औरंगाबाद : (Aurangabad Division) मराठवाड्यात सुरू असलेल्या भीषण पावसाचा तडाखा सर्वसामान्यांना बसत आहे. मागील दहा दिवसात झालेल्या पावसामुळे ३४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर लहान मोठी अशी तब्बल ३५१ जनावर वाहत्या पाण्यात वाहून गेली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने (Marathwada District Administration) दिली आहे.
जिल्हा प्रशासनाची माहीती : जुलै महिन्यात पाऊस वाढला:मराठवाड्यात जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने यंदा शेतकऱ्यांची चिंता वाढेल अशी परिस्थिती असताना जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद विभागात नांदेड, हिंगोली भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यात पावसामुळे ३४ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात वीज पडल्याने २४ जणांचा तर ९ जनांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तसेच, लहान मोठी अशी ३५१ जनावर दगावली आहेत. त्यात २५१ दुधाळ जनावरांच्या समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पुराचा अनेक गावांना विळखा : जुलै महिन्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना पावसाने झोडपले. त्यात औरंगाबाद विभागात ३९० गावांना पुराचा विळखा बसला होता. त्यात हिंगोली ६२, नांदेड ३१०, बीड १, लातूर ८, उस्मानाबाद ३ या गावांचा समावेश आहे. तर औरंगाबादच्या गंगापूर जवळील १५ गावांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर सर्व ठिकाणी जिल्हा प्रशासनाने तातडीच्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा : Sangli Rain : जिल्ह्यात पाऊसाचा जोर मंदावला; चांदोलीत अतिवृष्टी कायम