ETV Bharat / city

शहरांची नावे बदलून वातावरण दुषित करू नका; थोरातांनी पुन्हा ठणकावले - rename Aurangabad city

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेवर असलेल्या शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे, तर काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे

थोरातांनी पुन्हा ठणकावले
थोरातांनी पुन्हा ठणकावले
author img

By

Published : Jan 7, 2021, 11:28 AM IST

Updated : Jan 7, 2021, 1:23 PM IST

मुंबई - राज्यात सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राजकारण तापू लागले आहे. त्यातच सत्तेत असलेल्या महाविका आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला ठणकावून विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराच्या विषयावरून थेट माहिती व महासंचानलायाच धारेवर धरले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर राज्यातील अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मराठा समाजाच्या संघटनांकडून थोरात यांच्या विरोधात आंदोलनेही केली आहेत. मात्र, तरीही काँग्रेस शहरांच्या नामांतराविरोधात ठाम आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावर बोलताना थोरात म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरास आमचा ठाम विरोध आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला खडे बोल-

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. अशा शब्दात महसूल मंत्री थोरात यांनी माहिती व जनसंपर्क महासंचानलयासही खडे बोल सुनावले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सीएमओच्या ट्विटर हँडलवर औरंगबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाची जाहिरात करत असताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे. त्यावरून थोरातांनी प्रतिक्रिया देत शहरांच्या नामातराला काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

सरकारी कामकाजात संभाजीनगर हा उल्लेख काँग्रेसला अमान्य
सरकारी कामकाजात संभाजीनगर हा उल्लेख काँग्रेसला अमान्य

काय आहे वाद -

शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. नामांतराची शिवसेनेची ही जूनीच मागणी आहे. मात्र, औरंगाबाद महापालिका समोर ठेऊन हा विषय चर्चेला आणला जात असल्याचा आरोप काही पक्ष संघटनांकडून करण्यात आला. तर काँग्रेसने शहरांच्या नामांतरला थेट विरोध दर्शवला. मात्र, काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा काँग्रेस हा एक घटक पक्ष असल्याने राजकारणाची आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याची ही संधी न गमावता भाजपाने शिवसेनेला काँग्रेसच्या विरोधावरून डिवचले. त्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना आपली भूमिका बदलणार नसल्याचे ठाम केले.

औरंगाबादचे नामांतर हा फक्त कागदोपत्री आदेशाचा भाग उरला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तो यापूर्वीच शहराचे नामांतर केले असल्याचे सांगत, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना आणि उत्तरेत योगी सरकार शहरांची नावे बदलत असताना तुम्ही काय करत होतात? असा प्रति सवाल भाजपा केला.

राष्ट्रवादीचाही विरोध-

शहरांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. हा प्रस्ताव २० वर्षांपूर्वीच आम्ही अमान्य केला होता. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे. तसेच काँग्रेसकडून शहरांची नावे बदलण्यास विरोध कायम आहे. याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगू लागली असली तरी , महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शहराच्या नामांतरावरून सुरू असलेला हा राजकीय वाद विद्यापीठाच्या नामांतराप्रमाणे चिघळणार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई - राज्यात सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राजकारण तापू लागले आहे. त्यातच सत्तेत असलेल्या महाविका आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला ठणकावून विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराच्या विषयावरून थेट माहिती व महासंचानलायाच धारेवर धरले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर राज्यातील अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मराठा समाजाच्या संघटनांकडून थोरात यांच्या विरोधात आंदोलनेही केली आहेत. मात्र, तरीही काँग्रेस शहरांच्या नामांतराविरोधात ठाम आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावर बोलताना थोरात म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरास आमचा ठाम विरोध आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला खडे बोल-

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. अशा शब्दात महसूल मंत्री थोरात यांनी माहिती व जनसंपर्क महासंचानलयासही खडे बोल सुनावले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सीएमओच्या ट्विटर हँडलवर औरंगबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाची जाहिरात करत असताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे. त्यावरून थोरातांनी प्रतिक्रिया देत शहरांच्या नामातराला काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

सरकारी कामकाजात संभाजीनगर हा उल्लेख काँग्रेसला अमान्य
सरकारी कामकाजात संभाजीनगर हा उल्लेख काँग्रेसला अमान्य

काय आहे वाद -

शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. नामांतराची शिवसेनेची ही जूनीच मागणी आहे. मात्र, औरंगाबाद महापालिका समोर ठेऊन हा विषय चर्चेला आणला जात असल्याचा आरोप काही पक्ष संघटनांकडून करण्यात आला. तर काँग्रेसने शहरांच्या नामांतरला थेट विरोध दर्शवला. मात्र, काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा काँग्रेस हा एक घटक पक्ष असल्याने राजकारणाची आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याची ही संधी न गमावता भाजपाने शिवसेनेला काँग्रेसच्या विरोधावरून डिवचले. त्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना आपली भूमिका बदलणार नसल्याचे ठाम केले.

औरंगाबादचे नामांतर हा फक्त कागदोपत्री आदेशाचा भाग उरला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तो यापूर्वीच शहराचे नामांतर केले असल्याचे सांगत, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना आणि उत्तरेत योगी सरकार शहरांची नावे बदलत असताना तुम्ही काय करत होतात? असा प्रति सवाल भाजपा केला.

राष्ट्रवादीचाही विरोध-

शहरांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. हा प्रस्ताव २० वर्षांपूर्वीच आम्ही अमान्य केला होता. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे. तसेच काँग्रेसकडून शहरांची नावे बदलण्यास विरोध कायम आहे. याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगू लागली असली तरी , महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शहराच्या नामांतरावरून सुरू असलेला हा राजकीय वाद विद्यापीठाच्या नामांतराप्रमाणे चिघळणार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Jan 7, 2021, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.