ETV Bharat / business

डिजीटल इंडियाला मोठा डोस.. गुगल भारतात करणार तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक

author img

By

Published : Jul 13, 2020, 3:47 PM IST

कोरोनाच्या संकटामुळे गुगल इंडियाची सहावी वार्षिक परिषद ही आज ऑनलाईन आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले, भारताच्या डिजीटायलेझेशन करण्याकरता घोषणा करताना मला अत्यंत उत्साह वाटत आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई

नवी दिल्ली – केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या डिजीटल इंडियाला गुगलकडून मोठा आधार मिळाला आहे. भारतात डिजीटालयझेशन करण्याकरता गुगल भारतात सुमारे 75 हजार कोटींची (10 अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुढील पाच वर्षांत विविध प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गुगल इंडियाची सहावी वार्षिक परिषद ही आज ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले, भारताच्या डिजीटायलेझेशन करण्याकरता घोषणा करताना मला अत्यंत उत्साह वाटत आहे. या प्रयत्नांमधून आम्ही 75 हजार कोटींची अथवा 10 अब्ज डॉलरची येत्या 5 ते 7 वर्षात गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक संमिश्र स्वरुपाची असणार आहे. त्यामध्ये भागीदारी, शेअर, देशात पायाभूत व्यवस्था चालविणे यांचा समावेश आहे. ही गुंतवणूक म्हणजे आम्हाला भारताच्या भविष्याबाबत आणि डिजीटल अर्थव्यवस्थेबाबत असलेला विश्वास यांचे प्रतिबिंब आहे.

ही गुंतवणूक भारताच्या डिजीटायझेशनसाठी महत्त्वाच्या असलेल्या चार क्षेत्रात करण्यात येणार आहे. पहिले क्षेत्र म्हणजे प्रत्येक भारतीयाला त्यांच्या भाषेत परवडणाऱ्या दरात माहिती उपलब्ध होवू शकणार आहे. दुसरे म्हणजे भारतासाठी खास असणारी नवीन उत्पादने आणि सेवांची उभारणी करणे आहे. तिसरी म्हणजे उद्योगांचे सक्षमीकरण करणे त्यामधून डिजीटल परिवतर्न घडवून आणण्यावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. चौथ्या क्षेत्रात म्हणजे आरोग्य, कृषी आणि शिक्षणासारख्या सामाजिक चांगल्या बाबींसाठी कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात गुंतवणूक करण्यात येणार आहे.

दरम्यान, सुंदर पिचाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज ऑनलाईन चर्चा झाली. ही भेट फलदायी ठरल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली – केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या डिजीटल इंडियाला गुगलकडून मोठा आधार मिळाला आहे. भारतात डिजीटालयझेशन करण्याकरता गुगल भारतात सुमारे 75 हजार कोटींची (10 अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुढील पाच वर्षांत विविध प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गुगल इंडियाची सहावी वार्षिक परिषद ही आज ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले, भारताच्या डिजीटायलेझेशन करण्याकरता घोषणा करताना मला अत्यंत उत्साह वाटत आहे. या प्रयत्नांमधून आम्ही 75 हजार कोटींची अथवा 10 अब्ज डॉलरची येत्या 5 ते 7 वर्षात गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक संमिश्र स्वरुपाची असणार आहे. त्यामध्ये भागीदारी, शेअर, देशात पायाभूत व्यवस्था चालविणे यांचा समावेश आहे. ही गुंतवणूक म्हणजे आम्हाला भारताच्या भविष्याबाबत आणि डिजीटल अर्थव्यवस्थेबाबत असलेला विश्वास यांचे प्रतिबिंब आहे.

ही गुंतवणूक भारताच्या डिजीटायझेशनसाठी महत्त्वाच्या असलेल्या चार क्षेत्रात करण्यात येणार आहे. पहिले क्षेत्र म्हणजे प्रत्येक भारतीयाला त्यांच्या भाषेत परवडणाऱ्या दरात माहिती उपलब्ध होवू शकणार आहे. दुसरे म्हणजे भारतासाठी खास असणारी नवीन उत्पादने आणि सेवांची उभारणी करणे आहे. तिसरी म्हणजे उद्योगांचे सक्षमीकरण करणे त्यामधून डिजीटल परिवतर्न घडवून आणण्यावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. चौथ्या क्षेत्रात म्हणजे आरोग्य, कृषी आणि शिक्षणासारख्या सामाजिक चांगल्या बाबींसाठी कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात गुंतवणूक करण्यात येणार आहे.

दरम्यान, सुंदर पिचाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज ऑनलाईन चर्चा झाली. ही भेट फलदायी ठरल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.