ETV Bharat / bharat

दिल्लीत किल्लाबंदी का केली जातेय? राहुल गांधींचा मोदींना सवाल

author img

By

Published : Feb 3, 2021, 3:58 PM IST

Updated : Feb 3, 2021, 5:04 PM IST

आज पत्रकार परिषद घेत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसेच अर्थसंकल्पावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली - आज शेतकरी आंदोलनाचा 70 वा दिवस आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली असून, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठ्या खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले आहेत. यावर आज पत्रकार परिषद घेत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसेच अर्थसंकल्पावरूनही सरकारला लक्ष्य केलं.

पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींची मोदींवर टीका

केंद्र सरकारकडून शेतकरी आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत किल्लाबंदी का केली जात आहे. सरकार शेतकऱ्यांना घाबरतं का, की शेतकरी देशाचे शत्रू आहेत, असा सवाल राहुल गांधींनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्ष कृषी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यासमोर अद्याप कायम आहे, असे मोदी म्हणतात. याचा अर्थ काय होतो. शेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. त्यांना घाबरवणं आणि मारणं सरकारचं काम नाही. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करणं गरजेचे आहे. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी आणि तोडगा काढावा, असे राहुल गांधी म्हणाले.

लडाखमध्ये सैन्य कठिण परिस्थितीमध्ये देशाची रक्षा करत आहे. मात्र, सरकारने अर्थसंकल्पात सैन्यांसाठी पुरेसा निधी दिला नाही. ही कोणती देशभक्ती आहे, असे राहुल म्हणाले. तसेच अर्थसंकल्पात लघू उद्योगांना निधी देऊन त्यांना वाचवणे गरजेचे होते. मात्र, सरकार देशातील नागरिकांचा पैसा त्यांच्या जवळच्या काही 10 ते 15 लोकांना देतं आहे, असे ते म्हणाले.

अप्रत्यक्षपणे मोदींचा हुकूमशहा असा उल्लेख -

डगमगलेली अर्थव्यवस्था, जीडीपी, चीन भारत वाद, शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत आहे. यातच त्यांनी एक टि्वट करून मोदींवर अप्रत्यक्षपणे टिका केली. इतक्या सगळ्या हुकूमशहाची नावे 'एम' ने का सुरू होतात? असा सवाल त्यांनी केला आहे. नाव घेता त्यांनी मोदींचा हुकूमशाह असा उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी एम नावाच्या काही हुकूमशहांची नावेही जाहीर केली.

नवी दिल्ली - आज शेतकरी आंदोलनाचा 70 वा दिवस आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर दिल्ली पोलिसांनी सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली असून, काँक्रीटमध्ये रुतलेल्या मोठ्या खिळ्यांचे तीन-चार पदरी अडथळे तयार केले आहेत. यावर आज पत्रकार परिषद घेत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. तसेच अर्थसंकल्पावरूनही सरकारला लक्ष्य केलं.

पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींची मोदींवर टीका

केंद्र सरकारकडून शेतकरी आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत किल्लाबंदी का केली जात आहे. सरकार शेतकऱ्यांना घाबरतं का, की शेतकरी देशाचे शत्रू आहेत, असा सवाल राहुल गांधींनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्ष कृषी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यासमोर अद्याप कायम आहे, असे मोदी म्हणतात. याचा अर्थ काय होतो. शेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. त्यांना घाबरवणं आणि मारणं सरकारचं काम नाही. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करणं गरजेचे आहे. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी आणि तोडगा काढावा, असे राहुल गांधी म्हणाले.

लडाखमध्ये सैन्य कठिण परिस्थितीमध्ये देशाची रक्षा करत आहे. मात्र, सरकारने अर्थसंकल्पात सैन्यांसाठी पुरेसा निधी दिला नाही. ही कोणती देशभक्ती आहे, असे राहुल म्हणाले. तसेच अर्थसंकल्पात लघू उद्योगांना निधी देऊन त्यांना वाचवणे गरजेचे होते. मात्र, सरकार देशातील नागरिकांचा पैसा त्यांच्या जवळच्या काही 10 ते 15 लोकांना देतं आहे, असे ते म्हणाले.

अप्रत्यक्षपणे मोदींचा हुकूमशहा असा उल्लेख -

डगमगलेली अर्थव्यवस्था, जीडीपी, चीन भारत वाद, शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत आहे. यातच त्यांनी एक टि्वट करून मोदींवर अप्रत्यक्षपणे टिका केली. इतक्या सगळ्या हुकूमशहाची नावे 'एम' ने का सुरू होतात? असा सवाल त्यांनी केला आहे. नाव घेता त्यांनी मोदींचा हुकूमशाह असा उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी एम नावाच्या काही हुकूमशहांची नावेही जाहीर केली.

Last Updated : Feb 3, 2021, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.