ETV Bharat / bharat

Sindhutai Sapkal Passes Away : अनाथांच्या मायेनं व्यापलेलं ममत्व अनंताच्या प्रवासाला

दगडासारखं गोठलेल्या बर्फाने पाण्यात वितळावं तस कमालिच्या निष्ठूर माणसाणं आईच्या कुशीत हळव व्हाव हे या ममत्वाच सामर्थ्य. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal) आई नावचं वलय सगळ्यांच्याच वाट्याला आलेलं असत. पण, सगळ्यांची मी आई आहे हे वात्सल्य फक्त आईच्या आपलेपणातच सामावलेलं असत. (Sindhutai Sapkal Passes Away) याचं आई नावाच्या नात्याला आणि त्यातील माणुकसीला महासागराच रुप देत कित्येंक निराधारांना आपल्या पदराला घेत त्यांच्यासाठी आपलं आयुष्य कडेला लावलं त्या सिंधूताई सपकाळ अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या.

author img

By

Published : Jan 5, 2022, 9:57 AM IST

Updated : Jan 5, 2022, 8:07 PM IST

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

मुंबई - प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, वात्सल्य, माया, ममता, आपलेपण, माणुसकी या सर्व गोष्टींचा संगम 'आई' या दोन शब्दांशी बांधला गेलाय. आईच्या मायेला पाझर फुटतो यापेक्षा आईच्या मायेचा पाझर कधीच आटत नाही हे या नात्याच मुळ. झाडाच्या मुळ्या अमर्याद वाढतात. मात्र, आई नावाच्या झाडाच्या मुळ्यांनी या मर्यादांनाही तिलांजली देत आपलं मुळ अगणित विस्तारलय. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal Passes Away) दगडासारखं गोठलेल्या बर्फाने पाण्यात वितळावं तस कमालिच्या निष्ठूर माणसाणं आईच्या कुशीत हळव व्हाव हे या ममत्वाच सामर्थ्य. आई नावच वलय सगळ्यांच्याच वाट्याला आलेलं असत. पण, सगळ्यांची मी आई आहे हे वात्सल्य फक्त आईच्या आपलेपणातच सामावलेलं असत. याचं आई नावाच्या नात्याला आणि त्यातील माणुकसीला महासागराच रुप देत कित्येंक निराधारांना आपल्या पदराला घेत त्यांच्यासाठी आपलं आयुष्य कडेला लावलं त्या सिंधूताई सपकाळ अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal) या त्यांच्या अनंताच्या प्रवासाला निघून जाण्याने पुन्हा एकदा कित्येकांच्या वाट्याला अनाथपण आलय.

आपल्या आयुष्याची झोळी वेदनांनी भरलेली असताना इतरांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं बळ या आई नावाच्या जिव्हाळ्यात सामावलेलं असतं. सगळ्यांच्या वाट्याला हे दु:ख येत नाही. (Anathanchi Maye Sindhutai Sapkal) आणि सगळ्यांच्याच वाट्याला दु:खाची फुलं करण्याचही सुख येत नाही. जे सिंधुताईंच्या वाट्याला आल. अनाथपणाचा शाप मिळालेल्या सिंधुताईंना एकटेपणाने जगण्याच बळही मिळाल असत. (Padma Shri Awardee Sindhutai Sapkal Passes Away) मात्र, एकटेपणासाठी नाही तर हे बळ हजारो अनाथांना सामावून घेणारं ठरलं. रक्ताच्या नात्यालाच आपेपणाची झालर असते हे कधीच खर नव्हत आणि ते खरही ठरणार नाही याची जाणिव करून दिली ती सिंधूताईंनी.

सिंधुताईंना (७४) वर्षांच आयुष्य मिळाल. या आयुष्याने स्वत्वाच्या सिमांना पार करून हजारो हातांना जगण्याचं बळ दिल ते मायेच्या निर्मात्या आई नावाच्या निर्मात्याने. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. जन्मताच नकोशी असलेली ही मुलगी. तीचं नकोशेपण इतक टोकाच होत की नकोशेपणाला ठळक करणार चिंधी हे नाव दिल गेल. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal Dies) पुढे त्या नावाने तीची ओळख बनली होती. मात्र, वेळ जितक हिसकावून घेते त्यापेक्षा कित्येकपट दुमच्या पदरात टाकते. फक्त तुमच्या पदराला आपलेपणासह वात्सल्याचं बळ असावं. हे बळ या बाईच्या नसानसात भिनल होत आणि त्याच मुळ फुलण्याच्या काळात आलेल्या निराधारपणात सामावलेलं होत. याच बळावर चिंधी या नावाला तिलांजली देत ही एकेकाळची निराधार बाई पुढे लाखो अनाथांची माय म्हणून सबंध भारत देशासमोर आदर्श म्हणून उभी राहिली.

मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकायची संधी मिळाली. पुढे वयाच्या नवव्या वर्षी विवाह नावाच्या बेड्या गळ्यात पडल्या. त्यावेळी २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी हा विवाह झाला. यानंतर 3 बाळंतपण झाली. मात्र, या सर्व काळात वैहाहिक जिवनाशी टोकाचा संघर्ष वाट्याला आला. सासू, नवऱ्याकडून होणारा जाच आयुष्य जगण्याच्या उमेदीपासून तोडणारा होता. हे रोजच जगण वाट्याला आल्याने शेवटी मनात आलेल्या निर्धाराला उमाळा आला आणि वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी समाजकारणाची वाट धरली. आपल्या वाट्याला आलेल्या दु;खाची वेदना उराशी बाळगून त्यावेळी गुरे राखणाऱ्या महिलांसाठी सिंधुताई उभ्या राहिल्या. या स्त्रीयांना काबाड कष्ट करावे लागायचे. मात्र, त्या बदल्यात त्यांना मजुरी मिळत नव्हती. या विरोधात सिंधुताई यांनी लढा उभारला आणि त्याला यशही आलं. त्याच यशाने पुढची वाट दाखवली जी अनाथांची माय म्हणून कोसो दूर जाते.

या कठोर आणि तितक्याच टोकाच्या संघर्षात अनेक मान-सन्मान, पुरस्कार मिळत गेले. जितकी माया पेरली त्याच्या कित्येकपट समाजाकडून मायेच दान मिळाल हे या आई नावाच्या वलयाखाली गोळा केलेल्या लेकरांमुळे! म्हणून पुरस्काराचं मोल लेकरांच्या मायेपेक्षा या आईला कधीच मोठ झाल नाही आणि ते होऊही दिल नाही. हे सगळ काही लेकरांसाठीच ही भावना शेवटपर्यंत उराशी बाळगली. नुकताच केंद्र सरकारकडून 'पद्मश्री' हा बहुमान मिळाला. तोही आपल्या लेकरांना अर्पण करत आपल्या जगण्याचं आणि कामाच मुळ आईने पुन्हा एकदा उलगडल होत.

"मला खरं वाटत नाही की, मला हा पुरस्कार मिळाला आहे. माझा खरा परिचय म्हणजे रेल्वेत भीक मागणारी बाई. रात्री भिकाऱ्यांना मी खाऊ घालायचे. मला गाणं म्हटलं की खाणं मिळायचं. रात्री मला भिती वाटायची कारण सगळे भिकारी झोपून जायचे. त्यामुळे मी स्मशानात जायचे. कारण मला माहिती होतं की मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही, रात्री भुताच्या भितीने कुणीच येत नाही. त्यामुळे स्मशानात अंधार, ओरडणारे पक्षी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजणारी मी. फार भयाण होतं ते. आता त्या कल्पनेनंही माझ्या अंगावर काटा येतो. माझ्याकडे काही मुलंच असता असं नाही. मुली असतात, विधवा असतात, परित्यक्ता असतात. मी शोधून आणते. माझं हे दु:खितांचं घर आहे. हे दु:ख असंच चालत राहिलं असतं. पण जगानं सढळ हातांनी मदत केली. म्हणून माझे लेकरं जिवंत राहिले. म्हणून त्या मदत देणाऱ्या हातांना मी हा पुरस्कार अर्पण करते. अशी भावना पुरस्कार मिळाला तेव्हा व्यक्त वक्त केली.

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार -

पद्मश्री पुरस्कार (२०२१), महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२), पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२), सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२), २००८ - दैनिक लोकसत्ताचा - 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'., प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

या अविरत चाललेल्या ममत्वाच्या कामाला अशा अनेक पुरस्कारांनी लढण्याच बळ दिल. याच बळावर सिंधुताईंनी कित्येक निराधारांना उभ केलं. हा (१४ नोव्हेंबर १९४७ ते 4 जानेवारी 2022) पर्यंतचा (74 वर्षांचा) प्रवास आता विसावला. मात्र, या प्रवासात पेरून ठेवलेल्या कित्येक हातांच्या बळावर हा आपुलकीचा, मायेचा, वात्सल्याचा, आपलेपणाचा, निराधाराच्या आधाराचा प्रवास सुरूच राहील हे या ममत्वाचं फलीत...

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना ईटीव्ही भारत परिवाराची भावपूर्ण आदरांजली...

मुंबई - प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, वात्सल्य, माया, ममता, आपलेपण, माणुसकी या सर्व गोष्टींचा संगम 'आई' या दोन शब्दांशी बांधला गेलाय. आईच्या मायेला पाझर फुटतो यापेक्षा आईच्या मायेचा पाझर कधीच आटत नाही हे या नात्याच मुळ. झाडाच्या मुळ्या अमर्याद वाढतात. मात्र, आई नावाच्या झाडाच्या मुळ्यांनी या मर्यादांनाही तिलांजली देत आपलं मुळ अगणित विस्तारलय. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal Passes Away) दगडासारखं गोठलेल्या बर्फाने पाण्यात वितळावं तस कमालिच्या निष्ठूर माणसाणं आईच्या कुशीत हळव व्हाव हे या ममत्वाच सामर्थ्य. आई नावच वलय सगळ्यांच्याच वाट्याला आलेलं असत. पण, सगळ्यांची मी आई आहे हे वात्सल्य फक्त आईच्या आपलेपणातच सामावलेलं असत. याचं आई नावाच्या नात्याला आणि त्यातील माणुकसीला महासागराच रुप देत कित्येंक निराधारांना आपल्या पदराला घेत त्यांच्यासाठी आपलं आयुष्य कडेला लावलं त्या सिंधूताई सपकाळ अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal) या त्यांच्या अनंताच्या प्रवासाला निघून जाण्याने पुन्हा एकदा कित्येकांच्या वाट्याला अनाथपण आलय.

आपल्या आयुष्याची झोळी वेदनांनी भरलेली असताना इतरांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं बळ या आई नावाच्या जिव्हाळ्यात सामावलेलं असतं. सगळ्यांच्या वाट्याला हे दु:ख येत नाही. (Anathanchi Maye Sindhutai Sapkal) आणि सगळ्यांच्याच वाट्याला दु:खाची फुलं करण्याचही सुख येत नाही. जे सिंधुताईंच्या वाट्याला आल. अनाथपणाचा शाप मिळालेल्या सिंधुताईंना एकटेपणाने जगण्याच बळही मिळाल असत. (Padma Shri Awardee Sindhutai Sapkal Passes Away) मात्र, एकटेपणासाठी नाही तर हे बळ हजारो अनाथांना सामावून घेणारं ठरलं. रक्ताच्या नात्यालाच आपेपणाची झालर असते हे कधीच खर नव्हत आणि ते खरही ठरणार नाही याची जाणिव करून दिली ती सिंधूताईंनी.

सिंधुताईंना (७४) वर्षांच आयुष्य मिळाल. या आयुष्याने स्वत्वाच्या सिमांना पार करून हजारो हातांना जगण्याचं बळ दिल ते मायेच्या निर्मात्या आई नावाच्या निर्मात्याने. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. जन्मताच नकोशी असलेली ही मुलगी. तीचं नकोशेपण इतक टोकाच होत की नकोशेपणाला ठळक करणार चिंधी हे नाव दिल गेल. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal Dies) पुढे त्या नावाने तीची ओळख बनली होती. मात्र, वेळ जितक हिसकावून घेते त्यापेक्षा कित्येकपट दुमच्या पदरात टाकते. फक्त तुमच्या पदराला आपलेपणासह वात्सल्याचं बळ असावं. हे बळ या बाईच्या नसानसात भिनल होत आणि त्याच मुळ फुलण्याच्या काळात आलेल्या निराधारपणात सामावलेलं होत. याच बळावर चिंधी या नावाला तिलांजली देत ही एकेकाळची निराधार बाई पुढे लाखो अनाथांची माय म्हणून सबंध भारत देशासमोर आदर्श म्हणून उभी राहिली.

मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकायची संधी मिळाली. पुढे वयाच्या नवव्या वर्षी विवाह नावाच्या बेड्या गळ्यात पडल्या. त्यावेळी २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी हा विवाह झाला. यानंतर 3 बाळंतपण झाली. मात्र, या सर्व काळात वैहाहिक जिवनाशी टोकाचा संघर्ष वाट्याला आला. सासू, नवऱ्याकडून होणारा जाच आयुष्य जगण्याच्या उमेदीपासून तोडणारा होता. हे रोजच जगण वाट्याला आल्याने शेवटी मनात आलेल्या निर्धाराला उमाळा आला आणि वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी समाजकारणाची वाट धरली. आपल्या वाट्याला आलेल्या दु;खाची वेदना उराशी बाळगून त्यावेळी गुरे राखणाऱ्या महिलांसाठी सिंधुताई उभ्या राहिल्या. या स्त्रीयांना काबाड कष्ट करावे लागायचे. मात्र, त्या बदल्यात त्यांना मजुरी मिळत नव्हती. या विरोधात सिंधुताई यांनी लढा उभारला आणि त्याला यशही आलं. त्याच यशाने पुढची वाट दाखवली जी अनाथांची माय म्हणून कोसो दूर जाते.

या कठोर आणि तितक्याच टोकाच्या संघर्षात अनेक मान-सन्मान, पुरस्कार मिळत गेले. जितकी माया पेरली त्याच्या कित्येकपट समाजाकडून मायेच दान मिळाल हे या आई नावाच्या वलयाखाली गोळा केलेल्या लेकरांमुळे! म्हणून पुरस्काराचं मोल लेकरांच्या मायेपेक्षा या आईला कधीच मोठ झाल नाही आणि ते होऊही दिल नाही. हे सगळ काही लेकरांसाठीच ही भावना शेवटपर्यंत उराशी बाळगली. नुकताच केंद्र सरकारकडून 'पद्मश्री' हा बहुमान मिळाला. तोही आपल्या लेकरांना अर्पण करत आपल्या जगण्याचं आणि कामाच मुळ आईने पुन्हा एकदा उलगडल होत.

"मला खरं वाटत नाही की, मला हा पुरस्कार मिळाला आहे. माझा खरा परिचय म्हणजे रेल्वेत भीक मागणारी बाई. रात्री भिकाऱ्यांना मी खाऊ घालायचे. मला गाणं म्हटलं की खाणं मिळायचं. रात्री मला भिती वाटायची कारण सगळे भिकारी झोपून जायचे. त्यामुळे मी स्मशानात जायचे. कारण मला माहिती होतं की मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही, रात्री भुताच्या भितीने कुणीच येत नाही. त्यामुळे स्मशानात अंधार, ओरडणारे पक्षी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजणारी मी. फार भयाण होतं ते. आता त्या कल्पनेनंही माझ्या अंगावर काटा येतो. माझ्याकडे काही मुलंच असता असं नाही. मुली असतात, विधवा असतात, परित्यक्ता असतात. मी शोधून आणते. माझं हे दु:खितांचं घर आहे. हे दु:ख असंच चालत राहिलं असतं. पण जगानं सढळ हातांनी मदत केली. म्हणून माझे लेकरं जिवंत राहिले. म्हणून त्या मदत देणाऱ्या हातांना मी हा पुरस्कार अर्पण करते. अशी भावना पुरस्कार मिळाला तेव्हा व्यक्त वक्त केली.

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार -

पद्मश्री पुरस्कार (२०२१), महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२), पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२), सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२), २००८ - दैनिक लोकसत्ताचा - 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'., प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

या अविरत चाललेल्या ममत्वाच्या कामाला अशा अनेक पुरस्कारांनी लढण्याच बळ दिल. याच बळावर सिंधुताईंनी कित्येक निराधारांना उभ केलं. हा (१४ नोव्हेंबर १९४७ ते 4 जानेवारी 2022) पर्यंतचा (74 वर्षांचा) प्रवास आता विसावला. मात्र, या प्रवासात पेरून ठेवलेल्या कित्येक हातांच्या बळावर हा आपुलकीचा, मायेचा, वात्सल्याचा, आपलेपणाचा, निराधाराच्या आधाराचा प्रवास सुरूच राहील हे या ममत्वाचं फलीत...

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना ईटीव्ही भारत परिवाराची भावपूर्ण आदरांजली...

Last Updated : Jan 5, 2022, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.