औरंगाबाद रक्षाबंधन ( Rakshabandhan festival 2022) म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचा दिवस आपण सर्वजण साजरा करतो. बहिणीकडून राखी बांधून घेत भाऊ तिला आयुष्यभर सोबत राहण्याचे आश्वासन देतो. मात्र आज आधुनिक काळात राखीचे स्वरूप बदलले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या राखी मधून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या सणा सोबत पर्यावरणाचे पावित्र्य राखण्यासाठी आनंदी फाउंडेशन ( Anandi Foundation Aurangabad ) गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण पूरक राखी ( Eco Friendly Rakhi ) तयार कारण्याचे काम करत आहे. त्यातून महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.
पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती - रक्षाबंधन ( Rakshabandhan festival 2022) म्हणलं की बहिण आपल्या भावासाठी सुंदर राखी घेतोच. सर्वात चांगली आणि आकर्षक राखी आपल्याच भावाच्या हातात असावी अस प्रत्येक बहिणीला वाटत. त्यातच बाजारात आकर्षक राख्या विक्रीसाठी येतात. त्यात बहुतांश राख्या पर्यावरणाला हानीकारक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच भाजप नेत्या विजया रहाटकर यांच्या सोबत आनंदी फाउंडेशन दर वर्षी पर्यावरण पूरक राखी तयार करण्याचे काम करत आहे. यावर्षी देखील असाच उपक्रम राबवत सुती आणि लोकरच्या माध्यमातून राखी तयार करण्यात आल्या आहेत. सुत, लोकर पासून फुल, पान, दोरा तयार करून राखी तयार करण्यात आली आहे. ज्याने पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही. तर काही भाग क्ले पासून तयार करण्यात आला आहे जेणे करून राखी आकर्षक देखील वाटेल आणि पर्यावरणाला हानी देखील होणार नाही अशी माहिती विजया रहाटकर ( Vijaya Rahatkar Aurangabad ) आणि संस्थेच्या विभावरी भालेराव यांनी दिली.
महिलांना मिळतो रोजगार - आजच्या आधुनिक जगात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. राखी देखील यंत्रावर तयार केली जात आहे. मात्र आनंदी फाउंडेशन महिलांच्या माध्यमातून हाताने तयार केलेल्या राख्या तयार करते. या माध्यमातून यावर्षी पाच ते सहा हजार राख्या तयार करण्यात आल्या. त्यामधून चाळीस गरजू महिलांना रोजगार देण्याचे काम करण्यात आले. बाजार पेठेत राखी विक्रीसाठी देताना, लागलेला खर्च फक्त व्यावसायिकांकडून घेण्यात आला. ना नफा ना तोटा तत्वावर दर वर्षी काम केले जाते. उद्देश फक्त एकच पर्यावरण रक्षण आणि म्हणूनच छोटा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आनंदी फाउंडेशनच्या वतीने भाजप नेत्या विजया रहाटकर आणि संस्थेच्या विभावरी भालेराव यांनी दिली.
सैन्यातील जवानांना पाठवल्या जातात राख्या बहिणीचे रक्षण करण्याचे काम भाऊ करत असतात. त्यामुळे देशाचे रक्षण करणारे आपले भारतीय जवान मोलाचे आहेत. आपल कर्तव्य बजावत असताना त्यांना सणासाठी घरी येणे शक्य होत नाही. त्यामुळेच ते एकटे नाहीत. त्यांच्या बहिणी आणि देश त्यांच्या सोबत आहे. याचा विश्वास देण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांमर्फत पाचशे राख्या, संस्थेच्या वतीने सीमेवर पाठवण्यात येतात. मागील काही वर्षांपासून राखी तयार झाल्या की पहिला मान सैन्याला दिला जातो.
मागील वर्ष झाडांच्या बियांपासून राखी तयार करण्यात आली होती यावर्षी सुती राखी तयार करण्यात आली आहे. तर मागील वर्ष झाडांच्या बियांपासून राखी तयार करण्यात आली होती. रक्षाबंधन झाल्यावर ही राखी खड्ड करून जमिनीत टाकल्यास त्यातून झाड उगेल आणि पर्यावरण समतोल राखला जाईल असा प्रयत्न केला गेला. त्याच बरोबर आनंदी फाउंडेशन तर्फे इतरही सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात महिलांना मोफत रांगोळी प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, देवांचे वस्त्र तयार करण्याचे काम दिले जाते. यातून महिलांना सक्षम करण्याचे काम केले जाते अस मत आनंदी फाउंडेशनच्या विभावरी भालेराव यांनी सांगितलं.
हेही वाचा : Rakshabandhan 2022 अशी सजवा रक्षाबंधन थाळी