ETV Bharat / city

मालाड दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कारवाई होणार, पालिकेची ५ लाखांची मदत

पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेचे जलाशय आहे. या जलाशयाच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही संरक्षक भिंत सोमवारी रात्री पावसात कोसळली. त्याखाली २१ जणांचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Jul 2, 2019, 6:23 PM IST

Updated : Jul 2, 2019, 6:28 PM IST

मालाड दुर्घटना

मुंबई - मालाड पिंपरीपाडा येथे सुरक्षा भिंत कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची चौकशी करून दोषी असलेले कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. मुंबईतील पावसाबाबत पालिकेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे 'ई टिव्ही भारत'च्या बातमीच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जोशी यांनी ही माहिती दिली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना पालिका ५ लाखांची मदत देईल, असेही जोशी यांनी सांगितले.

मालाड दुर्घटनेबाबत माहिती देताना पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी

पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेचे जलाशय आहे. या जलाशयाच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही संरक्षक भिंत सोमवारी रात्री पावसात कोसळली. त्याखाली २१ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी दगडी भिंत होती. त्याखाली ४० वर्ष लोक राहत होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी नव्याने भिंत बांधण्यात आली. ती कमी जाडीची आणि सुमारे ३० फूट उंच भिंत होती. या भिंतीला पाणी जायला छिद्रे ठेवण्यात आली नव्हती. यामुळे कालच्या मुसळधार पावसात या भिंतीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ही भिंत कोसळली. याप्रकरणी भिंत बांधणारा कंत्राटदार आणि संबंधित पालिका अधिकारी दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

दुर्घटनेबाबत 'ई टिव्ही भारत'वर बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीच्या अनुषंगाने आज पत्रकारांना पावसाबाबत माहिती देण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आल्या असता पत्रकारांनी निकृष्ट भिंत बांधणाऱ्यांवर काय कारवाई करणार, दोषी अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पालिका आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाईल, असे जोशी यांनी सांगितले. मालाडमध्ये ज्या घरांवर भिंत कोसळली ती घरे वन विभागाच्या जमिनीवर असून अतिक्रमित केलेली आहेत असेही जोशी यांनी सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना पालिकेकडून ५ लाखांची मदत

मालाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. पालिकेने आर्थिक मदत करावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यानुसार पालिका मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. हे उपचार मोफत केले जातील, असे अश्विनी जोशी यांनी सांगितले.

मुंबई - मालाड पिंपरीपाडा येथे सुरक्षा भिंत कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची चौकशी करून दोषी असलेले कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. मुंबईतील पावसाबाबत पालिकेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे 'ई टिव्ही भारत'च्या बातमीच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जोशी यांनी ही माहिती दिली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना पालिका ५ लाखांची मदत देईल, असेही जोशी यांनी सांगितले.

मालाड दुर्घटनेबाबत माहिती देताना पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी

पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेचे जलाशय आहे. या जलाशयाच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही संरक्षक भिंत सोमवारी रात्री पावसात कोसळली. त्याखाली २१ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी दगडी भिंत होती. त्याखाली ४० वर्ष लोक राहत होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी नव्याने भिंत बांधण्यात आली. ती कमी जाडीची आणि सुमारे ३० फूट उंच भिंत होती. या भिंतीला पाणी जायला छिद्रे ठेवण्यात आली नव्हती. यामुळे कालच्या मुसळधार पावसात या भिंतीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ही भिंत कोसळली. याप्रकरणी भिंत बांधणारा कंत्राटदार आणि संबंधित पालिका अधिकारी दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

दुर्घटनेबाबत 'ई टिव्ही भारत'वर बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीच्या अनुषंगाने आज पत्रकारांना पावसाबाबत माहिती देण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आल्या असता पत्रकारांनी निकृष्ट भिंत बांधणाऱ्यांवर काय कारवाई करणार, दोषी अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पालिका आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाईल, असे जोशी यांनी सांगितले. मालाडमध्ये ज्या घरांवर भिंत कोसळली ती घरे वन विभागाच्या जमिनीवर असून अतिक्रमित केलेली आहेत असेही जोशी यांनी सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना पालिकेकडून ५ लाखांची मदत

मालाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. पालिकेने आर्थिक मदत करावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यानुसार पालिका मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. हे उपचार मोफत केले जातील, असे अश्विनी जोशी यांनी सांगितले.

Intro:मुंबई
मालाड पिंपरीपाडा येथे सुरक्षा भिंत कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची चौकशी करून दोषी असलेले कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. मुंबईतील पावसाबाबत पालिकेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे 'ई टिव्ही भारत'च्या बातमीच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जोशी यांनी ही माहिती दिली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना पालिका ५ लाखांची मदत देईल असेही जोशी यांनी सांगितले. Body:पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेचे जलाशय आहे. या जलाशयाच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही संरक्षक भिंत काल रात्रीच्या पावसात कोसळली. त्याखाली २१ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी दगडी भिंत होती. त्याखाली ४० वर्ष लोक राहत होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी नव्याने भिंत बांधण्यात आली. कमी जाडीची व सुमारे ३० फूट उंच भिंत बांधण्यात आली होती. या भिंतीला पाणी जायला छिद्रे ठेवण्यात आली नव्हती. यामुळे कालच्या मुसळधार पावसात या भिंतीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ही भिंत कोसळली. याप्रकरणी भिंत बांधणारा कंत्राटदार आणि संबंधित पालिका अधिकारी दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

याबाबत बातमी 'ई टिव्ही भारत'वर प्रसिद्ध झाली होती. या बातमीच्या अनुषंगाने आज पत्रकारांना पावसाबाबत माहिती देण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आल्या असता पत्रकारांनी निकृष्ठ भिंत बांधणाऱ्यांवर काय कारवाई करणार, दोषी अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर कारवाई केली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पालिका आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाईल असे जोशी यांनी सांगितले. मालाडमध्ये ज्या घरांवर भिंत कोसळली ती घरे वन विभागाच्या जमिनीवर असून अतिक्रमित केलेली आहेत असेही जोशी यांनी सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना पालिकेकडून ५ लाखांची मदत -
मालाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. पालिकेने आर्थिक मदत करावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यानुसार पालिका मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच जे जखमी जाहले आहेत त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. हे उपचार मोफत केले जातील असे अश्विनी जोशी यांनी सांगितले.

अश्विनी जोशी यांची बाईट Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.