ETV Bharat / briefs

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

लॉकडाऊनच्या काळात जळगाव शहरात नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक संस्था यांच्या मदतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात तीन-तीन व्यक्तींच्या 117 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या व्यक्ती घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल स्कॅनर, पल्सॲक्सीमीटरच्या माध्यमातून तपासणी करतील.

author img

By

Published : Jul 6, 2020, 7:20 PM IST

Jalgaon district collector
Jalgaon district collector

जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जळगाव महापालिका तसेच अमळनेर व भुसावळ नगरपालिका क्षेत्रात 7 ते 13 जुलै दरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जे नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, हा आहे. या कालावधीत केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, कृषी उद्योगाची दुकाने, एमआयडीसीतील उद्योग, वृत्तपत्रांची कार्यालये सुरू राहणार असून पूर्व नियोजित लग्न समारंभ 50 व्यक्तींच्या मर्यादेत तर अंत्यविधीचे कार्यक्रम 20 व्यक्तींच्या मर्यादेत करता येणार आहे.

त्याचबरोबर दूध वाटप व औषधी दुकाने दिवसभर सुरू राहणार आहेत. नागरिकांना आपल्या प्रभागात पायी जावून दूध व औषधे खरेदी करता येणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांनाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिखाधिकाऱ्यांनी केले.

प्रिस्क्रीप्शनवर औषध दिल्याची तारीख व वेळ टाकणे बंधनकारक-

अनेक नागरिक औषधे घेण्याच्या कारणाने वारंवार बाहेर फिरत असतात. त्यामुळे या कालावधीत मेडिकल दुकानदारांनी ग्राहकाला औषधे दिल्यानंतर त्या प्रिस्क्रीप्शनवर औषधे दिल्याची तारीख व वेळ टाकणे मेडिकल दुकानदारांना बंधनकारक असणार आहे. तसे न केल्यास त्या दुकानदारांवरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात या शहरांमध्ये प्रभागनिहाय बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांना काही अडचण आल्यास त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला कळवावे. त्यांच्या अडचणीचे निवारण करण्यात येईल. लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदोबस्त असणार आहे. यासाठी या शहरांमध्ये 1 हजार 200 पोलीस कर्मचारी, होमगार्ड व पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी असणार आहे.

तर, भुसावळ शहरात एसआरपीची एक तुकडीही तैनात करण्यात येणार आहे. बेशिस्त वागणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी या शहरात ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येणार आहे. तसेच शहरामध्ये येणाऱ्या रस्त्यांवरही सिलींग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. जे नागरिक कारण नसताना बाहेर फिरतील, त्यांच्यावर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करतानाच त्यांचे वाहन जप्त करण्याचा इशाराही डॉ. उगले यांनी दिला आहे.

जळगावात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी-

लॉकडाऊनच्या काळात जळगाव शहरात नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक संस्था यांच्या मदतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात 3 व्यक्तींच्या 117 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या व्यक्ती घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल स्कॅनर, पल्सॲक्सीमीटरच्या माध्यमातून तपासणी करतील. तपासणी केलेल्या नागरिकांची माहिती मोबाईल ॲपवर साठविण्यात येणार असून आवश्यकता भासणाऱ्या नागरिकांचे स्वॅब कलेक्शन मोबाईल व्हॅनमार्फत घरोघरी जाऊन घेण्यात येणार आहे.

तसेच, लॉकडाऊनमध्ये परवानगी नसलेली दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये कृषी उत्पादने विक्रीसाठी कुठलीही बंधने नसून शेतमाल व फळांची वितरण व्यवस्था कृषी विभाग तसेच शेतकरी गटांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.

जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जळगाव महापालिका तसेच अमळनेर व भुसावळ नगरपालिका क्षेत्रात 7 ते 13 जुलै दरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जे नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, हा आहे. या कालावधीत केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, कृषी उद्योगाची दुकाने, एमआयडीसीतील उद्योग, वृत्तपत्रांची कार्यालये सुरू राहणार असून पूर्व नियोजित लग्न समारंभ 50 व्यक्तींच्या मर्यादेत तर अंत्यविधीचे कार्यक्रम 20 व्यक्तींच्या मर्यादेत करता येणार आहे.

त्याचबरोबर दूध वाटप व औषधी दुकाने दिवसभर सुरू राहणार आहेत. नागरिकांना आपल्या प्रभागात पायी जावून दूध व औषधे खरेदी करता येणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांनाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिखाधिकाऱ्यांनी केले.

प्रिस्क्रीप्शनवर औषध दिल्याची तारीख व वेळ टाकणे बंधनकारक-

अनेक नागरिक औषधे घेण्याच्या कारणाने वारंवार बाहेर फिरत असतात. त्यामुळे या कालावधीत मेडिकल दुकानदारांनी ग्राहकाला औषधे दिल्यानंतर त्या प्रिस्क्रीप्शनवर औषधे दिल्याची तारीख व वेळ टाकणे मेडिकल दुकानदारांना बंधनकारक असणार आहे. तसे न केल्यास त्या दुकानदारांवरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात या शहरांमध्ये प्रभागनिहाय बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांना काही अडचण आल्यास त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला कळवावे. त्यांच्या अडचणीचे निवारण करण्यात येईल. लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदोबस्त असणार आहे. यासाठी या शहरांमध्ये 1 हजार 200 पोलीस कर्मचारी, होमगार्ड व पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी असणार आहे.

तर, भुसावळ शहरात एसआरपीची एक तुकडीही तैनात करण्यात येणार आहे. बेशिस्त वागणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी या शहरात ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येणार आहे. तसेच शहरामध्ये येणाऱ्या रस्त्यांवरही सिलींग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. जे नागरिक कारण नसताना बाहेर फिरतील, त्यांच्यावर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करतानाच त्यांचे वाहन जप्त करण्याचा इशाराही डॉ. उगले यांनी दिला आहे.

जळगावात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी-

लॉकडाऊनच्या काळात जळगाव शहरात नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक संस्था यांच्या मदतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात 3 व्यक्तींच्या 117 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या व्यक्ती घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल स्कॅनर, पल्सॲक्सीमीटरच्या माध्यमातून तपासणी करतील. तपासणी केलेल्या नागरिकांची माहिती मोबाईल ॲपवर साठविण्यात येणार असून आवश्यकता भासणाऱ्या नागरिकांचे स्वॅब कलेक्शन मोबाईल व्हॅनमार्फत घरोघरी जाऊन घेण्यात येणार आहे.

तसेच, लॉकडाऊनमध्ये परवानगी नसलेली दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये कृषी उत्पादने विक्रीसाठी कुठलीही बंधने नसून शेतमाल व फळांची वितरण व्यवस्था कृषी विभाग तसेच शेतकरी गटांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.