ETV Bharat / city

बांधकाम कामगारांसाठीची अर्थसहाय्य योजना रद्द करण्याचा निर्णय चुकीचा, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची टीका

author img

By

Published : Aug 17, 2020, 7:19 PM IST

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’ अंतर्गत नोंदणी केल्यावर या कामगारांना अवजारे खरेदीकरीता रू. 5000/- चे अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेऊन त्यास आज मंजूरी ही देण्यात आली.

bjp keshav uppaddya on construction labour mahamandal
bjp keshav uppaddya on construction labour mahamandal

मुंबई - रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कामगार वर्गासाठी सुरू केलेली योजना तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून धोरणातला विरोधाभास स्पष्टपणे दिसून येतो, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’ अंतर्गत नोंदणी केल्यावर या कामगारांना अवजारे खरेदीकरीता रू. 5000/- चे अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला, आणि त्यास आज मंजूरीही देण्यात आली.

एकीकडे सरकार अधिकाधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जनतेला देते मात्र, दुसरीकडे कामगारांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवणारी योजना रद्दबातल करण्याचे धोरण अवलंबत आहे, तेव्हा हे सरकार दुतोंडी आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

मुंबई - रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कामगार वर्गासाठी सुरू केलेली योजना तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून धोरणातला विरोधाभास स्पष्टपणे दिसून येतो, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’ अंतर्गत नोंदणी केल्यावर या कामगारांना अवजारे खरेदीकरीता रू. 5000/- चे अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला, आणि त्यास आज मंजूरीही देण्यात आली.

एकीकडे सरकार अधिकाधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जनतेला देते मात्र, दुसरीकडे कामगारांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवणारी योजना रद्दबातल करण्याचे धोरण अवलंबत आहे, तेव्हा हे सरकार दुतोंडी आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.