कोल्हापूर : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने ( Central Government's Agneepath Scheme ) विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशात अनेक राज्यांमध्ये या आंदोलनास हिंसक वळण लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या योजनेला महाराष्ट्रातदेखील आता विरोध होत असून ( Opposition to Agneepath in Maharashtra too ), कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज अग्निपथविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन ( Opposition to Agneepath in Kolhapur ) करण्यात येत आहे. तर हे आंदोलन टेंबलाई देवीच्या मंदिरापासून सुरू होणार असल्याने मंदिराजवळ पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त असून, छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पोलिसांचे आंदोलन न करण्याचे आवाहन : पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कालच आंदोलन न करण्याचे आवाहन केल्याने आंदोलक व पोलिस प्रशासन यांच्यामध्ये झटापट होण्याची शक्यता आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, या योजनेत अनेक त्रुटी आहेत. चार वर्षांच्या नोकरीनंतर भविष्यातील पुढील हमी काय आहे. केवळ चार वर्षांकरिता विद्यार्थ्यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आमचा या योजनेला तीव्र विरोध असणार आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आंदोलनावर ठाम असून, गनिमी कावा पद्धतीने हे आंदोलन करणार आहेत. आंदोलकांशी बातचीत केली आहे, आमचे "ई-टीव्ही"चे प्रतिनिधी नयन यादवाड यांनी..
हेही वाचा : RJD Leader Tejaswi Yadav: अग्निपथ योजनेवरुन तेजस्वी यादवने सरकारवर साधला निशाना