ETV Bharat / bharat

West Bengal Violence : हिंसाचारावर उच्च न्यायालय कठोर, अहवाल मागवला ; ममता म्हणाल्या – विरोधी पक्ष जबाबदार

author img

By

Published : Jun 16, 2023, 7:34 PM IST

Updated : Jun 16, 2023, 7:58 PM IST

पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीपीएम आणि भाजपवर निशाणा साधला आहे. बॅनर्जी म्हणाल्या की, पंचायत निवडणुकीपूर्वी हा हिंसाचार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. दुसरीकडे, पंचायत निवडणुकीतील उमेदवारांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे.

West Bengal Violence
पश्चिम बंगाल हिंसाचार

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपूर्वी हिंसाचारावरून राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावरून थेट विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. ममता म्हणाल्या की, सीपीएम आणि भाजपमुळे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे, कोलकाता उच्च न्यायालयाने उमेदवारांच्या सुरक्षेत प्रशासकीय अपयशाबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.

'सीपीएमच्या काळात काय व्यवस्था होती?' : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'राज्यात शांतता नाही असे म्हणणाऱ्यांना आज मला विचारायचे आहे की, सीपीएमच्या काळात काय व्यवस्था होती? अनेक राज्यांत काँग्रेसचीही सरकारे होती. त्यांना संसदेत आमचा पाठिंबा हवा आहे. भाजपच्या विरोधात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण जेव्हा ते सीपीएमशी हातमिळवणी करतात आणि बंगालमध्ये आमचा पाठिंबा मागायला येतात, तेव्हा त्यांना आमचा पाठिंबा मिळणार नाही.

राज्यपालांची हिंसेच्या स्थळाला भेट : पश्चिम बंगाल पोलिसांनी भानगर येथून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी भानगरला भेट दिली. ते म्हणाले, 'हिंसाचाराच्या घटनेनंतर मी स्थानिक लोकांशी आणि पीडितांशी बोललो आहे. हिंसाचार भडकावणाऱ्यांना संविधानाच्या कक्षेत राहून कायमस्वरूपी उत्तर दिले जाईल. बंगालमधील शांतताप्रेमी जनता उघडपणे आपला मतदानाचा हक्क बजावेल.

हायकोर्ट काय म्हणाले? : पश्चिम बंगालमधील आगामी पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांच्या सुरक्षेतील अपयशाबाबत कलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडून अहवाल मागवला. ज्येष्ठ वकील आणि सीपीआय(एम) राज्यसभा सदस्य विकास रंजन भट्टाचार्य यांनी न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या एकल खंडपीठाला माहिती दिली की, पोलिस संरक्षणात उमेदवारांचा एक गट अर्ज भरण्यासाठी जात असताना पोलिसांसमोर एका उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी एक मारेकऱ्याला पकडण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याने सांगितले की, त्याला कॅनिंग (पूर्व) येथील तृणमूलचे आमदार शोकत मोल्ला यांनी 5,000 रुपयांची सुपारी दिली होती.

भाजपची भूमिका : पंचायत निवडणुकीच्या संदर्भात झालेल्या हिंसाचारासाठी भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या आश्रयाखाली राज्यात हिंसाचार होत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पंचायत निवडणुकीदरम्यान पक्ष कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या 25 ते 30 घटनांची यादी असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, पश्चिम बंगाल सरकार आणि पोलिस ज्या प्रकारे वागतात ते भारताच्या लोकशाही आणि निवडणूक इतिहासातील एक अतिशय काळा अध्याय आहे.

हेही वाचा :

  1. Manipur Violence : मणिपूरमधील समस्या धार्मिक नाही, दंगल गैरसमजातून झाली - केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह
  2. Manipur Violence: हिंसक जमावाने पेटवले केंद्रीय मंत्र्याचे घर; आरके रंजन सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपूर्वी हिंसाचारावरून राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावरून थेट विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. ममता म्हणाल्या की, सीपीएम आणि भाजपमुळे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे, कोलकाता उच्च न्यायालयाने उमेदवारांच्या सुरक्षेत प्रशासकीय अपयशाबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.

'सीपीएमच्या काळात काय व्यवस्था होती?' : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'राज्यात शांतता नाही असे म्हणणाऱ्यांना आज मला विचारायचे आहे की, सीपीएमच्या काळात काय व्यवस्था होती? अनेक राज्यांत काँग्रेसचीही सरकारे होती. त्यांना संसदेत आमचा पाठिंबा हवा आहे. भाजपच्या विरोधात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण जेव्हा ते सीपीएमशी हातमिळवणी करतात आणि बंगालमध्ये आमचा पाठिंबा मागायला येतात, तेव्हा त्यांना आमचा पाठिंबा मिळणार नाही.

राज्यपालांची हिंसेच्या स्थळाला भेट : पश्चिम बंगाल पोलिसांनी भानगर येथून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी भानगरला भेट दिली. ते म्हणाले, 'हिंसाचाराच्या घटनेनंतर मी स्थानिक लोकांशी आणि पीडितांशी बोललो आहे. हिंसाचार भडकावणाऱ्यांना संविधानाच्या कक्षेत राहून कायमस्वरूपी उत्तर दिले जाईल. बंगालमधील शांतताप्रेमी जनता उघडपणे आपला मतदानाचा हक्क बजावेल.

हायकोर्ट काय म्हणाले? : पश्चिम बंगालमधील आगामी पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांच्या सुरक्षेतील अपयशाबाबत कलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडून अहवाल मागवला. ज्येष्ठ वकील आणि सीपीआय(एम) राज्यसभा सदस्य विकास रंजन भट्टाचार्य यांनी न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या एकल खंडपीठाला माहिती दिली की, पोलिस संरक्षणात उमेदवारांचा एक गट अर्ज भरण्यासाठी जात असताना पोलिसांसमोर एका उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी एक मारेकऱ्याला पकडण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याने सांगितले की, त्याला कॅनिंग (पूर्व) येथील तृणमूलचे आमदार शोकत मोल्ला यांनी 5,000 रुपयांची सुपारी दिली होती.

भाजपची भूमिका : पंचायत निवडणुकीच्या संदर्भात झालेल्या हिंसाचारासाठी भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या आश्रयाखाली राज्यात हिंसाचार होत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पंचायत निवडणुकीदरम्यान पक्ष कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या 25 ते 30 घटनांची यादी असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, पश्चिम बंगाल सरकार आणि पोलिस ज्या प्रकारे वागतात ते भारताच्या लोकशाही आणि निवडणूक इतिहासातील एक अतिशय काळा अध्याय आहे.

हेही वाचा :

  1. Manipur Violence : मणिपूरमधील समस्या धार्मिक नाही, दंगल गैरसमजातून झाली - केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह
  2. Manipur Violence: हिंसक जमावाने पेटवले केंद्रीय मंत्र्याचे घर; आरके रंजन सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
Last Updated : Jun 16, 2023, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.