ETV Bharat / city

Sanjay Raut : "मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून..."; संजय राऊतांचा मनसेवर निशाणा - संजय राऊत मराठी बातमी

काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असा निशाणा राऊतांनी मनसेवर साधला ( sanjay raut criticized mns ) आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Jun 8, 2022, 8:22 PM IST

Updated : Jun 8, 2022, 8:40 PM IST

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा सुरु आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेसाठी शिवसेनेने ताकद लावली आहे. या सभेत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असा निशाणा राऊतांनी मनसेवर साधला ( sanjay raut criticized mns ) आहे.

संजय राऊत म्हणाले की, औरंगाबादमधील जनसमुदायाच्या लाटांचा फटका भाजपाला बसला तर पाणी मागायला देखील उठणार नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उठलेली जनतेची ही लाट दिल्लीला देखील झटका देईल. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'...तर भाजपाच्या नामर्द लोकांनी काश्मिरमध्ये जावं' - काश्मिरी पंडितांच्या पलायनावरुन संजय राऊतांनी भाजपावर टिकास्त्र सोडले आहे. आक्रोश पाहायचा असेल तर भाजपाच्या नामर्द लोकांनी जम्मू काश्मिरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा. रोज अतिरेक्यांचे हिंदूंवर भ्याड हल्ले होत आहे. गेल्या २ महिन्यांत काश्मिरमध्ये २७ काश्मिरी पंडीत, हिंदूंची घरात घुसून हत्या झाली आणि सरकार नामर्दासारखे हातावर हात ठेवून बसले आहे, असे म्हणत राऊतांनी केंद्रावर टीकेचे बाण सोडले आहेत.

हेही वाचा - MLC Election : महाविकास आघाडी एकत्र येणे म्हणजे घोडेबाजार नव्हे - विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा सुरु आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेसाठी शिवसेनेने ताकद लावली आहे. या सभेत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसेवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असा निशाणा राऊतांनी मनसेवर साधला ( sanjay raut criticized mns ) आहे.

संजय राऊत म्हणाले की, औरंगाबादमधील जनसमुदायाच्या लाटांचा फटका भाजपाला बसला तर पाणी मागायला देखील उठणार नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उठलेली जनतेची ही लाट दिल्लीला देखील झटका देईल. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'...तर भाजपाच्या नामर्द लोकांनी काश्मिरमध्ये जावं' - काश्मिरी पंडितांच्या पलायनावरुन संजय राऊतांनी भाजपावर टिकास्त्र सोडले आहे. आक्रोश पाहायचा असेल तर भाजपाच्या नामर्द लोकांनी जम्मू काश्मिरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा. रोज अतिरेक्यांचे हिंदूंवर भ्याड हल्ले होत आहे. गेल्या २ महिन्यांत काश्मिरमध्ये २७ काश्मिरी पंडीत, हिंदूंची घरात घुसून हत्या झाली आणि सरकार नामर्दासारखे हातावर हात ठेवून बसले आहे, असे म्हणत राऊतांनी केंद्रावर टीकेचे बाण सोडले आहेत.

हेही वाचा - MLC Election : महाविकास आघाडी एकत्र येणे म्हणजे घोडेबाजार नव्हे - विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

Last Updated : Jun 8, 2022, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.