ETV Bharat / briefs

'चाकोरी मोडून कौशल्यपूर्ण शिक्षण कर्मवीर समूह विद्यापीठ देईल'

author img

By

Published : May 9, 2021, 4:00 PM IST

यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय यांचा पहिल्या टप्प्यात या विद्यापीठात समावेश असेल. साडेसात हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

KBP University
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ

सातारा - आतापर्यंत विद्यापीठांचा पारंपरिक अभ्यासक्रम आणि जागतिक स्तरावर चाललेले बदल यामध्ये मोठी तफावत आहे. ही दरी कमी झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना आवडीचे विषय घेण्याचा स्वातंत्र्य असले पाहिजे. पारंपरिक शिक्षणाची चाकोरी मोडून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचं काम हे समुह विद्यापीठ करेल, असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व कर्मवीरांचे पणतू डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया

सर्वकाही एकाच छताखाली -

सातारा येथे 'कर्मवीर भाऊराव पाटील स्टेट पब्लिक यूनिवर्सिटी'ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आज कर्मवीर पुण्यतिथी निमित्त डॉ. अनिल पाटील यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ते संवाद साधला. समूह विद्यापीठांची संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले, समूह विद्यापीठ हे शासकीय आहे. शासनाच्या अनुदानावर, शासकीय शुल्कामध्ये, शासनाच्या नियमाप्रमाणे चालणार आहे. परंतु अभ्यासक्रम ठरविणे, परीक्षा घेण्याचा अधिकार आणि काळाच्या गरजेप्रमाणे बदल करण्याचा अधिकार या समूह विद्यापीठाला मिळाला आहे. अभ्यासक्रमात बदल करण्याची खूप मोठी प्रक्रिया विद्यापीठात असते. ती आता थेट न राहता संस्थेकडे आली. सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री घेता येईल. पीजी, रिसर्च, पेटंट करता येईल. हे सगळे विद्यार्थ्यांना एकाच छताखाली करता येईल.

विषय निवडीचे स्वातंत्र्य -

यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय यांचा पहिल्या टप्प्यात या विद्यापीठात समावेश असेल. साडेसात हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. ही तिने महाविद्यालय 'ए प्लस' ग्रेडची असून ती स्वायत्त आहेत. कला, शास्त्र व वाणिज्य शाखेला 33 युजी कोर्सेस आहेत,13 नवीन कोर्स सुरू करत आहोत. पीजी प्लसचे 12 कोर्सेस आहेत, 12 नवे सुरू होतील. या समूह विद्यापीठात वाणिज्य, शास्त्र व कला या शाखेतील आवडीचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील.

समूह विद्यापीठामुळे उणीव दूर होईल -

समूह विद्यापीठामागील शासनाची धारणा स्पष्ट करताना डॉ. पाटील म्हणाले, "आजची विद्यापीठं ही परीक्षा घेणारी ठरली आहेत. मुलांना दर्जेदार शिक्षण, कौशल्य, रोजगाराभिमुख शिक्षण, जागतिक दर्जाचे उद्योगांना लागणारे शिक्षण मिळाले पाहिजे. उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ आणि आम्ही देत असलेलं शिक्षण यामध्ये तफावत आहे. ही उणीव भरून काढण्याचे काम खासगी संस्थांनी केले. आमच्या मुलांना कुठे शिकवावे, असे पालकांनाही वाटायला लागले. खासगी शाळा, खासगी संस्थांमध्ये शिकण्यासाठी मोठी फी मोजावी लागते. त्यामुळे दोन्हींचा मध्य काढण्यासाठी समूह विद्यापीठ ही संकल्पना उदयास आली.

ग्रामीण भागातील पहिले विद्यापीठ -

देशात सात समुह विद्यापीठे आहेत, त्यात महाराष्ट्रात 2 पण तीही मुंबईत आहेत. होमी भाभा व दुसरे हैद्राबाद सिंध तेही मुंबईतच आहे. यानंतर आता राज्यातील तिसरे आणि ग्रामीण भागातील पहिले 'कर्मवीर भाऊराव पाटील स्टेट पब्लिकने सिटी'ला मान मिळतो आहे. साताऱ्यातील शिवाजी, डीजी व सायन्स तिन्ही महाविद्यालये स्वायत्त असल्याने त्यांचं स्ट्रक्चर तयार आहे. शासनाकडून प्रक्रिया लवकर राबवली गेली तर कदाचित जुलैपर्यंत या विद्यापीठाचे कामकाज सुरू व्हायला हरकत नाही, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

अण्णांची संकल्पपूर्ती -

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1941 साली भास्करराव जाधव यांना पत्र लिहून मला विद्यापीठ काढायचे आह. तेही ग्रामीण विद्यापीठ, असा मनोदय व्यक्त केला होता. तेव्हा रयत शिक्षण संस्थेचे एकच हायस्कूल होते. पण त्यावेळीही आपण कुठे जायचे आहे? हे अण्णांचे ध्येय 80 वर्षांपूर्वी निश्चित होत. 1948 साली महात्मा गांधींच्या निधनानंतर साताऱ्यात शोकसभा झाली. त्या वेळी महात्मा गांधी यांच्या नावाने 101 हायस्कूल आणि विद्यापीठ काढण्याचा संकल्प कर्मवीर अण्णांनी जाहीर केला होता. यातला दुसरा संकल्प अण्णांच्या नावाने विद्यापीठ होत असताना पूर्णत्वास जात आहे.

हेही वाचा - उदरनिर्वाहासाठी परमिंदर कौर यांची जिद्द; नऊ वर्षांपासून नांदेडातील रामघाट स्मशानभूमीत वास्तव्य

सातारा - आतापर्यंत विद्यापीठांचा पारंपरिक अभ्यासक्रम आणि जागतिक स्तरावर चाललेले बदल यामध्ये मोठी तफावत आहे. ही दरी कमी झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना आवडीचे विषय घेण्याचा स्वातंत्र्य असले पाहिजे. पारंपरिक शिक्षणाची चाकोरी मोडून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचं काम हे समुह विद्यापीठ करेल, असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व कर्मवीरांचे पणतू डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया

सर्वकाही एकाच छताखाली -

सातारा येथे 'कर्मवीर भाऊराव पाटील स्टेट पब्लिक यूनिवर्सिटी'ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आज कर्मवीर पुण्यतिथी निमित्त डॉ. अनिल पाटील यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ते संवाद साधला. समूह विद्यापीठांची संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले, समूह विद्यापीठ हे शासकीय आहे. शासनाच्या अनुदानावर, शासकीय शुल्कामध्ये, शासनाच्या नियमाप्रमाणे चालणार आहे. परंतु अभ्यासक्रम ठरविणे, परीक्षा घेण्याचा अधिकार आणि काळाच्या गरजेप्रमाणे बदल करण्याचा अधिकार या समूह विद्यापीठाला मिळाला आहे. अभ्यासक्रमात बदल करण्याची खूप मोठी प्रक्रिया विद्यापीठात असते. ती आता थेट न राहता संस्थेकडे आली. सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री घेता येईल. पीजी, रिसर्च, पेटंट करता येईल. हे सगळे विद्यार्थ्यांना एकाच छताखाली करता येईल.

विषय निवडीचे स्वातंत्र्य -

यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय यांचा पहिल्या टप्प्यात या विद्यापीठात समावेश असेल. साडेसात हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. ही तिने महाविद्यालय 'ए प्लस' ग्रेडची असून ती स्वायत्त आहेत. कला, शास्त्र व वाणिज्य शाखेला 33 युजी कोर्सेस आहेत,13 नवीन कोर्स सुरू करत आहोत. पीजी प्लसचे 12 कोर्सेस आहेत, 12 नवे सुरू होतील. या समूह विद्यापीठात वाणिज्य, शास्त्र व कला या शाखेतील आवडीचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील.

समूह विद्यापीठामुळे उणीव दूर होईल -

समूह विद्यापीठामागील शासनाची धारणा स्पष्ट करताना डॉ. पाटील म्हणाले, "आजची विद्यापीठं ही परीक्षा घेणारी ठरली आहेत. मुलांना दर्जेदार शिक्षण, कौशल्य, रोजगाराभिमुख शिक्षण, जागतिक दर्जाचे उद्योगांना लागणारे शिक्षण मिळाले पाहिजे. उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ आणि आम्ही देत असलेलं शिक्षण यामध्ये तफावत आहे. ही उणीव भरून काढण्याचे काम खासगी संस्थांनी केले. आमच्या मुलांना कुठे शिकवावे, असे पालकांनाही वाटायला लागले. खासगी शाळा, खासगी संस्थांमध्ये शिकण्यासाठी मोठी फी मोजावी लागते. त्यामुळे दोन्हींचा मध्य काढण्यासाठी समूह विद्यापीठ ही संकल्पना उदयास आली.

ग्रामीण भागातील पहिले विद्यापीठ -

देशात सात समुह विद्यापीठे आहेत, त्यात महाराष्ट्रात 2 पण तीही मुंबईत आहेत. होमी भाभा व दुसरे हैद्राबाद सिंध तेही मुंबईतच आहे. यानंतर आता राज्यातील तिसरे आणि ग्रामीण भागातील पहिले 'कर्मवीर भाऊराव पाटील स्टेट पब्लिकने सिटी'ला मान मिळतो आहे. साताऱ्यातील शिवाजी, डीजी व सायन्स तिन्ही महाविद्यालये स्वायत्त असल्याने त्यांचं स्ट्रक्चर तयार आहे. शासनाकडून प्रक्रिया लवकर राबवली गेली तर कदाचित जुलैपर्यंत या विद्यापीठाचे कामकाज सुरू व्हायला हरकत नाही, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

अण्णांची संकल्पपूर्ती -

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1941 साली भास्करराव जाधव यांना पत्र लिहून मला विद्यापीठ काढायचे आह. तेही ग्रामीण विद्यापीठ, असा मनोदय व्यक्त केला होता. तेव्हा रयत शिक्षण संस्थेचे एकच हायस्कूल होते. पण त्यावेळीही आपण कुठे जायचे आहे? हे अण्णांचे ध्येय 80 वर्षांपूर्वी निश्चित होत. 1948 साली महात्मा गांधींच्या निधनानंतर साताऱ्यात शोकसभा झाली. त्या वेळी महात्मा गांधी यांच्या नावाने 101 हायस्कूल आणि विद्यापीठ काढण्याचा संकल्प कर्मवीर अण्णांनी जाहीर केला होता. यातला दुसरा संकल्प अण्णांच्या नावाने विद्यापीठ होत असताना पूर्णत्वास जात आहे.

हेही वाचा - उदरनिर्वाहासाठी परमिंदर कौर यांची जिद्द; नऊ वर्षांपासून नांदेडातील रामघाट स्मशानभूमीत वास्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.