ETV Bharat / bharat

UP Road Accident: लखनौ-वाराणसी महामार्गावर टँकरची ऑटो रिक्षाला धडक; 12 जण ठार

प्रतापगड जिल्ह्यात सोमवारी भीषण अपघात झाला. लीलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहनगंज मार्केटच्या विक्रमपूर वळणावर भरधाव वेगाने जाणारा टँकर आणि ऑटो रिक्षा यांच्यात धडक झाली. यामध्ये मृतांची संख्या 12 झाली आहे. तर अन्य 5 जण गंभीर जखमी आहेत.

author img

By

Published : Jul 11, 2023, 11:57 AM IST

Updated : Jul 11, 2023, 12:10 PM IST

Road Accident
भीषण अपघात

प्रतापगड (लखनौ) : प्रतापगडमध्ये सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृतांची संख्या 12 आहे. पोलिसांनी अपघातात ठार झालेल्या 10 जणांची ओळख पटवली आहे. मृतांमध्ये 7 पुरुष, 2 महिला आणि एका मुलीची ओळख पटली आहे. त्याचवेळी या रस्ता अपघातात दोन जोडप्यांना आणि मामा-भाचीला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलीस अद्याप दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात गुंतले आहेत. मृतांपैकी बहुतांश जेठवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. सध्या 5 जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. या घटनेत एकूण 17 जणांचा समावेश होता.

जीवितहानीबद्दल शोक : या अपघाताबाबत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. सध्या डीएम चंद्रप्रकाश श्रीवास्तव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.

टँकरची ऑटो रिक्षाला धडक : पूर्वेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहित मिश्रा यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास लखनौ-वाराणसी महामार्गावर विक्रमपूर चौरस्त्यावर गॅसने भरलेल्या टँकरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षात प्रवास करणाऱ्या 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 जणांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना प्रयागराज येथे हलविण्यात आले.

तीन जखमींचा वाटेतच मृत्यू : अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, तीन जखमींना प्रयागराजला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 12 झाली आहे. टक्कर झाल्यानंतर टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्यावर पलटी झाल्याचे त्यांनी सांगितले. हरिकेश श्रीवास्तव (63) रा. धनसरी, नीरज पांडे (21) हरिप्रसाद पांडे यांचा मुलगा, त्यांची बहीण नीलम, सतीश (26) रा. भैरव नौबस्ता, शीतला (40) रा. धनसारी गोपाळपूर, मोहम्मद अशी मृतांची नावे आहेत. रईस (45) रा. रेडी, त्याची पत्नी गुलसन बेगम रेडी पोलीस स्टेशन जेठवारा, अशी ओळख पटली आहे, तर इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा :

  1. Mumbai Eastern Express Highway accident: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रकने दिली चार वाहनांना धडक; अपघातात एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी
  2. Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे धक्कादायक कारण, फॉरेन्सिक अहवालातून समोर आली माहिती
  3. Mumbai Agra Highway Accident: महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर भीषण अपघात; कंटेनरची वाहनांना धडक, दहा ठार

प्रतापगड (लखनौ) : प्रतापगडमध्ये सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृतांची संख्या 12 आहे. पोलिसांनी अपघातात ठार झालेल्या 10 जणांची ओळख पटवली आहे. मृतांमध्ये 7 पुरुष, 2 महिला आणि एका मुलीची ओळख पटली आहे. त्याचवेळी या रस्ता अपघातात दोन जोडप्यांना आणि मामा-भाचीला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलीस अद्याप दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात गुंतले आहेत. मृतांपैकी बहुतांश जेठवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. सध्या 5 जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. या घटनेत एकूण 17 जणांचा समावेश होता.

जीवितहानीबद्दल शोक : या अपघाताबाबत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. सध्या डीएम चंद्रप्रकाश श्रीवास्तव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.

टँकरची ऑटो रिक्षाला धडक : पूर्वेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहित मिश्रा यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास लखनौ-वाराणसी महामार्गावर विक्रमपूर चौरस्त्यावर गॅसने भरलेल्या टँकरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षात प्रवास करणाऱ्या 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 जणांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना प्रयागराज येथे हलविण्यात आले.

तीन जखमींचा वाटेतच मृत्यू : अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, तीन जखमींना प्रयागराजला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 12 झाली आहे. टक्कर झाल्यानंतर टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्यावर पलटी झाल्याचे त्यांनी सांगितले. हरिकेश श्रीवास्तव (63) रा. धनसरी, नीरज पांडे (21) हरिप्रसाद पांडे यांचा मुलगा, त्यांची बहीण नीलम, सतीश (26) रा. भैरव नौबस्ता, शीतला (40) रा. धनसारी गोपाळपूर, मोहम्मद अशी मृतांची नावे आहेत. रईस (45) रा. रेडी, त्याची पत्नी गुलसन बेगम रेडी पोलीस स्टेशन जेठवारा, अशी ओळख पटली आहे, तर इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा :

  1. Mumbai Eastern Express Highway accident: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रकने दिली चार वाहनांना धडक; अपघातात एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी
  2. Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे धक्कादायक कारण, फॉरेन्सिक अहवालातून समोर आली माहिती
  3. Mumbai Agra Highway Accident: महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर भीषण अपघात; कंटेनरची वाहनांना धडक, दहा ठार
Last Updated : Jul 11, 2023, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.