रत्नागिरी - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये गेल्या दिड महिन्याच्या कालावधीत तब्बल ३० हजार ९४० वाहन चालकांना ९७ लाख २८ हजार ३०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, विना हेल्मेट असलेल्या ८ हजार ४६० जणांना ४२ लाख ३० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
हेही वाचा - बांधकाम विकासकांच्या टोळीने शेतकऱ्याला लावला ३७ कोटींचा चुना; गुन्हा दाखल
गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या वाहन चालकांविरोधात न्यायालयात खटला भरण्यात आला आहे. दिड महिन्यात जिल्हा वाहतूक शाखेसह जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून हा दंड वसूल केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर १५ एप्रिलनंतर राज्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला. राज्य सरकारने नागरिकांवर अनेक प्रकारचे निर्बंध घातले होते. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन शासनासह प्रशासनाने केले होते. तरीही विनाकारण बाहेर पडणाऱ्या व्यक्तीसह अन्य कारणांनी नियम तोडणाऱ्या तब्बल ३० हजार ९४० वाहन चालक, मालकांना पोलिसांनी ९७ लाखांचा दंड केला आहे.
३० हजार ९४० जणांवर कारवाई
१५ एप्रिल ते ३१ मे या कालवाधित ३० हजार ९४० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विना हेल्मेट असलेल्या ८ हजार ४६० जणांना ४२ लाख ३० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. चारचाकी वाहनात सिटबेल्ट न लावणाऱ्या २ हजार ३५३ वाहन चालकांना ४ लाख ७० हजार ६०० रुपये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या १०४ वाहन चालकांना २१ हजार रुपये दंड, मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ९ वाहनांना १ हजार ८०० रुपये दंड, इंन्शुरन्स नसलेल्या २२६ वाहन चालकांना २ लाख २५ हजार ५०० रुपये दंड, वाहन परवाना नसलेल्या ८८९ वाहन चालकांना ४ लाख ४४ हजार ५०० रुपये दंड, १८ वर्षांपेक्षा कमी वय असताना वाहन चालविणाऱ्या ४ जणांना २ हजार रुपये दंड, सक्षम परवाना नसताना अवजड वाहने चालविणाऱ्या २३४ जणांना १ लाख १७ हजार रुपये दंड, फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ९७८ जणांना २ लाख १ हजार २०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
गाड्यांना काळ्या काचा लावणाऱ्यांना १ लाख २० हजार २०० रुपये दंड
नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्या १ हजार २२४ जणांना २ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गाड्यांना काळ्या काचा लावणाऱ्या ६०१ जणांना १ लाख २० हजार २०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यासह पोलिसांच्या नियमांचा भंग करणाऱ्या ९१५ वाहन चालकांना ४ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. इतर १४ हजार १६९ प्रकरणांमध्ये २९ लाख ८१ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.