ETV Bharat / bharat

Nagpur Marbat Festival History 2022 ईडा पिडा, रोग राई घेऊन जाणाऱ्या मारबतीचा काय आहे इतिहास, जाणुन घेऊया

author img

By

Published : Aug 22, 2022, 1:25 PM IST

Updated : Aug 30, 2022, 5:28 PM IST

श्रावण महीना सुरु झाला की महाराष्ट्रात सणांची रेलचेल सुरु होते. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक history of marbat procession वारसा. पिवळी मारबत Yellow Marbat उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला Black Marbat सुद्धा १४१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा History behind Marbat लाभली आहे. ईडा पिडा, रोग राई, जादु टोना घेऊन जागे मारबत Eda Pida Rog Rae Gheun Ja Ge Marbat असे म्हणटल्या जाणाऱ्या या मारबतीचा काय आहे Nagpur Marbat Festival History 2022 इतिहास, जाणुन घेऊया.

Nagpur Marbat Festival History 2022
ईडा पिडा, रोग राई घेऊन जाणाऱ्या मारबतीचा काय आहे इतिहास

श्रावण महीना सुरु झाला की महाराष्ट्रात सणांची रेलचेल सुरु होते. त्यातही विदर्भात काही वेगवेगळ्या सणांची प्रथा आहे. त्यातही काही सण असे आहे की, ते सण साजरे करण्याची प्रथा केवळ नागपूरातचं आहे. यामध्ये मारबत Black Marbat,Yellow Marbat व बडग्या Badgya हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच history of marbat procession आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक History behind Marbat वारसा. पिवळी मारबत उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला सुद्धा १४१ वर्षांची ऐतिहासिक Nagpur Marbat Festival History 2022 परंपरा लाभली आहे. Eda Pida Rog Rae Gheun Ja Ge Marbat

मारबत व बडग्या मिरवणुकी मागचा इतिहास भोसले घराण्यातील बांकाबाई हिने ईग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध, म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते. यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवऱ्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही, म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात. या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी नागपूर व जवळपासच्या गाव खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहान मुलांना घेउन येतात. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच असते. शेतीची कामेपण बहुदा झालेली असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना व इतरांना हा एक विरंगुळा वाटतो. ईग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परीसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो.

कसे तयार होतात मारबत ही परंपरा मूळ आदिवासींची आहे, जी नागपुरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून, घेऊन जा रे मारबत घेऊन जा रे मारबत असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो. नागपूर शहरातील लाखो नागरिक ही मारबत मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यावर उभे असतात.

काळी आणि पिवळ्या मारबतीचे महत्त्व काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत. महाभारत काळाचा संदर्भदेखील या उत्सवाला दिला जातो. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीला प्राचीन काळी मारबत आणि लोकांचे रक्षण करणारी पिवळी मारबत अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात,असाही इतिहास काही जण सांगतात.

इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षा देखील जुना उत्सव मारबत आहे. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचे प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत.

अनिष्ठतेकडुन सकारात्मकतेकडे नेणारी मारबत मिरवणुक वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून नष्ट व्हाव्यात आणि चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी मारबत उत्सव साजरा केला जातो. गेल्या 141 वर्षांपासुन ही परंपरा सुरू आहे. या मिरवणुकी दरम्यान ईडा पिडा, रोग राई, जादु टोना घेऊन जागे मारबत असे म्हणत समाजातील वाईट गोष्टींना संपविण्याचा प्रयत्न असतो. तसेच, राजकारणातील व समाजातील चुकीच्या लोकांचा, चुकीच्या मानसिकतेचा, विचारांचा विरोध देखील यावेळी केल्या जाते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. आणि अखेरिस या मारबतीच्या पुतळ्यांचे दहन केल्या जाते. या दहनाबरोबरच समाजातील सगळ्या चुकीच्या गोष्टी व घातक विषाणुंचा नाश होतो. व त्यानंतर परत नव्याने सकारात्मकतेची सुरुवात होते, असा समज आहे.

या मिरवणुकीच्या शेवटी पिवळी व काळी मारबत यांची गळा भेट केल्या जाते. आणि नंतर त्यांचे दहन केल्या जाते. मारबत व बडग्याच्या या मिरवणुकीला जत्रेचे स्वरुप प्राप्त होत असते. लाखो नागरीक या उत्सवात सहभागी होतात. या एका दिवसाच्या मिरवणुकीमुळे अनेकांना रोजगार देखील प्राप्त होतो. what is Nagpur Marbat Festival

हेही वाचा Shravan somvar 2022 आज शेवटचा श्रावणी सोमवार, असे करावे महादेवाचे पूजन

श्रावण महीना सुरु झाला की महाराष्ट्रात सणांची रेलचेल सुरु होते. त्यातही विदर्भात काही वेगवेगळ्या सणांची प्रथा आहे. त्यातही काही सण असे आहे की, ते सण साजरे करण्याची प्रथा केवळ नागपूरातचं आहे. यामध्ये मारबत Black Marbat,Yellow Marbat व बडग्या Badgya हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच history of marbat procession आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक History behind Marbat वारसा. पिवळी मारबत उत्सव गेल्या १३७ वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो. तर काळ्या मारबतीला सुद्धा १४१ वर्षांची ऐतिहासिक Nagpur Marbat Festival History 2022 परंपरा लाभली आहे. Eda Pida Rog Rae Gheun Ja Ge Marbat

मारबत व बडग्या मिरवणुकी मागचा इतिहास भोसले घराण्यातील बांकाबाई हिने ईग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध, म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते. यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवऱ्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही, म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात. या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी नागपूर व जवळपासच्या गाव खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहान मुलांना घेउन येतात. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच असते. शेतीची कामेपण बहुदा झालेली असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना व इतरांना हा एक विरंगुळा वाटतो. ईग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परीसरातील नागरिकांच्या मनात बांकाबाईच्या कुत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो.

कसे तयार होतात मारबत ही परंपरा मूळ आदिवासींची आहे, जी नागपुरात १८८१ सालापासून सुरू झाली. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचे दहन करण्याची प्रथा सुरू केली. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून, घेऊन जा रे मारबत घेऊन जा रे मारबत असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ व कमरेला उखळ बांधलेले असते.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो. नागपूर शहरातील लाखो नागरिक ही मारबत मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यावर उभे असतात.

काळी आणि पिवळ्या मारबतीचे महत्त्व काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत. महाभारत काळाचा संदर्भदेखील या उत्सवाला दिला जातो. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीला प्राचीन काळी मारबत आणि लोकांचे रक्षण करणारी पिवळी मारबत अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात,असाही इतिहास काही जण सांगतात.

इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याच धर्तीवर नागपूर येथे मारबत उत्सव सुरु करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षा देखील जुना उत्सव मारबत आहे. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचे प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याच प्रतीक म्हणजे पिवळी मारबत.

अनिष्ठतेकडुन सकारात्मकतेकडे नेणारी मारबत मिरवणुक वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून नष्ट व्हाव्यात आणि चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी मारबत उत्सव साजरा केला जातो. गेल्या 141 वर्षांपासुन ही परंपरा सुरू आहे. या मिरवणुकी दरम्यान ईडा पिडा, रोग राई, जादु टोना घेऊन जागे मारबत असे म्हणत समाजातील वाईट गोष्टींना संपविण्याचा प्रयत्न असतो. तसेच, राजकारणातील व समाजातील चुकीच्या लोकांचा, चुकीच्या मानसिकतेचा, विचारांचा विरोध देखील यावेळी केल्या जाते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. आणि अखेरिस या मारबतीच्या पुतळ्यांचे दहन केल्या जाते. या दहनाबरोबरच समाजातील सगळ्या चुकीच्या गोष्टी व घातक विषाणुंचा नाश होतो. व त्यानंतर परत नव्याने सकारात्मकतेची सुरुवात होते, असा समज आहे.

या मिरवणुकीच्या शेवटी पिवळी व काळी मारबत यांची गळा भेट केल्या जाते. आणि नंतर त्यांचे दहन केल्या जाते. मारबत व बडग्याच्या या मिरवणुकीला जत्रेचे स्वरुप प्राप्त होत असते. लाखो नागरीक या उत्सवात सहभागी होतात. या एका दिवसाच्या मिरवणुकीमुळे अनेकांना रोजगार देखील प्राप्त होतो. what is Nagpur Marbat Festival

हेही वाचा Shravan somvar 2022 आज शेवटचा श्रावणी सोमवार, असे करावे महादेवाचे पूजन

Last Updated : Aug 30, 2022, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.