नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहतुकीच्या पायाभूत सुविधा करण्यासाठी नवीन कॉरडॉिरची घोषणा केली आहे. शहरी भागात बस वाहतुकीच्या १८ हजार कोटी रुपयांच्या योजनेला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पाची घोषणा करताना त्यांनी सांगितले.
देशातील रस्त्यांसाठी १.१८ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
![वाहतूक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10456544_asdrr.png)
- शहरी भागात सार्वजनिक-सरकारी भागीदारीतून २० हजार बस सुरू करण्यात येणार
- ७०२ किमीच्या मेट्रो सुरू, १०१६ किमी आणि आरआरटीचे काम २७ शहरांत सुरू
- मुंबई-कन्याकुमारी कॉरीडोरसाठी तरतूद
- रस्ते मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटींची तरतूद
- बहुतांश बंदरे ही खासगी क्षेत्राकडे देण्यात येणार
- आसाममधील रस्त्यांसाठी अतिरिक्त ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद
- ५ हजार कोटी रस्ते विकासासाठी तरतूद
- विमानतळांचा विकास केला जाणार
- ३ हजार किलोमीटरचे रस्ते भारतमाला प्रकल्पा अंतर्गत बांधल्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. मुंबई कन्याकुमारी ६०० किमीचा रस्ता, ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
- २५ हजार कोटीचे रस्ते प. बंगालमध्ये खर्च केले जात असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
भाजपची सत्ता नसलेल्या केरळ आणि पश्चिम बंगालसाठी रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.