ETV Bharat / city

ऑनलाइन व्यापार बंद केला तरच लॉकडाऊनला करणार सहकार्य, औरंगाबादच्या व्यापाऱ्यांचा निर्णय

author img

By

Published : Apr 12, 2021, 3:05 PM IST

Updated : Apr 12, 2021, 3:21 PM IST

राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत नवीन निर्बंध लावत अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध करत आजपासून व्यवसाय सुरू करण्याची भूमिका घेतली, मात्र त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे औरंगाबादेत पाहायला मिळालं.

Aurangabad traders
Aurangabad traders

औरंगाबाद - राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत नवीन निर्बंध लावत अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध करत आजपासून व्यवसाय सुरू करण्याची भूमिका घेतली, मात्र त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे औरंगाबादेत पाहायला मिळालं. व्यापारी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली मात्र पोलिसांनी तातडीने ती बंद देखील करायला लावली.ऑनलाईन व्यवसाय बंद करा..

राज्य सरकारने बाजारपेठ बंद केल्या असल्या तरी ऑनलाईन व्यवसाय मात्र सुरूच आहे. छोट्या वस्तूंपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाइन पुरवल्या जात आहेत. त्यामुळे गरीब व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. सरकारने सर्व बाजारपेठा बंद केल्या असल्यातरी मागील बाजूने चोरटा व्यापार सुरूच ठेवला आहे. त्याचबरोबर होम डिलिव्हरी देणाऱ्यांची कोरोना चाचणी केलेली नसते. त्यांच्या माध्यमातून आजाराचा प्रसार होत नाही का? असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला. राज्य सरकारने केलेले धोरणच चुकीचे असल्याने जोपर्यंत ऑनलाइन व्यापार बंद होत नाही, तोपर्यंत व्यावसायिक सरकारला मदत करणार नाहीत. अशी भूमिका औरंगाबाद व्यापारी महासंघाने घेतली आहे.

व्यापारी आघाडीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, उपाध्यक्ष अजय शहा आणि प्रफुल मालानी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..

औरंगाबादमध्ये व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम..

सरकारने बंधने घातलेली असताना व्यापारी महासंघाने रात्री उशिरा आजपासून व्यवसाय सुरू करण्याची घोषणा केली. सकाळी अनेक व्यावसायिकांनी आपली दुकान उघडली, मात्र पोलिसांनी ती लगेच बंद करायला लावली. मात्र व्यापारी आघाडीने दुकान उघडण्याचे आवाहन केले. गेल्या दहा दिवसांपासून व्यापार बंद असल्याने अनेक कामे रखडली आहेत. कामावर असणाऱ्यांचे वेतन, बँकेची राहिलेली कामे करणे गरजेचे आहे. लोकांना देखील आवश्यक साहित्य विकत घेणे गरजेचे आहे. त्यात पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे पुढील निर्णय होई पर्यंत दुकान घडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती व्यापारी आघाडीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावला तरच व्यापारी सरकारला सहकार्य करतील, अन्यथा नाही अशी भूमिका व्यापारी आघाडीने घेतल्याने प्रशासन विरुद्ध व्यापारी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आता राज्य सरकार काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद - राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत नवीन निर्बंध लावत अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध करत आजपासून व्यवसाय सुरू करण्याची भूमिका घेतली, मात्र त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे औरंगाबादेत पाहायला मिळालं. व्यापारी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली मात्र पोलिसांनी तातडीने ती बंद देखील करायला लावली.ऑनलाईन व्यवसाय बंद करा..

राज्य सरकारने बाजारपेठ बंद केल्या असल्या तरी ऑनलाईन व्यवसाय मात्र सुरूच आहे. छोट्या वस्तूंपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाइन पुरवल्या जात आहेत. त्यामुळे गरीब व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. सरकारने सर्व बाजारपेठा बंद केल्या असल्यातरी मागील बाजूने चोरटा व्यापार सुरूच ठेवला आहे. त्याचबरोबर होम डिलिव्हरी देणाऱ्यांची कोरोना चाचणी केलेली नसते. त्यांच्या माध्यमातून आजाराचा प्रसार होत नाही का? असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला. राज्य सरकारने केलेले धोरणच चुकीचे असल्याने जोपर्यंत ऑनलाइन व्यापार बंद होत नाही, तोपर्यंत व्यावसायिक सरकारला मदत करणार नाहीत. अशी भूमिका औरंगाबाद व्यापारी महासंघाने घेतली आहे.

व्यापारी आघाडीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, उपाध्यक्ष अजय शहा आणि प्रफुल मालानी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..

औरंगाबादमध्ये व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम..

सरकारने बंधने घातलेली असताना व्यापारी महासंघाने रात्री उशिरा आजपासून व्यवसाय सुरू करण्याची घोषणा केली. सकाळी अनेक व्यावसायिकांनी आपली दुकान उघडली, मात्र पोलिसांनी ती लगेच बंद करायला लावली. मात्र व्यापारी आघाडीने दुकान उघडण्याचे आवाहन केले. गेल्या दहा दिवसांपासून व्यापार बंद असल्याने अनेक कामे रखडली आहेत. कामावर असणाऱ्यांचे वेतन, बँकेची राहिलेली कामे करणे गरजेचे आहे. लोकांना देखील आवश्यक साहित्य विकत घेणे गरजेचे आहे. त्यात पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे पुढील निर्णय होई पर्यंत दुकान घडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती व्यापारी आघाडीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावला तरच व्यापारी सरकारला सहकार्य करतील, अन्यथा नाही अशी भूमिका व्यापारी आघाडीने घेतल्याने प्रशासन विरुद्ध व्यापारी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आता राज्य सरकार काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Apr 12, 2021, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.