ETV Bharat / city

पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना जोड्याने मारले पाहिजे, आमदार बच्चू कडू यांचा दलबदलू नेत्यांवर 'प्रहार'

सत्ता लालसेपोटी विचारधारेला तिलांजली देणाऱ्या नेत्यांनी पक्ष बदलल्यास अशा नेत्यांना जोड्याने मारले पाहिजे, असा जोरदार 'प्रहार' भाजपच्या मेघाभरतीत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

author img

By

Published : Aug 3, 2019, 6:15 PM IST

Updated : Aug 3, 2019, 6:50 PM IST

पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना जोड्याने मारले पाहिजे - आमदार बच्चू कडू

अमरावती - प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील दलबदलू नेत्यांवर जोरदार 'प्रहार' केला आहे. भाजपात सध्या मेघाभरती सुरू आहे. अशा वेळी दहा-दहा वर्षे आमदार, खासदार, मंत्री राहिलेले नेतेही भाजपात प्रवेश करत आहेत, अशा नेत्यांना जोड्याने मारले पाहीजे अशी टिका बच्चू कडू यांनी अमरावती येथे माध्यमांसोबत बोलताना केली आहे.

पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना जोड्याने मारले पाहिजे, आमदार बच्चू कडू यांचा दलबदलू नेत्यांवर प्रहार

नेमके काय म्हणाले बच्चू कडू ?

आमदार होण्यासाठी पक्ष बदलणारे नेते हे लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही

देशात मैदानात फक्त भाजप हाच एकच पैलवान दिसत आहे. त्यामुळे आता लढाई होणार की नाही, हाच खरा प्रश्न आहे. राज्यात 10 वर्षे सत्तेत राहुन मंत्रीपद भोगलेले नेते भाजपात सत्तेसाठी प्रवेश करत आहे. सत्तेसाठी आणि फक्त आमदार होण्यासाठी पक्ष बदलणारे नेते हे लोकप्रतिनिधी होऊच शकत नाही.

ईव्हीएमचा दुरुपयोग हा दहशतवादापेक्षाही मोठा धोका

ईव्हीएम मशीनचा जो दुरुपयोग होत आहे, तो दहशतवाद पेक्षाही मोठा धोका आहे. सामान्य माणसाचा असलेला मुलभूत अधिकारच जर हिरावला तर हे राष्ट्र हितासाठी मोठे घातक होऊ शकते. भाजपमध्ये दम असेल आणि खरच 56 इंचाची छाती असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर निवडणूक लढवावी.

काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्तेवर आल्यावर ईव्हीएम वापरणार नाही असे शपथपत्र द्यावे

मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सध्या ईव्हीएम विरोधात एकत्र झाले आहेत. त्यांच्या सोबत जायचे की नाही तो आमच्या पक्षाचा निर्णय आहे. पण काँग्रेसवाले जर सत्तेवर आले तर त्यांनी आम्हीही ईव्हीएम मशीन स्वीकारणार नाही, असे शपथपत्र द्यावे. या शिवाय मजा येणार नाही. असा सल्ला बच्चू कडू यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला दिला आहे.

मुख्यमंत्री पदाचा वापर पक्ष बांधणीसाठी होत आहे हे मोठे दुर्दैव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही, मुख्यमंत्री पदाचा उपयोग घेऊन पक्ष बांधणीचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री यांचा वापर जर पक्ष बांधणीसाठी होत असेल तर हे मोठे दुर्दैव आहे. ही महाजनादेश यात्रा नसून आदेश देणारी यात्रा आहे असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

अमरावती - प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील दलबदलू नेत्यांवर जोरदार 'प्रहार' केला आहे. भाजपात सध्या मेघाभरती सुरू आहे. अशा वेळी दहा-दहा वर्षे आमदार, खासदार, मंत्री राहिलेले नेतेही भाजपात प्रवेश करत आहेत, अशा नेत्यांना जोड्याने मारले पाहीजे अशी टिका बच्चू कडू यांनी अमरावती येथे माध्यमांसोबत बोलताना केली आहे.

पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना जोड्याने मारले पाहिजे, आमदार बच्चू कडू यांचा दलबदलू नेत्यांवर प्रहार

नेमके काय म्हणाले बच्चू कडू ?

आमदार होण्यासाठी पक्ष बदलणारे नेते हे लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही

देशात मैदानात फक्त भाजप हाच एकच पैलवान दिसत आहे. त्यामुळे आता लढाई होणार की नाही, हाच खरा प्रश्न आहे. राज्यात 10 वर्षे सत्तेत राहुन मंत्रीपद भोगलेले नेते भाजपात सत्तेसाठी प्रवेश करत आहे. सत्तेसाठी आणि फक्त आमदार होण्यासाठी पक्ष बदलणारे नेते हे लोकप्रतिनिधी होऊच शकत नाही.

ईव्हीएमचा दुरुपयोग हा दहशतवादापेक्षाही मोठा धोका

ईव्हीएम मशीनचा जो दुरुपयोग होत आहे, तो दहशतवाद पेक्षाही मोठा धोका आहे. सामान्य माणसाचा असलेला मुलभूत अधिकारच जर हिरावला तर हे राष्ट्र हितासाठी मोठे घातक होऊ शकते. भाजपमध्ये दम असेल आणि खरच 56 इंचाची छाती असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर निवडणूक लढवावी.

काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्तेवर आल्यावर ईव्हीएम वापरणार नाही असे शपथपत्र द्यावे

मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सध्या ईव्हीएम विरोधात एकत्र झाले आहेत. त्यांच्या सोबत जायचे की नाही तो आमच्या पक्षाचा निर्णय आहे. पण काँग्रेसवाले जर सत्तेवर आले तर त्यांनी आम्हीही ईव्हीएम मशीन स्वीकारणार नाही, असे शपथपत्र द्यावे. या शिवाय मजा येणार नाही. असा सल्ला बच्चू कडू यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला दिला आहे.

मुख्यमंत्री पदाचा वापर पक्ष बांधणीसाठी होत आहे हे मोठे दुर्दैव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही, मुख्यमंत्री पदाचा उपयोग घेऊन पक्ष बांधणीचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री यांचा वापर जर पक्ष बांधणीसाठी होत असेल तर हे मोठे दुर्दैव आहे. ही महाजनादेश यात्रा नसून आदेश देणारी यात्रा आहे असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

Intro:पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना जोड्यांन हाणलं पाहिजे
भाजपच्या मेघाभरतीत सहभागी नेत्यांवर आ बच्चू कडू यांचा प्रहार

अमरावती अँकर
भारतीय जनता पक्षात काँग्रेस राष्ट्रवादीचे आजी माजी आमदार व नेत्यांचा प्रवेश होत आहे,भाजप मध्ये सुरू असलेल्या या मेघाभरीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडत पक्ष बदलण्याऱ्या नेत्यांना जोड्यांन हांनल पाहिजे अशी टीका बच्चू कडू यांनी केली
आज अमरावतीत बच्चू कडू प्रसार माध्यमांशी बोलत होते, देशात मैदानात फक्त भाजप हाच एकच पैलवान दिसतं आहे, आता लढाई होणार की नाही हा खरा प्रश्न आहे, त्यात 10 वर्षे सत्तेत राहुन मंत्रीपद भोगलेले नेते भाजपात सत्तेसाठी प्रवेश करत आहे खरं तर सत्तेसाठी पक्ष बदलणारे नेते हे लोकप्रतिनिधी होऊच शकतं नाही विचारधारा महत्वाची महत्त्वाची आहे त्यांना विचार महत्त्वाचा वाटतो त्यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला हे दुःखत आहे,सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेते हिजड्याची औलाद आहे अशी सणसणीत टीका बच्चू कडू यांनी केली या पक्ष बदणाऱ्या नेत्यांना मतदारांनी आता जागा दाखवली पाहिजे असे बच्चू कडू यांनी सांगितले.

यावेळी इव्हीएम मशीनवर बोलताना बच्चू कडू म्हणाले ईव्हीएम मशीनचा जो दुरुपयोग होत आहे तो दहशतवाद पेक्षा सुद्धा मोठा आहे.सामान्य माणसाचा असलेला अधिकार जर पक्षाने हिरावला तर मग राष्ट्र हितासाठी हे मोठं घातक होऊ शकतं, सामन्य माणसाचा मतदानाचा अधिकार जर अशा प्रकारे भ्रष्ट झाला तर मग मात्र या देशाच चित्र बदलल्या शिवाय राहणार नाही ,जर भाजप मध्ये दम असेल आणि 56 इंचाची छाती असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर निवडणूक लढवावी. मनसे ,काँग्रेस,राष्ट्रवादी हे सध्या ईव्हीएम विरोधात एकत्र झाले पण यांच्या सोबत एकत्र व्हायचे की नाही तो आमच्या पक्षाचा निर्णय आहे.उद्या काँग्रेस, वाले सत्तेवर जर आले तर त्यांनीही म्हटले पाहिजे की आम्हीही ईव्हीएम मशीन स्वीकारनार नाही,अस शपथ पत्र राष्ट्रवादी काँग्रेस ने दिल्या शिवाय मजा येणार नाही,नाहीतर तुम्ही मागच्या वेळेस कापसाचे भाव दिले नाही आणि यावेळेस तुम्ही जर भाव मागत असाल तर पाहिले हंटर तुम्हाला मारावे लागेल असा प्रहार बच्चू कडू यांनी काँग्रेस राष्ट्रवादी वर केला .तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करताना आ बच्चू कडू म्हणाले मुख्यमंत्री यांचा उपयोग घेऊन पक्ष बांधणीचे काम सुरू आहे,मुख्यमंत्री यांचा वावर जर पक्ष बांधणीसाठी होत असेल तर हे मोठं दुर्दैव आहे.ही महाजनादेश यात्रा नसून आदेश देणारी यात्रा आहे असही कडू म्हणालेBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Aug 3, 2019, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.