस्टला ४,१९६, १ सप्टेंबरला ४,४५६, २ सप्टेंबरला ४,३४२, ३ सप्टेंबरला ४,३१३, ४ सप्टेंबरला ४,१३०, ५ सप्टेंबरला ४,०५७, ६ सप्टेंबरला ३,६२६, ७ सप्टेंबरला ३,९८८, ८ सप्टेंबरला ४,१७४, ९ सप्टेंबरला ४,२१९, १० सप्टेंबरला ४,१५४, ११ सप्टेंबरला ३,०७५, १२ सप्टेंबरला ३,६२३, १३ सप्टेंबरला २,७४०, १४ सप्टेंबरला ३,५३०, १५ सप्टेंबरला ३,७८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा - 2020 मध्ये रोज 77 बलात्काराच्या घटना; राजस्थानचा पहिला तर महाराष्ट्राचा चौथा क्रमांक


मृत्यूदर २.१२ टक्के -


१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबआ ५२, १५ सप्टेंबरला ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.

..या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - ५१५
  • अहमदनगर - ७०६
  • पुणे - ५९६
  • पुणे पालिका - २२२
  • पिपरी चिंचवड पालिका - १५१
  • सोलापूर - २८३
  • सातारा - २२७
  • सांगली - १२०
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.