ETV Bharat / business

तुर्कीवरून आयात केलेल्या कांद्याचे राज्यांना वितरण; 'हा' आहे भाव

author img

By

Published : Jan 7, 2020, 7:39 PM IST

चालू महिन्याखेर अतिरिक्त ३६ हजार टन कांद्याची देशात आयात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कांद्याच्या किमती कमी होण्यासाठी मदत होईल, असे रामविलास पासवान यांनी सांगितले.

onion market
कांदे बाजारपेठ

नवी दिल्ली - केंद्र सरकारने १२ हजार टन कांद्याची आयात केली आहे. हा कांदा राज्य सरकारांना ४९ ते ५८ रुपये प्रति किलो दराने वितरित केला जात असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.


रामविलास पासवान म्हणाले, आम्ही तुर्की आणि अफगाणिस्तानमधून १२ हजार टन कांद्याची आयात केली आहे. यापैकी १ हजार टन कांदा दिल्ली, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांना वितरित करण्यात आला आहे. चालू महिन्याखेर अतिरिक्त ३६ हजार टन कांद्याची देशात आयात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कांद्याच्या किमती कमी होण्यासाठी मदत होईल, असे पासवान यांनी सांगितले.

हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा झटका; विकासदर ५ टक्के राहण्याचा अंदाज

देशातील बहुतांश शहराच्या किरकोळ बाजारात गेली दोन महिने कांदा प्रति किलो १०० रुपये दराने विकण्यात आला होता. नव्या खरिप हंगामातून येणाऱ्या कांद्याची आवक आणि आयात केलेला कांदा या कारणांनी कांद्याच्या किमती होत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार मुंबईतील कांदा प्रति किलो १२० रुपयावरून ८० रुपयावर पोहोचला आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एमएमटीसीच्या माध्यमातून कांद्याची आयात केली आहे.

हेही वाचा-भारत बंदमध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी होवू देवू नये; सरकारचे बँकांना आदेश

नवी दिल्ली - केंद्र सरकारने १२ हजार टन कांद्याची आयात केली आहे. हा कांदा राज्य सरकारांना ४९ ते ५८ रुपये प्रति किलो दराने वितरित केला जात असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.


रामविलास पासवान म्हणाले, आम्ही तुर्की आणि अफगाणिस्तानमधून १२ हजार टन कांद्याची आयात केली आहे. यापैकी १ हजार टन कांदा दिल्ली, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांना वितरित करण्यात आला आहे. चालू महिन्याखेर अतिरिक्त ३६ हजार टन कांद्याची देशात आयात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कांद्याच्या किमती कमी होण्यासाठी मदत होईल, असे पासवान यांनी सांगितले.

हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा झटका; विकासदर ५ टक्के राहण्याचा अंदाज

देशातील बहुतांश शहराच्या किरकोळ बाजारात गेली दोन महिने कांदा प्रति किलो १०० रुपये दराने विकण्यात आला होता. नव्या खरिप हंगामातून येणाऱ्या कांद्याची आवक आणि आयात केलेला कांदा या कारणांनी कांद्याच्या किमती होत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार मुंबईतील कांदा प्रति किलो १२० रुपयावरून ८० रुपयावर पोहोचला आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एमएमटीसीच्या माध्यमातून कांद्याची आयात केली आहे.

हेही वाचा-भारत बंदमध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी होवू देवू नये; सरकारचे बँकांना आदेश

Intro:Body:

Dummy news


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.