ETV Bharat / city

'आरे'तील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे; साजरा केला आनंद

author img

By

Published : Dec 2, 2019, 4:32 PM IST

Updated : Dec 2, 2019, 5:35 PM IST

मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू असताना त्याला विरोध करायला गेलेल्या पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी 29 जणांवर 353 सारखे कलम लावून त्यांना अटक करण्यात आली होती.

aare fir
आरे कारशेड; आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू असताना त्याला विरोध करायला गेलेल्या पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी 29 जणांवर 353 सारखे कलम लावून त्यांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे होते. महाविकास आघाडीची सत्ता येताच नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्यानंतर रविवारी आरेतील 29 जणांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का दिला.

'आरे'तील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे; साजरा केला आनंद

हेही वाचा - ...तर पंतप्रधानांना पाय उतार व्हावे लागेल - नवाब मलिक

त्यानंतर आज(सोमवार) सकाळी अटक करण्यात आलेल्या तरुणांनी आरे मेट्रो कारशेड परिसरात एकत्र येत जल्लोष केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले.

आमची सत्ता आल्यावर आम्ही आरेतील एकही झाडं तोडू देणार नाही, आरेला जंगल घोषित करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसार त्यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून नवीन महाविकास आघाडी सरकारकडून पर्यावरणप्रेमींच्या पर्यावरणाबाबत अपेक्षाही वाढल्या आहेत.

गुन्हे मागे घेतल्यावर पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया -

आमच्यावर ज्या चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते ते मागे घेतल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो. नवीन सरकार आरेला जंगल घोषित करतील, असा विश्वास असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कपिल अग्रवाल यांनी म्हटले.

हेही वाचा - ठाकरे-मुंडे संबंध पूर्वीपासून चांगले, मातोश्रीच्या संपर्कात सर्वच - अनिल परब

आमच्यावरील गुन्हे सरकारने मागे घेतले. यामुळे आम्ही निवांत झालोय. आरेतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, जे गुन्हेगार नव्हते. आता आम्हाला दिलासा वाटत असल्याचे सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या सुवर्णा सावे यांनी सांगितले.

नवीन सरकारने पुढच्या काळात आरेला जंगल घोषित करावं. आरेतील झाडं वाचवण्यासाठी आम्ही जो संघर्ष केला हा त्याचा विजय आहे, असे मुंबई विद्यापीठात शिकत असलेले विजय कांबळे यांनी सांगितले.

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू असताना त्याला विरोध करायला गेलेल्या पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी 29 जणांवर 353 सारखे कलम लावून त्यांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे होते. महाविकास आघाडीची सत्ता येताच नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्यानंतर रविवारी आरेतील 29 जणांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का दिला.

'आरे'तील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे; साजरा केला आनंद

हेही वाचा - ...तर पंतप्रधानांना पाय उतार व्हावे लागेल - नवाब मलिक

त्यानंतर आज(सोमवार) सकाळी अटक करण्यात आलेल्या तरुणांनी आरे मेट्रो कारशेड परिसरात एकत्र येत जल्लोष केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले.

आमची सत्ता आल्यावर आम्ही आरेतील एकही झाडं तोडू देणार नाही, आरेला जंगल घोषित करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसार त्यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून नवीन महाविकास आघाडी सरकारकडून पर्यावरणप्रेमींच्या पर्यावरणाबाबत अपेक्षाही वाढल्या आहेत.

गुन्हे मागे घेतल्यावर पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया -

आमच्यावर ज्या चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते ते मागे घेतल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो. नवीन सरकार आरेला जंगल घोषित करतील, असा विश्वास असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कपिल अग्रवाल यांनी म्हटले.

हेही वाचा - ठाकरे-मुंडे संबंध पूर्वीपासून चांगले, मातोश्रीच्या संपर्कात सर्वच - अनिल परब

आमच्यावरील गुन्हे सरकारने मागे घेतले. यामुळे आम्ही निवांत झालोय. आरेतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, जे गुन्हेगार नव्हते. आता आम्हाला दिलासा वाटत असल्याचे सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या सुवर्णा सावे यांनी सांगितले.

नवीन सरकारने पुढच्या काळात आरेला जंगल घोषित करावं. आरेतील झाडं वाचवण्यासाठी आम्ही जो संघर्ष केला हा त्याचा विजय आहे, असे मुंबई विद्यापीठात शिकत असलेले विजय कांबळे यांनी सांगितले.

Intro:
मुंबई - मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू असताना त्याला विरोध करायला गेलेल्या पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी 29 जणांवर 353 सारखे कलम लावून त्यांना अटक करण्यात आली होती. कलम लावून अटक करण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे होते. महाविकास आघाडीची सत्ता येताच राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रथम आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आणि त्यानंतर रविवारी आरेतील 29 जणांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन पर्यावरणप्रेमींना सुखद धक्का दिला. त्यानंतर आज सकाळी अटक करण्यात आलेल्या तरुणांनी आरे मेट्रो कारशेड परिसरात एकत्र येत आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले.
आमची सत्ता आल्यावर आम्ही आरेतील एकही झाडं तोडू देणार नाही, आरेला जंगल घोषित करू असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसार त्यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून नवीन महाविकासआघाडी सरकारकडून पर्यावरणप्रेमींच्या पर्यावरणाबाबत अपेक्षाही वाढल्या आहेत.
Body:गुन्हे मागे घेण्यात आल्यावर पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया
आमच्यावर ज्या चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते ते मागे घेतल्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार व्यक्त करतोय. नवीन सरकार आरेला जंगल घोषित करतील असा विश्वास असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कपिल अग्रवाल यांनी म्हटले.।
आमच्यावरील गुन्हे सरकारने मागे घेतले यामुळे आम्ही निवांत झालोय. आरेतीलआंदोलनकर्त्या आम्हा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, जे गुन्हेगार नव्हते. आता आम्हाला दिलासा वाटत असल्याचे
सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकत असलेल्या सुवर्णा सावे या म्हणाल्या.

नवीन सरकारने पुढच्या काळात आरेला जंगल घोषित करावं. आरेतील झाड वाचवण्यासाठी आम्ही जो संघर्ष केला हा त्याचा विजय आहे असे मुंबई विद्यापीठात शिकत असलेल्या विजय कांबळे यांनी म्हटले.

एका चांगल्या हेतूने आम्ही एकत्र आलो होतो. आरेतील झाडं वाचवण्यासाठी एकत्र येत सामान्य नागरिकांनी आंदोलन केले. यापुढे नवीन सरकारने
कारशेड स्थलांतर कराव असे आकाश पाटणकर यांनी म्हटले.

मी दुकानातून घरी आलो आणि मुलीच रडणं बघून मी इथे आलो होतो. झाडांसाठी
सहानभूती व्यक्त करण्यासाठी मी आलो होतो, तेव्हा पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन अटक केली. आता आम्हाला दिलासा वाटत असल्याचे के.रेड्डी म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Dec 2, 2019, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.