ETV Bharat / city

धावत्या रेल्वेत गुटखा विक्रीच्या वादातून झालेल्या राड्यात एक गंभीर, दोघे अटकेत - train

कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेत फेरीवाल्यांमध्ये गुटखा विक्री करण्यावरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, राडा करणाऱ्या दोघांनी एकाला बेदम मारहाण करत त्याच्यावर चाकू व ब्लेडने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी राडेबाजांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपीना न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

v
author img

By

Published : Oct 16, 2021, 7:44 PM IST

ठाणे - कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेत फेरीवाल्यांमध्ये गुटखा विक्री करण्यावरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, राडा करणाऱ्या दोघांनी एकाला बेदम मारहाण करत त्याच्यावर चाकू व ब्लेडने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी राडेबाजांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अंकुश सरोज (रा. अंबरनाथ), मोहम्मद शेख (रा. कुर्ला), असे अटक आरोपींची नावे आहेत. पवन गुप्ता, असे जखमी फेरीवाल्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माहिती देताना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

धावत्या रेल्वेमध्येच घटना, प्रवाशांमध्ये गोंधळ

कल्याण स्थानकातून शुक्रवारी (दि. 15) सायंकाळच्या सुमारास उत्तरप्रदेशला जाणारी गोरखपूर एक्सप्रेस रवाना झाली. त्यावेळी बोगी क्रमांक एस 5 मध्ये उल्हासनगरमध्ये राहणारा सराईत गुन्हेगार पवन आणि आरोपीमध्ये गुटखा विक्रीवरुन झालेल्या जुन्या भांडणांचा वाद पुन्हा झाला. त्यावेळी आरोपी अंकुश आणि मोहम्मद तसेच त्यांच्या एका साथीदाराने मिळून पवनवर धावत्या रेल्वेतच धारदार चाकू व ब्लेडने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना पाहताच प्रवाशांमध्ये गोधंळ उडाला होता.

आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत पवन नाशिकपर्यंत तसाच पडून होता. त्यांनतर त्याला नाशिक लोहमार्ग पोलिसांनी रुग्णालयात दाखल करून त्याच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. रेल्वे पोलिसांनी काही तासातच दोन आरोपींना अटक केली तर त्यांच्या एका साथीदार शोध आहे. अटक आरोपींना आज (दि. 16) रेल्वे न्यायालयात हजर केले असता, दोघांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दूल यांनी दिली आहे.

स्थानकातील रेल्वे सुरक्षा व्यवस्था करते काय..?

मध्य रेल्वेच्या स्थानकात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळत नसताना चोरटे, गर्दुल्ले, फेरीवाले, दरोडेखोर रेल्वेत कसे प्रवेश करू शकतात, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. शिवाय स्थानकातील रेल्वे सुरक्षा व्यवस्था करते काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा - कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांची वादग्रस्त दबंगगिरी; नाकाबंदीदरम्यान दुचाकीस्वाराचे फोडले डोके

ठाणे - कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेत फेरीवाल्यांमध्ये गुटखा विक्री करण्यावरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, राडा करणाऱ्या दोघांनी एकाला बेदम मारहाण करत त्याच्यावर चाकू व ब्लेडने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी राडेबाजांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अंकुश सरोज (रा. अंबरनाथ), मोहम्मद शेख (रा. कुर्ला), असे अटक आरोपींची नावे आहेत. पवन गुप्ता, असे जखमी फेरीवाल्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माहिती देताना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

धावत्या रेल्वेमध्येच घटना, प्रवाशांमध्ये गोंधळ

कल्याण स्थानकातून शुक्रवारी (दि. 15) सायंकाळच्या सुमारास उत्तरप्रदेशला जाणारी गोरखपूर एक्सप्रेस रवाना झाली. त्यावेळी बोगी क्रमांक एस 5 मध्ये उल्हासनगरमध्ये राहणारा सराईत गुन्हेगार पवन आणि आरोपीमध्ये गुटखा विक्रीवरुन झालेल्या जुन्या भांडणांचा वाद पुन्हा झाला. त्यावेळी आरोपी अंकुश आणि मोहम्मद तसेच त्यांच्या एका साथीदाराने मिळून पवनवर धावत्या रेल्वेतच धारदार चाकू व ब्लेडने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना पाहताच प्रवाशांमध्ये गोधंळ उडाला होता.

आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत पवन नाशिकपर्यंत तसाच पडून होता. त्यांनतर त्याला नाशिक लोहमार्ग पोलिसांनी रुग्णालयात दाखल करून त्याच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. रेल्वे पोलिसांनी काही तासातच दोन आरोपींना अटक केली तर त्यांच्या एका साथीदार शोध आहे. अटक आरोपींना आज (दि. 16) रेल्वे न्यायालयात हजर केले असता, दोघांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दूल यांनी दिली आहे.

स्थानकातील रेल्वे सुरक्षा व्यवस्था करते काय..?

मध्य रेल्वेच्या स्थानकात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळत नसताना चोरटे, गर्दुल्ले, फेरीवाले, दरोडेखोर रेल्वेत कसे प्रवेश करू शकतात, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. शिवाय स्थानकातील रेल्वे सुरक्षा व्यवस्था करते काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा - कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांची वादग्रस्त दबंगगिरी; नाकाबंदीदरम्यान दुचाकीस्वाराचे फोडले डोके

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.