ETV Bharat / briefs

कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या - प्रवीण दरेकर

author img

By

Published : Oct 2, 2020, 11:01 PM IST

औरंगाबादमधील घाटशेंद्रा,नाचनवेल,चिंचोली येथील शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही आहे. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Praveen Darekar Demanded Immediate compensation to farmers in Kannada
Praveen Darekar Demanded Immediate compensation to farmers in Kannada

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा,नाचनवेल,चिंचोली येथे अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच येत्या आठ दिवसांत राज्य सरकारने जर अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी यांनी घाटशेंद्रा येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात केली. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास भारतीय जनता पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पडू असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यासोबतच वाकी येथील अतिवृष्टीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सांत्वनही केले.

यावेळी भाजपचे राज्यसभा खा.डॉ. भागवत कराड म्हणाले, की नवा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचे असून विरोधी पक्ष मुद्दाम हा कायदा शेतकरी विरोधी आहे असे दाखवत आहे. रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे.

या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. नितीन पाटील , जिल्हा सचिव डॉ. संजय गव्हाणे, उपसभापती काकासाहेब तायडे ,तालुकाध्यक्ष भगवान काल्हे, नायब तहसीलदार शेख हारूण, विभाग विभागीय कृषी अधिकारी चव्हाण उपस्थित होते.

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा,नाचनवेल,चिंचोली येथे अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच येत्या आठ दिवसांत राज्य सरकारने जर अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी यांनी घाटशेंद्रा येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात केली. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास भारतीय जनता पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पडू असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यासोबतच वाकी येथील अतिवृष्टीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सांत्वनही केले.

यावेळी भाजपचे राज्यसभा खा.डॉ. भागवत कराड म्हणाले, की नवा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचे असून विरोधी पक्ष मुद्दाम हा कायदा शेतकरी विरोधी आहे असे दाखवत आहे. रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे.

या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. नितीन पाटील , जिल्हा सचिव डॉ. संजय गव्हाणे, उपसभापती काकासाहेब तायडे ,तालुकाध्यक्ष भगवान काल्हे, नायब तहसीलदार शेख हारूण, विभाग विभागीय कृषी अधिकारी चव्हाण उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.