ETV Bharat / city

विशेष: अमरावतीत २३ वर्षाची अंकिता झाली गाव कारभारी; गाव आदर्श करण्याच स्वप्न...

author img

By

Published : Feb 18, 2021, 5:01 PM IST

Updated : Feb 18, 2021, 5:22 PM IST

राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या. आता गावागावात सरपंच निवडीला सुरुवात झाली आहे.

अंकिता मिलींद तायडे
अंकिता मिलींद तायडे

अमरावती - राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या. आता गावागावात सरपंच निवडीला सुरुवात झाली आहे. गावचा सरपंच म्हणजे चांगला अनुभवी व्यक्ती, राजकारणात मुरलेला असावा, त्याचं वय त्याची प्रतिष्ठा हे सर्व बघितल्या जात असते. तरी अमरावती जिल्ह्यातील शिराळा या १८ हजार लोकवस्तीच्या गावाचा गाढा २३ वर्षाची उच्च शिक्षित असलेली अंकिता मिलींद तायडे ही तरुणी हाकणार आहे. नुकतीच तिची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

अमरावतीत २३ वर्षाची अंकिता झाली गाव कारभारी


शिराळा गावात अवघ्या २३ वर्षाच्या अंकिताला सरपंचपदाची खुर्ची मिळाली असल्याने तिचे कौतुक केले जात आहे. पुढील पाच वर्षात माझं गाव आदर्श कसं होईल. याकडे भर देणार असल्याचे तिने सांगितले.

२३ वर्षाच्या तरुणीची सरपंचपदी बिनविरोध निवड-

अमरावती जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडल्या आता सरपंच पदासाठी निवड सुरू झाली आहे. त्यामुळे गावागावात गटातटाचे राजकारण सुरू आहे. त्यासाठी गावातल्या गाव पुढार्‍यांनी राजकीय खेळी खेळायला सुरवात केली आहे. आपल्या गटाचा सरपंच कसा होईल, ग्रामपंचायत वर आपला झेंडा कसा फडकेल, यासाठी गावपुढाऱ्यांची कसोटी लागली असतानाच शिराळा गावातील अंकिता मिलिंद तायडे या २३ वर्षाच्या तरुणीची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

अमरावती शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर वर शिराळा गाव आहे. या गावची लोकसंख्या १८ हजार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतमध्ये एकूण १७ सदस्य आहेत. यावर्षी या ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती जमाती साठी निघाले होते. त्यामुळे अंकिता तायडे हिची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गाव आदर्श बनवण्याचा मानस-

अंकिता तायडे ही उच्चशिक्षित असून तिचे शिक्षण एमएससी झाले आहे. त्यामुळे माझं शिक्षण माझ्या गावाच्या विकासासाठी नक्कीच कामी येईल. माझं शिक्षण पाहून गावातील लोकांनी मला निवडून दिले आहे. माझ्याकडूनही त्यांना भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून माझं शिराळा गाव कस आदर्श होईल, महाराष्ट्रात माझ्या गावाला एक वेगळी ओळख कशी मिळेल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याच नवनिर्वाचित सरपंच अंकीता तायडे यांनी सांगितले.

महिलांकडे देणार विशेष लक्ष-


मी एक महिला असून मला महिलांच्या अडचणी माहित आहे. गावात काम करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच गावातील इतर महिलांच्या सोयीसाठी विविध योजना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली आरोग्य सेवा तसेच बेघरांसाठी घरकुल, यासाठी माझा पुढाकार असल्याचे अंकीताने सांगितले.

गावात स्वच्छ पाणी हे महत्त्वाचं-

आमच्या शिराळा गावात आधीच खूप विकास झालेला आहे. परंतु जे कामे शिल्लक आहे आणि त्यापेक्षा काहीतरी नवीन चांगलं करायचा आहे. यासाठी मी झटणार असून गावातील लोकांना नेहमी स्वच्छ पाणी कसे मिळेल व गावात स्वच्छता कशी राखली जाईल, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ती म्हणाली.

तसेच अंकिता तायडे ची आई ही अमरावती पंचायत समितीची सभापती आहे म्हणून रुजू आहे. तर वडील हे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पदाधिकारी आहेत. त्यामुळे आई वडील यांच्याकडून घेतलेले राजकारणाचे व समाजकारचे धडे आणि त्यांचा समाजसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणाबरोबरच समाजकारणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नवनिर्वाचित सरपंच अंकिता तायडे यांनी सांगितले.

गावकरी म्हणून खूप अभिमान-

अवघ्या २३ वर्षाची आमच्या गावची अंकिता हे आमच्या गावाचे नेतृत्व करीत आहे. एक महिला तेही कमी वयात सरपंच पदी नियुक्त झाल्यामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे. अंकिताने आता गावातील महिलांसाठी विविध योजना राबवाव्यात, असं मत गावातील महिलांनी व्यक्त केलं.

हेही वाचा- 'अमरावती विभागात कोरोनाची परिस्थिती गंभीर; लॉकडाऊनसंदर्भात बैठकीत निर्णय घेऊ'

अमरावती - राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या. आता गावागावात सरपंच निवडीला सुरुवात झाली आहे. गावचा सरपंच म्हणजे चांगला अनुभवी व्यक्ती, राजकारणात मुरलेला असावा, त्याचं वय त्याची प्रतिष्ठा हे सर्व बघितल्या जात असते. तरी अमरावती जिल्ह्यातील शिराळा या १८ हजार लोकवस्तीच्या गावाचा गाढा २३ वर्षाची उच्च शिक्षित असलेली अंकिता मिलींद तायडे ही तरुणी हाकणार आहे. नुकतीच तिची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

अमरावतीत २३ वर्षाची अंकिता झाली गाव कारभारी


शिराळा गावात अवघ्या २३ वर्षाच्या अंकिताला सरपंचपदाची खुर्ची मिळाली असल्याने तिचे कौतुक केले जात आहे. पुढील पाच वर्षात माझं गाव आदर्श कसं होईल. याकडे भर देणार असल्याचे तिने सांगितले.

२३ वर्षाच्या तरुणीची सरपंचपदी बिनविरोध निवड-

अमरावती जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडल्या आता सरपंच पदासाठी निवड सुरू झाली आहे. त्यामुळे गावागावात गटातटाचे राजकारण सुरू आहे. त्यासाठी गावातल्या गाव पुढार्‍यांनी राजकीय खेळी खेळायला सुरवात केली आहे. आपल्या गटाचा सरपंच कसा होईल, ग्रामपंचायत वर आपला झेंडा कसा फडकेल, यासाठी गावपुढाऱ्यांची कसोटी लागली असतानाच शिराळा गावातील अंकिता मिलिंद तायडे या २३ वर्षाच्या तरुणीची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

अमरावती शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर वर शिराळा गाव आहे. या गावची लोकसंख्या १८ हजार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतमध्ये एकूण १७ सदस्य आहेत. यावर्षी या ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती जमाती साठी निघाले होते. त्यामुळे अंकिता तायडे हिची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गाव आदर्श बनवण्याचा मानस-

अंकिता तायडे ही उच्चशिक्षित असून तिचे शिक्षण एमएससी झाले आहे. त्यामुळे माझं शिक्षण माझ्या गावाच्या विकासासाठी नक्कीच कामी येईल. माझं शिक्षण पाहून गावातील लोकांनी मला निवडून दिले आहे. माझ्याकडूनही त्यांना भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून माझं शिराळा गाव कस आदर्श होईल, महाराष्ट्रात माझ्या गावाला एक वेगळी ओळख कशी मिळेल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याच नवनिर्वाचित सरपंच अंकीता तायडे यांनी सांगितले.

महिलांकडे देणार विशेष लक्ष-


मी एक महिला असून मला महिलांच्या अडचणी माहित आहे. गावात काम करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच गावातील इतर महिलांच्या सोयीसाठी विविध योजना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली आरोग्य सेवा तसेच बेघरांसाठी घरकुल, यासाठी माझा पुढाकार असल्याचे अंकीताने सांगितले.

गावात स्वच्छ पाणी हे महत्त्वाचं-

आमच्या शिराळा गावात आधीच खूप विकास झालेला आहे. परंतु जे कामे शिल्लक आहे आणि त्यापेक्षा काहीतरी नवीन चांगलं करायचा आहे. यासाठी मी झटणार असून गावातील लोकांना नेहमी स्वच्छ पाणी कसे मिळेल व गावात स्वच्छता कशी राखली जाईल, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ती म्हणाली.

तसेच अंकिता तायडे ची आई ही अमरावती पंचायत समितीची सभापती आहे म्हणून रुजू आहे. तर वडील हे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पदाधिकारी आहेत. त्यामुळे आई वडील यांच्याकडून घेतलेले राजकारणाचे व समाजकारचे धडे आणि त्यांचा समाजसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणाबरोबरच समाजकारणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नवनिर्वाचित सरपंच अंकिता तायडे यांनी सांगितले.

गावकरी म्हणून खूप अभिमान-

अवघ्या २३ वर्षाची आमच्या गावची अंकिता हे आमच्या गावाचे नेतृत्व करीत आहे. एक महिला तेही कमी वयात सरपंच पदी नियुक्त झाल्यामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे. अंकिताने आता गावातील महिलांसाठी विविध योजना राबवाव्यात, असं मत गावातील महिलांनी व्यक्त केलं.

हेही वाचा- 'अमरावती विभागात कोरोनाची परिस्थिती गंभीर; लॉकडाऊनसंदर्भात बैठकीत निर्णय घेऊ'

Last Updated : Feb 18, 2021, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.