ETV Bharat / city

संतांची शिकवण आचरणात आणल्यास राज्य स्वच्छतेत आणि कोरोनामुक्तीत अव्वल राहिल - मुख्यमंत्री

author img

By

Published : Jul 1, 2021, 11:02 PM IST

राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतांनी अभंग, श्लोक, ओव्यांच्या माध्यमातून आयुष्य कसे जगावे? याची शिकवण संपूर्ण जगाला दिली. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारख्या संतांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. संतांची शिकवण आचरणात आणल्यास आपला महाराष्ट्र स्वच्छतेत आणि कोरोनामुक्तीत अव्वल राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

Clean Village Competition Dindori Gram Panchayat
स्वच्छ ग्राम स्पर्धा विजेता

मुंबई - राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतांनी अभंग, श्लोक, ओव्यांच्या माध्यमातून आयुष्य कसे जगावे? याची शिकवण संपूर्ण जगाला दिली. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारख्या संतांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. संतांची शिकवण आचरणात आणल्यास आपला महाराष्ट्र स्वच्छतेत आणि कोरोनामुक्तीत अव्वल राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

Clean Village Competition Dindori Gram Panchayat
स्वच्छ ग्राम स्पर्धा दिंडोरी ग्रामपंचायत

हेही वाचा - कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवास खुला करा

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज हा सोहळा आयोजित करण्यात आला.

स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन २०१७-१८ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी अवनखेड ग्रामपंचायतीला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील राहता लोणी बु. ग्रामपंचायतीला द्वितीय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला कुशेवाडा ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन, जलजीवन मिशन अभियान संचालक हृषीकेश यशोद आदी मान्यवर वर्षा या शासकीय निवासस्थानातून उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकहून दूर दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, अहमदनगर व गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, तसेच विजेती ग्रामपंचायत ज्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये येते, त्या पंचायत समितीचे सभापती या सोहळ्यास जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

योजनांची अंमलबजावणी व्हावी

स्वच्छते प्रमाणेच आता कोरोनामुक्त गाव स्पर्धा राज्य शासनाने सुरू केली आहे. गावे स्वच्छ झाली, तर कोरोनालाही आपल्याला हद्दपार करता येईल. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येवून दृढनिश्चय करून प्रयत्न केले, त्याप्रमाणे जर सर्व नागरिकांनी जर माझे कुटुंब, माझे गाव, माझे राज्य कोरोनामुक्त करून दाखवेन, असा दृढनिश्चय केला व त्याप्रमाणे कृती केली, तर आपला महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. निधी कमी पडू देणार नाही. केवळ योजना जाहीर करून त्याचा उपयोग नाही. त्याचा पाठपुरावा व त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. हे करीत असताना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे महत्व लक्षात घेता या खात्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात स्वच्छता अभियान सुरू

आपले राज्य हागणदारीमुक्त झाले, ही समाधानाची बाब आहे. गाव स्वच्छ असतील तर लोकांचे आरोग्य चांगले राहणार. लोकांची मने स्वच्छ करण्याचे कामही या अभियानाने केले आहे. या योजना तशाच पुढे सुरू राहतील, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. स्वच्छतेबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केलेल्या कामगिरीचे व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे विशेष कौतुक त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दिवंगत आर.आर. पाटील यांनी १९९९ मध्ये राज्यात स्वच्छता अभियान सुरू केले. श्रमदान, लोकवर्गणी, लोकसहभाग यातून चळवळ उभी राहिली. गावची गावे एकवटली व स्वच्छ होऊ लागली. यात सातत्य राखणे गरजेचे असून पाणीपुरवठा विभागाने हा कार्यक्रम शंभर टक्के कसा यशस्वी होईल, या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली.

निसर्गाचा समतोल राखून सार्वजनिक स्वच्छता उपक्रम

स्वच्छ भारत मिशन टप्पा-१, अंतर्गत जवळपास ७० लाख कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ दिलेला आहे. तसेच, २७ हजार ६६७ ग्रामपंचायती हगणदारी मुक्त केलेल्या आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आता आपण स्वच्छ भारत मिशन टप्पा - २ राबविणार आहोत. याद्वारे चालू वर्षात राज्यातील २२ हजार १७३ ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणार आहोत. त्याद्वारे गाव तेथे सार्वजनिक शौचालय, कंम्पोस्टखत, कचरा वाहतुकीसाठी तीनचाकी सायकल, बॅटरी सायकल, प्लास्टिक व्यवस्थापन शेड, गाळ व्यवस्थापन प्रकल्प, खताच्या खड्ड्याचा नॅडेप प्रकल्प इ. निसर्गाचा समतोल राखून सार्वजनिक स्वच्छता राखणारे उपक्रम राबविणार आहोत, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा - दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी स्थिर, डेल्टा प्लसचा अद्याप प्रसार नाही - डॉ. हेमंत देशमुख

मुंबई - राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतांनी अभंग, श्लोक, ओव्यांच्या माध्यमातून आयुष्य कसे जगावे? याची शिकवण संपूर्ण जगाला दिली. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारख्या संतांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. संतांची शिकवण आचरणात आणल्यास आपला महाराष्ट्र स्वच्छतेत आणि कोरोनामुक्तीत अव्वल राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

Clean Village Competition Dindori Gram Panchayat
स्वच्छ ग्राम स्पर्धा दिंडोरी ग्रामपंचायत

हेही वाचा - कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवास खुला करा

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज हा सोहळा आयोजित करण्यात आला.

स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन २०१७-१८ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी अवनखेड ग्रामपंचायतीला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील राहता लोणी बु. ग्रामपंचायतीला द्वितीय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला कुशेवाडा ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन, जलजीवन मिशन अभियान संचालक हृषीकेश यशोद आदी मान्यवर वर्षा या शासकीय निवासस्थानातून उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकहून दूर दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, अहमदनगर व गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, तसेच विजेती ग्रामपंचायत ज्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये येते, त्या पंचायत समितीचे सभापती या सोहळ्यास जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

योजनांची अंमलबजावणी व्हावी

स्वच्छते प्रमाणेच आता कोरोनामुक्त गाव स्पर्धा राज्य शासनाने सुरू केली आहे. गावे स्वच्छ झाली, तर कोरोनालाही आपल्याला हद्दपार करता येईल. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येवून दृढनिश्चय करून प्रयत्न केले, त्याप्रमाणे जर सर्व नागरिकांनी जर माझे कुटुंब, माझे गाव, माझे राज्य कोरोनामुक्त करून दाखवेन, असा दृढनिश्चय केला व त्याप्रमाणे कृती केली, तर आपला महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. निधी कमी पडू देणार नाही. केवळ योजना जाहीर करून त्याचा उपयोग नाही. त्याचा पाठपुरावा व त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. हे करीत असताना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे महत्व लक्षात घेता या खात्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात स्वच्छता अभियान सुरू

आपले राज्य हागणदारीमुक्त झाले, ही समाधानाची बाब आहे. गाव स्वच्छ असतील तर लोकांचे आरोग्य चांगले राहणार. लोकांची मने स्वच्छ करण्याचे कामही या अभियानाने केले आहे. या योजना तशाच पुढे सुरू राहतील, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. स्वच्छतेबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केलेल्या कामगिरीचे व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे विशेष कौतुक त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दिवंगत आर.आर. पाटील यांनी १९९९ मध्ये राज्यात स्वच्छता अभियान सुरू केले. श्रमदान, लोकवर्गणी, लोकसहभाग यातून चळवळ उभी राहिली. गावची गावे एकवटली व स्वच्छ होऊ लागली. यात सातत्य राखणे गरजेचे असून पाणीपुरवठा विभागाने हा कार्यक्रम शंभर टक्के कसा यशस्वी होईल, या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली.

निसर्गाचा समतोल राखून सार्वजनिक स्वच्छता उपक्रम

स्वच्छ भारत मिशन टप्पा-१, अंतर्गत जवळपास ७० लाख कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ दिलेला आहे. तसेच, २७ हजार ६६७ ग्रामपंचायती हगणदारी मुक्त केलेल्या आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आता आपण स्वच्छ भारत मिशन टप्पा - २ राबविणार आहोत. याद्वारे चालू वर्षात राज्यातील २२ हजार १७३ ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणार आहोत. त्याद्वारे गाव तेथे सार्वजनिक शौचालय, कंम्पोस्टखत, कचरा वाहतुकीसाठी तीनचाकी सायकल, बॅटरी सायकल, प्लास्टिक व्यवस्थापन शेड, गाळ व्यवस्थापन प्रकल्प, खताच्या खड्ड्याचा नॅडेप प्रकल्प इ. निसर्गाचा समतोल राखून सार्वजनिक स्वच्छता राखणारे उपक्रम राबविणार आहोत, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा - दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी स्थिर, डेल्टा प्लसचा अद्याप प्रसार नाही - डॉ. हेमंत देशमुख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.