ETV Bharat / bharat

Amartya Sen : ममता बॅनर्जी यांच्यात भारताच्या पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता - अमर्त्य सेन

author img

By

Published : Jan 14, 2023, 8:38 PM IST

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल, असे म्हटले आहे. काँग्रेस कमकुवत असल्याचे सांगून ते म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे पंतप्रधान होण्याची क्षमता आहे.

amartya sen mamata banerjee
अमर्त्य सेन ममता बॅनर्जी

कोलकाता : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका भाजपच्या बाजूने एकतर्फी होतील असे समजणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल असे त्यांनी म्हटले आहे. 90 वर्षीय सेन यांनी असेही म्हटले की, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यात भारताच्या पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, मात्र त्यासाठी त्यांना मतदारांमध्ये असलेल्या भाजप विरोधी भावनांना एकत्र करणे गरजेचे आहे.

प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे : ते म्हणाले, 'मला वाटते की अनेक प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे आहेत. माझ्या मते डीएमके हा एक महत्त्वाचा पक्ष आहे. टीएमसी निश्चितच महत्त्वाची आहे आणि समाजवादी पक्षाचेही स्वत:चे एक स्थान आहे, पण ते वाढवता येईल का? हे मला माहीत नाही. ते म्हणाले, 'मला वाटते की भाजपची जागा घेऊ शकणारा दुसरा कोणताही पक्ष नाही, कारण त्या पक्षाने स्वत:ला असे प्रस्थापित केले आहे, असे नाकारणारा दृष्टिकोन घेणे चुकीचे ठरेल.' ममता बॅनर्जी देशाच्या पुढील पंतप्रधान होऊ शकतात का? असे विचारले असता सेन म्हणाले की, त्यांच्याकडे क्षमता आहे. ते म्हणाले, 'तसे करण्याची क्षमता त्यांच्यात नाही, असे नाही. त्याच्याकडे निश्चितच क्षमता आहे. तसेच भारतातील गटबाजी संपवण्याचे नेतृत्वही त्यांच्याकडे आहे'.

भाजपची विचारसरणी संकुचीत : राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल (युनायटेड) यांसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह नवीन आघाडीची हाक दिली आहे. ध्रुवीय लढतीमुळे भाजपचा पराभव करणे सोपे होईल असे त्यांचे आकलन आहे. ते म्हणाले, 'भाजपने भारताची छबी संकुचित बनवली आहे. केवळ हिंदू भारत आणि हिंदी भाषिक भारत अशी भारताची समज सध्या बनत चालली आहे. आज भारतात भाजपशिवाय पर्याय नसेल तर ते वाईटच आहे. ते म्हणाले, 'भाजप मजबूत आणि ताकदवान दिसत असला तर त्यात कमकुवतपणाही आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांनी खरोखरच प्रयत्न केल्यास ते भाजपला टक्कर देऊ शकतात असे मला वाटते.

2019 मध्ये झाला होता प्रयोग : ममता बॅनर्जी यांचा तृणमूल, के चंद्रशेखर राव यांची तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी (AAP) यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक पक्षांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी फेडरल फ्रंट (FF) ची स्थापना केली होती. त्याच वर्षी जानेवारीत, ममता बॅनर्जींनी आयोजित केलेल्या एका भव्य बैठकीत कोलकाता येथे जमलेल्या नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. या बैठकीला जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (एसपी), तामिळनाडूचे एमके स्टॅलिन (डीएमके), महाराष्ट्राचे शरद पवार, जम्मू-काश्मीरचे फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि अरुणाचल प्रदेशचे गेगॉन्ग अपांग आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेस कमकुवत झाल्याचे दिसते : सेन यांनी काँग्रेसच्या 2024 च्या निवडणुका जिंकण्याच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या मते हा पक्ष सध्या कमजोर झाला आहे. मात्र अखिल भारतीय दृष्टी देणारा हा एकमेव पक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, 'काँग्रेस खूपच कमकुवत झाल्याचे दिसते आहे आणि काँग्रेसवर किती विश्वास ठेवता येईल, हे मला माहीत नाही. मात्र काँग्रेस निश्चितपणे अखिल भारतीय दृष्टी प्रदान करते जी इतर कोणताही पक्ष घेऊ शकत नाही'.

हेही वाचा : Mamata Banerjee : राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी ममता बॅनर्जींना न्यायालयाचा दिलासा

कोलकाता : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका भाजपच्या बाजूने एकतर्फी होतील असे समजणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल असे त्यांनी म्हटले आहे. 90 वर्षीय सेन यांनी असेही म्हटले की, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यात भारताच्या पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, मात्र त्यासाठी त्यांना मतदारांमध्ये असलेल्या भाजप विरोधी भावनांना एकत्र करणे गरजेचे आहे.

प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे : ते म्हणाले, 'मला वाटते की अनेक प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे आहेत. माझ्या मते डीएमके हा एक महत्त्वाचा पक्ष आहे. टीएमसी निश्चितच महत्त्वाची आहे आणि समाजवादी पक्षाचेही स्वत:चे एक स्थान आहे, पण ते वाढवता येईल का? हे मला माहीत नाही. ते म्हणाले, 'मला वाटते की भाजपची जागा घेऊ शकणारा दुसरा कोणताही पक्ष नाही, कारण त्या पक्षाने स्वत:ला असे प्रस्थापित केले आहे, असे नाकारणारा दृष्टिकोन घेणे चुकीचे ठरेल.' ममता बॅनर्जी देशाच्या पुढील पंतप्रधान होऊ शकतात का? असे विचारले असता सेन म्हणाले की, त्यांच्याकडे क्षमता आहे. ते म्हणाले, 'तसे करण्याची क्षमता त्यांच्यात नाही, असे नाही. त्याच्याकडे निश्चितच क्षमता आहे. तसेच भारतातील गटबाजी संपवण्याचे नेतृत्वही त्यांच्याकडे आहे'.

भाजपची विचारसरणी संकुचीत : राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल (युनायटेड) यांसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह नवीन आघाडीची हाक दिली आहे. ध्रुवीय लढतीमुळे भाजपचा पराभव करणे सोपे होईल असे त्यांचे आकलन आहे. ते म्हणाले, 'भाजपने भारताची छबी संकुचित बनवली आहे. केवळ हिंदू भारत आणि हिंदी भाषिक भारत अशी भारताची समज सध्या बनत चालली आहे. आज भारतात भाजपशिवाय पर्याय नसेल तर ते वाईटच आहे. ते म्हणाले, 'भाजप मजबूत आणि ताकदवान दिसत असला तर त्यात कमकुवतपणाही आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांनी खरोखरच प्रयत्न केल्यास ते भाजपला टक्कर देऊ शकतात असे मला वाटते.

2019 मध्ये झाला होता प्रयोग : ममता बॅनर्जी यांचा तृणमूल, के चंद्रशेखर राव यांची तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी (AAP) यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक पक्षांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी फेडरल फ्रंट (FF) ची स्थापना केली होती. त्याच वर्षी जानेवारीत, ममता बॅनर्जींनी आयोजित केलेल्या एका भव्य बैठकीत कोलकाता येथे जमलेल्या नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. या बैठकीला जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (एसपी), तामिळनाडूचे एमके स्टॅलिन (डीएमके), महाराष्ट्राचे शरद पवार, जम्मू-काश्मीरचे फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि अरुणाचल प्रदेशचे गेगॉन्ग अपांग आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेस कमकुवत झाल्याचे दिसते : सेन यांनी काँग्रेसच्या 2024 च्या निवडणुका जिंकण्याच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या मते हा पक्ष सध्या कमजोर झाला आहे. मात्र अखिल भारतीय दृष्टी देणारा हा एकमेव पक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, 'काँग्रेस खूपच कमकुवत झाल्याचे दिसते आहे आणि काँग्रेसवर किती विश्वास ठेवता येईल, हे मला माहीत नाही. मात्र काँग्रेस निश्चितपणे अखिल भारतीय दृष्टी प्रदान करते जी इतर कोणताही पक्ष घेऊ शकत नाही'.

हेही वाचा : Mamata Banerjee : राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी ममता बॅनर्जींना न्यायालयाचा दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.