ETV Bharat / bharat

अग्निपथ'विरोधात देशभर आंदोलन! सिकंदराबादमध्ये गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू

author img

By

Published : Jun 17, 2022, 10:41 PM IST

अग्निपथ या योजनेविरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. बऱ्याच ठिकणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आज सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आंदोलनादम्यान पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये दामोदर राकेश (वय २३) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

दामोदर राकेश (वय २३)
दामोदर राकेश (वय २३)

वारंगल (तेलंगणा) - सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दामोदर राकेश (वय २३) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. कुमारस्वामी आणि पूलम्मा असे राकेशच्या आईव-डीलांचे नाव असून तो वारंगल जिल्ह्यातील खानापूरम मंडलातील डबीर पेटा गावातील रहीवाशी होता.

हनुमाकोंडा शहरातील एका महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या राकेशने सहा महिन्यांपूर्वी सैन्य भरतीत शारीरिक चाचणी उत्तीर्ण केली होती. तो लेखी परीक्षेची तयारी करत होता. आर्मी ऑफिसमध्ये काही काम असल्याचे आई-वडिलांना सांगून गुरुवारी संध्याकाळी राकेश हैदराबादला आल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

राकेश, ज्याचे घर हैदराबादपासून सुमारे (150) किलोमीटर अंतरावर आहे. त्याला सोशल मीडिया ग्रुप्सवरून समजले की काही तरुण आंदोलन करण्याचा विचार करत आहेत म्हणून तो गुरुवारी संध्याकाळी सिकंदराबादला आला. रात्रभर थांबला. सकाळी ते सैन्य भरती मंडळात गेले पण तेथे कोणतेही प्रात्यक्षिक न झाल्याने तो पुन्हा सिकंदराबाद स्टेशनवर आले आणि आंदोलनात सहभागी झाला. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळन लागले. त्याचवेळी गोळीबार झाला अन् त्यामध्ये राकेशचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Rajiv Gandhi Assassination Case: मद्रास हायकोर्टाने नलिनी अन् रविचंद्रन यांच्या रिट याचिका फेटाळल्या

वारंगल (तेलंगणा) - सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दामोदर राकेश (वय २३) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. कुमारस्वामी आणि पूलम्मा असे राकेशच्या आईव-डीलांचे नाव असून तो वारंगल जिल्ह्यातील खानापूरम मंडलातील डबीर पेटा गावातील रहीवाशी होता.

हनुमाकोंडा शहरातील एका महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या राकेशने सहा महिन्यांपूर्वी सैन्य भरतीत शारीरिक चाचणी उत्तीर्ण केली होती. तो लेखी परीक्षेची तयारी करत होता. आर्मी ऑफिसमध्ये काही काम असल्याचे आई-वडिलांना सांगून गुरुवारी संध्याकाळी राकेश हैदराबादला आल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

राकेश, ज्याचे घर हैदराबादपासून सुमारे (150) किलोमीटर अंतरावर आहे. त्याला सोशल मीडिया ग्रुप्सवरून समजले की काही तरुण आंदोलन करण्याचा विचार करत आहेत म्हणून तो गुरुवारी संध्याकाळी सिकंदराबादला आला. रात्रभर थांबला. सकाळी ते सैन्य भरती मंडळात गेले पण तेथे कोणतेही प्रात्यक्षिक न झाल्याने तो पुन्हा सिकंदराबाद स्टेशनवर आले आणि आंदोलनात सहभागी झाला. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळन लागले. त्याचवेळी गोळीबार झाला अन् त्यामध्ये राकेशचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Rajiv Gandhi Assassination Case: मद्रास हायकोर्टाने नलिनी अन् रविचंद्रन यांच्या रिट याचिका फेटाळल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.