मुंबई - राज्यपालांनी संख्याबळाच्या आधारे भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावले आहे, त्याचे संजय राऊत यांनी स्वागत केले. मात्र शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसबाबतही एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. भांडुप येथील पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.
काँग्रेस पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला आहे, यावर शिवसेनेचे भूमिका काय? असा प्रश्न राऊत यांना विचारला असता, त्यांनी काँग्रेस पक्ष हा काही महाराष्ट्राचा दुश्मन आहे का? असा सवाल केला. तसेच काँग्रेसने शिवसेनेसोबत महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादांमध्ये चांगली भूमिका घेतली होती, असा उल्लेखही त्यांनी यावेळी बोलताना केला. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळे सत्तेचा पेच अद्यापही कायम आहे. शनिवारी राज्यपालांनी भाजपला मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेसाठी बोलवले आहे. भाजपने 11 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत त्यांचा निर्णय सांगायचा आहे.
हेही वाचा... 'वर्षा'वर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक; सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?
महाराष्ट्रात मोठ्या पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करायचा असतो. राज्यपालांच्या भुमिकेचे आम्ही स्वागत करतो. भाजपकडे बहुमत असेल, यामुळेच त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यांच्याकडे बहुमत नसेल असे आम्हाला वाटत नाही, असे राऊत यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील आमदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात येत आहे का? यावर बोलताना संजय राऊत यांनी 'आमचा नेता हा कोणताही व्यापारी नसून शिवसेनेने कधीही राजकारणात व्यवहार केलेला नाही, असे म्हटले आहे.
हेही वाचा... आदित्य ठाकरेंनी हॉटेल रिट्रीटमध्ये घेतली शिवसेना आमदारांची भेट..
उद्धव ठाकरे आज रविवारी दुपारी शिवसेनेच्या आमदारांना मालाड येथील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी जाणार असून शिवसेनेचे आमदार हे आमचा एक परिवार आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करणे हे आमचं कर्तव्य असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे हे एक चतुर राजकारणी असल्यामुळे त्यांना कोणीही खोटे ठरवण्याचे कारण नाही. राम मंदिर जन्मभूमीचा सर्वोच न्यायालयाने निकाल दिला असून त्याचे श्रेय कोणत्याही एका पक्षाने घेवू नये. राम मंदिराचा मुद्दा विजयी झाल्यामुळे शिवसेना भाजपकडे वळेल या भ्रमातून बाहेर पडायला पाहिजे. हे कोणा एका पक्षाचे श्रेय नाही, अशी भुमिका राऊत यांनी घेतली.
हेही वाचा... 'कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले' करणार सत्ता स्थापनेचा दावा, आमदारांना लिहले पत्रउद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची बैठक
शिवसेनेची 12.30 वाजता आमदारांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मढ येथील रिट्रीट हॉटेलमध्ये सध्या शिवसेनेच्या आमदारांचे वास्तव्य आहे. शनिवारी भाजपला राज्यपालांनी सरकार स्थापनेबाबत विचारणा केली असून या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही बैठक होत आहे. सत्तेचे समान वाटप, अडीच वर्षे मुख्यमंत्री पद यावरून सेना भाजपाचा अद्यापही निर्णय झाला नाही, त्यामुळे राज्यातील सत्तेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
हेही वाचा... आमदार फोडण्याची हिंमत भाजपमध्ये नाही; सत्ता स्थापनेसाठी त्यांना शुभेच्छा - संजय राऊ