ETV Bharat / business

पतधोरण समितीचा आकृतीबंध पुन्हा बदलणार? आरबीआय घेतेय आढावा

author img

By

Published : Feb 15, 2020, 6:06 PM IST

पतधोरण समितीच्या आकृतीबंधाचे (फ्रेमवर्क) काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या आकृतीबंधाचे अंतर्गत पुनरावलोकन आणि परीक्षण करत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

monetary policy committee
पतधोरण समिती

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण समितीचा आकृतीबंध बदलण्याबाबत पुनरावलोकन करण्यात येत आहे. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. जर आवश्यकता भासली तर सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दास म्हणाले, पतधोरण समितीच्या आकृतीबंधाचे (फ्रेमवर्क) काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या आकृतीबंधाचे अंतर्गत पुनरावलोकन आणि परीक्षण करत आहोत. योग्य वेळी, त्याबाबत आवश्यकता भासली तर सरकारसोबत चर्चा करणार आहोत.

हेही वाचा-'एजीआर थकित शुल्काबाबत समस्या उद्भवल्यास अंतर्गत चर्चा करू'

आरबीआयच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने सलग दुसऱ्यांदा फेब्रुवारीत ५.१५ टक्के असा स्थिर रेपो दर ठेवला आहे. पतधोरण समितीचे सदस्य दर दोन महिन्यांनी अर्थव्यवस्थेवर चर्चा करून रेपो दर जाहीर करतात.

रेपो दर बदलण्यासाठी अथवा स्थिर ठेवण्यासाठी पतधोरण समितीचे सदस्य मत नोंदवितात. त्यानंतर बहुमताने रेपो दर कमी करणे, वाढविणे अथवा स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात येतो.

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण समितीचा आकृतीबंध बदलण्याबाबत पुनरावलोकन करण्यात येत आहे. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. जर आवश्यकता भासली तर सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दास म्हणाले, पतधोरण समितीच्या आकृतीबंधाचे (फ्रेमवर्क) काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या आकृतीबंधाचे अंतर्गत पुनरावलोकन आणि परीक्षण करत आहोत. योग्य वेळी, त्याबाबत आवश्यकता भासली तर सरकारसोबत चर्चा करणार आहोत.

हेही वाचा-'एजीआर थकित शुल्काबाबत समस्या उद्भवल्यास अंतर्गत चर्चा करू'

आरबीआयच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने सलग दुसऱ्यांदा फेब्रुवारीत ५.१५ टक्के असा स्थिर रेपो दर ठेवला आहे. पतधोरण समितीचे सदस्य दर दोन महिन्यांनी अर्थव्यवस्थेवर चर्चा करून रेपो दर जाहीर करतात.

रेपो दर बदलण्यासाठी अथवा स्थिर ठेवण्यासाठी पतधोरण समितीचे सदस्य मत नोंदवितात. त्यानंतर बहुमताने रेपो दर कमी करणे, वाढविणे अथवा स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.