ETV Bharat / bharat

KCR - Thackeray Meet : सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

author img

By

Published : Feb 20, 2022, 7:06 PM IST

Updated : Feb 20, 2022, 7:53 PM IST

देशभरात भाजप सरकारच्या विरोधात आघाडी ( Anti-BJP Front ) करण्याचा प्रयत्न तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( Telangana CM K Chandrashekhar Rao ) हे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबईत येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात एकत्र येत असल्याचे दोन्ही नेत्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

मुंबई : देशात सध्या राजकीय वातावरणात बदलत होत चालले आहेत. राज्यकारभार दूर राहिला, सूडाच राजकारणात अत्यंत खालच्या पातळीचे केले जातेय. सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही, असे हिंदुत्व तर अजिबातच नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला टोला लगावला. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( Telangana CM K Chandrashekhar Rao ) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) त्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन जवळपास सव्वा तास देशाच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा ( KCR Thackeray Meet ) केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी के कविता, पल्ला राजेश्‍वर रेड्डी, रणजीत रेड्डी, बीबी पाटील, जय संतोष राव आणि खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, आदी मंडळी उपस्थित होती. पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.

सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

ठाकरे म्हणाले की, असचं सुरु राहिल तर, देशाचे भविष्य काय ? मुख्यमंत्री, पंतप्रधान होत राहतील. मात्र देशाचे काय होईल? याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत विचार करण्याची सुरुवात आमच्याकडून आम्ही केली आहे. देशामध्ये राज्य एकमेकांबाबत शेजारधर्म विसरले आहेत. तेलंगणा आणि महाराष्ट्राला हजार किलोमीटरची सीमा आहे. त्यामुळे आम्ही सख्खे शेजारी असल्याने, राज्याराज्यांमध्ये चांगलं वातावरण राहिले पाहिजे असं मतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं. सध्या सुरू असलेले राजकारण देशाला खड्ड्यात घालणार आहे, असं म्हणत केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. तसेच एका नव्या विचारांची सुरुवात आज झाली. एक चांगली दिशा ठरवून वाटचाल करणारा असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

केंद्र सरकारवर टीका

आज ज्याप्रकारे देशाचा कारभार सुरू आहे. त्यामध्ये बदल येणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जे बदल होणे गरजेचे होते ते, झाले नाहीत. यावर आम्ही दोघे सहमत आहोत. येणाऱ्या काळात देशाला खूप मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशात वातावरण खराब न करता त्याला चांगल्या दिशेने पुढे नेणे गरजेचे आहे. देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षासोबत चर्चा करणार असल्याचं चंद्रशेखर राव यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो, तो नेहमीच सफल होतो. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंकडून मिळालेली प्रेरणा घेऊनच आता आम्ही पुढे जाणार असल्याचे के चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.

केंद्र सरकार कडून केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीचा वापर

केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा खूप वाईट पद्धतीने वापर केला जातो आहे. केंद्र सरकारकडून हे चुकीचं सुरू आहे. केंद्र सरकारने याबाबतची आपली नीती बदलली पाहिजे. नाही तर, येणाऱ्या काळात त्यांना नक्कीच धडा मिळेल असा विश्‍वास के चंद्रशेखर राव यांनी बोलून दाखवला.

भाजपकडून सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न

त्यावेळी देशात असलेल्या राजकीय परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. तसेच केंद्र सरकारकडून बिगर भाजप सरकार असलेल्या राज्य सरकारांची केली जाणारी आर्थिक कोंडी, राज्याच्या कारभारातला वाढता हस्तक्षेप या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र या 75 वर्षांत देशाची जी स्थिती असायला पाहिजे होती. ती सध्या पाहायला मिळत नाही. विकास किंवा जनतेचे मुद्दे विचारात न घेता आता केंद्र सरकार केवळ सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांकडून यावेळी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला.

लवकरच इतर पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या आजच्या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सांगितले. बऱ्याच विषयावर आमचं एकमत झालं. देशाला पुढे नेण्यासाठी, देशाची प्रगती करण्यासाठी चर्चा केली. यापुढे सोबत मिळून काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अजूनही देशात समविचारी लोक आहेत. त्यांच्याशी देखील माझी चर्चा सुरू आहे. पुढच्या काही दिवसात आम्ही सर्व तेलंगणा किंवा, इतर ठिकाणी भेटूनं सर्व प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे के चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत यावेळी सांगितले.

तेलंगणा- महाराष्ट्र भाऊ -भाऊ

तसेच तेलंगणा आणि महाराष्ट्र दोघे भाऊ आहोत. कारण दोन्ही राज्याची जवळपास एक हजार किलोमीटरची सीमा एकच आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आम्ही एक चांगला प्रोजेक्ट बनवला असून, त्यामुळे तेलंगणाला खूप जास्त फायदा झाला. त्यामुळे येणाऱ्या काळात अजूनही महाराष्ट्र सरकार बरोबर मिळून काम करण्याची इच्छा के चंद्रशेखर राव यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई : देशात सध्या राजकीय वातावरणात बदलत होत चालले आहेत. राज्यकारभार दूर राहिला, सूडाच राजकारणात अत्यंत खालच्या पातळीचे केले जातेय. सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही, असे हिंदुत्व तर अजिबातच नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला टोला लगावला. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( Telangana CM K Chandrashekhar Rao ) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) त्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन जवळपास सव्वा तास देशाच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा ( KCR Thackeray Meet ) केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी के कविता, पल्ला राजेश्‍वर रेड्डी, रणजीत रेड्डी, बीबी पाटील, जय संतोष राव आणि खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, आदी मंडळी उपस्थित होती. पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते.

सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

ठाकरे म्हणाले की, असचं सुरु राहिल तर, देशाचे भविष्य काय ? मुख्यमंत्री, पंतप्रधान होत राहतील. मात्र देशाचे काय होईल? याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत विचार करण्याची सुरुवात आमच्याकडून आम्ही केली आहे. देशामध्ये राज्य एकमेकांबाबत शेजारधर्म विसरले आहेत. तेलंगणा आणि महाराष्ट्राला हजार किलोमीटरची सीमा आहे. त्यामुळे आम्ही सख्खे शेजारी असल्याने, राज्याराज्यांमध्ये चांगलं वातावरण राहिले पाहिजे असं मतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं. सध्या सुरू असलेले राजकारण देशाला खड्ड्यात घालणार आहे, असं म्हणत केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. तसेच एका नव्या विचारांची सुरुवात आज झाली. एक चांगली दिशा ठरवून वाटचाल करणारा असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

केंद्र सरकारवर टीका

आज ज्याप्रकारे देशाचा कारभार सुरू आहे. त्यामध्ये बदल येणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जे बदल होणे गरजेचे होते ते, झाले नाहीत. यावर आम्ही दोघे सहमत आहोत. येणाऱ्या काळात देशाला खूप मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. देशात वातावरण खराब न करता त्याला चांगल्या दिशेने पुढे नेणे गरजेचे आहे. देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षासोबत चर्चा करणार असल्याचं चंद्रशेखर राव यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो, तो नेहमीच सफल होतो. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंकडून मिळालेली प्रेरणा घेऊनच आता आम्ही पुढे जाणार असल्याचे के चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.

केंद्र सरकार कडून केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीचा वापर

केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा खूप वाईट पद्धतीने वापर केला जातो आहे. केंद्र सरकारकडून हे चुकीचं सुरू आहे. केंद्र सरकारने याबाबतची आपली नीती बदलली पाहिजे. नाही तर, येणाऱ्या काळात त्यांना नक्कीच धडा मिळेल असा विश्‍वास के चंद्रशेखर राव यांनी बोलून दाखवला.

भाजपकडून सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न

त्यावेळी देशात असलेल्या राजकीय परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. तसेच केंद्र सरकारकडून बिगर भाजप सरकार असलेल्या राज्य सरकारांची केली जाणारी आर्थिक कोंडी, राज्याच्या कारभारातला वाढता हस्तक्षेप या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र या 75 वर्षांत देशाची जी स्थिती असायला पाहिजे होती. ती सध्या पाहायला मिळत नाही. विकास किंवा जनतेचे मुद्दे विचारात न घेता आता केंद्र सरकार केवळ सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांकडून यावेळी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला.

लवकरच इतर पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या आजच्या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सांगितले. बऱ्याच विषयावर आमचं एकमत झालं. देशाला पुढे नेण्यासाठी, देशाची प्रगती करण्यासाठी चर्चा केली. यापुढे सोबत मिळून काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अजूनही देशात समविचारी लोक आहेत. त्यांच्याशी देखील माझी चर्चा सुरू आहे. पुढच्या काही दिवसात आम्ही सर्व तेलंगणा किंवा, इतर ठिकाणी भेटूनं सर्व प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे के चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत यावेळी सांगितले.

तेलंगणा- महाराष्ट्र भाऊ -भाऊ

तसेच तेलंगणा आणि महाराष्ट्र दोघे भाऊ आहोत. कारण दोन्ही राज्याची जवळपास एक हजार किलोमीटरची सीमा एकच आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आम्ही एक चांगला प्रोजेक्ट बनवला असून, त्यामुळे तेलंगणाला खूप जास्त फायदा झाला. त्यामुळे येणाऱ्या काळात अजूनही महाराष्ट्र सरकार बरोबर मिळून काम करण्याची इच्छा के चंद्रशेखर राव यांनी यावेळी व्यक्त केली.

Last Updated : Feb 20, 2022, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.