ETV Bharat / city

लसींचा तुटवड्यात तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ, 45 वर्षांवरील लगरिकांचे लसीकरण ठप्प

author img

By

Published : May 1, 2021, 6:34 PM IST

औरंगाबाद शहरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास मुकुंदवाडी आरोग्य केंद्रात वय वर्षे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

लसीकरण
लसीकरण

औरंगाबाद - शहरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास मुकुंदवाडी आरोग्य केंद्रात वय वर्षे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी तीन आरोग्य केंद्रांवर तीनशे नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

माहिती देताना डॉ. पाडळकर

तिसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध झाल्या लस

महाराष्ट्र दिना निमित्त महाराष्ट्रात वय वर्षे 18 ते 44 पर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार नियोजन करून शनिवारपासून (दि. 1 मे) लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या लसीकरण मोहिमेसाठी शहरासाठी जिल्ह्याला 7 हजार लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात तीन हजार सातशे लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

जिल्ह्यात पाच ठिकाणी सुरू करण्यात आले लसीकरण

लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करत असताना उपलब्ध लसीनुसार लसीकरण केले जाणार आहे. शहरात मुकुंदवाडी, सादातनगर, कैसर कॉलनी आरोग्य केंद्रावर तर ग्रामीण भागात खुलताबाद आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. लस घेण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. लस घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड आवश्यक असणार आहे. कोविन अँपवर नोंदणी झालेल्यांना दुपारी 2 ते 6 यावेळेत लस दिली जाणार आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. नीता पाडळकर यांनी केले.

लस नसल्याने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे. आठ दिवसांमध्ये दोन वेळा लसींचा साठा नसल्याने लसीकरण मोहीम बंद पडली होती. महापालिकेने 5 एप्रिलपासून 115 वार्डात लसीकरण केंद्र सुरू केले. त्याठिकाणी आतापर्यंत 2 लाख 34 हजार नागरिकांच्या लसीकरण पूर्ण झाले आहेत. मागील आठवड्यात दीड लाख लसींची मागणी केली असता फक्त पंचवीस हजार मिळू शकले आहेत. त्यानंतर चार हजार लसींचा पुरवठा करण्यात आला. मात्र, या लस संपल्यानंतर शुक्रवारी लसीकरण मोहीम पुन्हा एकदा थांबवण्यात आली. लसींचा अजून मागणी केली असून अद्याप साठा आलेला नाही. सोमवार किंवा त्यानंतर लसींचा साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नागरिकांनी विनाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.

हेही वाचा - 4 वर्षाच्या चिमुकल्याने केली कोरोनासह हृदयरोगावर मात

औरंगाबाद - शहरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास मुकुंदवाडी आरोग्य केंद्रात वय वर्षे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी तीन आरोग्य केंद्रांवर तीनशे नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

माहिती देताना डॉ. पाडळकर

तिसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध झाल्या लस

महाराष्ट्र दिना निमित्त महाराष्ट्रात वय वर्षे 18 ते 44 पर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार नियोजन करून शनिवारपासून (दि. 1 मे) लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या लसीकरण मोहिमेसाठी शहरासाठी जिल्ह्याला 7 हजार लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात तीन हजार सातशे लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

जिल्ह्यात पाच ठिकाणी सुरू करण्यात आले लसीकरण

लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करत असताना उपलब्ध लसीनुसार लसीकरण केले जाणार आहे. शहरात मुकुंदवाडी, सादातनगर, कैसर कॉलनी आरोग्य केंद्रावर तर ग्रामीण भागात खुलताबाद आणि जिल्हा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. लस घेण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. लस घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड आवश्यक असणार आहे. कोविन अँपवर नोंदणी झालेल्यांना दुपारी 2 ते 6 यावेळेत लस दिली जाणार आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. नीता पाडळकर यांनी केले.

लस नसल्याने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे. आठ दिवसांमध्ये दोन वेळा लसींचा साठा नसल्याने लसीकरण मोहीम बंद पडली होती. महापालिकेने 5 एप्रिलपासून 115 वार्डात लसीकरण केंद्र सुरू केले. त्याठिकाणी आतापर्यंत 2 लाख 34 हजार नागरिकांच्या लसीकरण पूर्ण झाले आहेत. मागील आठवड्यात दीड लाख लसींची मागणी केली असता फक्त पंचवीस हजार मिळू शकले आहेत. त्यानंतर चार हजार लसींचा पुरवठा करण्यात आला. मात्र, या लस संपल्यानंतर शुक्रवारी लसीकरण मोहीम पुन्हा एकदा थांबवण्यात आली. लसींचा अजून मागणी केली असून अद्याप साठा आलेला नाही. सोमवार किंवा त्यानंतर लसींचा साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नागरिकांनी विनाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.

हेही वाचा - 4 वर्षाच्या चिमुकल्याने केली कोरोनासह हृदयरोगावर मात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.