ETV Bharat / bharat

Monsoon Session 2023 : पालघर साधू हत्याकांडावर उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकले नाही, अनुराग ठाकूर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

author img

By

Published : Jul 24, 2023, 1:09 PM IST

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधक संसदेच्या कामकाजापासून पळ काढत असल्याची टीका अनुराग ठाकूर यांनी केली. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पालघर साधू हत्याकांडावर प्रतिक्रिया दिली नव्हती, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

Monsoon Session 2023
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

नवी दिल्ली : मणिपूर घटनेवरुन विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ सुरू केला आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी केली आहे. मात्र भाजपने विरोधकांवर सडकून टीका केली आहे. पालघर साधू हत्याकांडावर उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकले नाहीत, चर्चेलाही ते तयार नव्हते. मात्र आता विरोधक मणिपूर प्रकरणावरुन संसदेच्या कामकाजापासून पळ काढत असल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चा टाळत आहेत. त्यांची काय मजबुरी आहे, असा सवालही मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी केला आहे.

उद्धव ठाकरेंवर पालघर प्रकरणावरुन हल्लाबोल : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चांगलाच हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूंच्या निर्घृण हत्येचे उत्तर देऊ शकले नाहीत. उद्धव ठाकरे हे चर्चेलाही तयार नव्हते. मात्र आता मणिपूर प्रकरणावरुन विरोधक गदारोळ करत आहेत. अनुराग ठाकूर यांनी पालघर साधू हत्याकांड प्रकरण उकरुन काढत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने आता याप्रकरणी पुन्हा वाद ओढवण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैला मणिपूर हिंसाचाराच्या गदारोळात सुरू झाले आहे. विरोधकांनी मणिपूर प्रकरणावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधक संसदेच्या कामकाजापासून पळ काढत असल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. मात्र विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी लावून धरली आहे.

  • #WATCH | Mumbai, Maharashtra: Union Minister Anurag Thakur on incidents of crime against women across the country says, "...One should not do politics on such incidents...doing politics on such incidents is saddening whether it is Manipur, Bengal, Rajasthan & Bihar...Why should… pic.twitter.com/dKkpIjMHDq

    — ANI (@ANI) July 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मणिपूर प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक : मणिपूर पोलिसांनी शनिवारी मणिपूर महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केली आहे. 4 मे 2023 रोजी घडलेल्या या घटनेत आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भाजप खासदाराने शनिवारी पश्चिम बंगालच्या मालदा येथील एक क्लिप देखील शेअर केली आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics: अनुराग ठाकूर यांचा ६ महिन्यात दुसरा मुंबई दौरा; शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
  2. Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर प्रकरणावर पुन्हा गदारोळ; पंतप्रधानांनी निवेदन करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक तर भाजपने केला 'हा' आरोप

नवी दिल्ली : मणिपूर घटनेवरुन विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ सुरू केला आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी केली आहे. मात्र भाजपने विरोधकांवर सडकून टीका केली आहे. पालघर साधू हत्याकांडावर उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकले नाहीत, चर्चेलाही ते तयार नव्हते. मात्र आता विरोधक मणिपूर प्रकरणावरुन संसदेच्या कामकाजापासून पळ काढत असल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चा टाळत आहेत. त्यांची काय मजबुरी आहे, असा सवालही मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी केला आहे.

उद्धव ठाकरेंवर पालघर प्रकरणावरुन हल्लाबोल : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चांगलाच हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूंच्या निर्घृण हत्येचे उत्तर देऊ शकले नाहीत. उद्धव ठाकरे हे चर्चेलाही तयार नव्हते. मात्र आता मणिपूर प्रकरणावरुन विरोधक गदारोळ करत आहेत. अनुराग ठाकूर यांनी पालघर साधू हत्याकांड प्रकरण उकरुन काढत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने आता याप्रकरणी पुन्हा वाद ओढवण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैला मणिपूर हिंसाचाराच्या गदारोळात सुरू झाले आहे. विरोधकांनी मणिपूर प्रकरणावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधक संसदेच्या कामकाजापासून पळ काढत असल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. मात्र विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी लावून धरली आहे.

  • #WATCH | Mumbai, Maharashtra: Union Minister Anurag Thakur on incidents of crime against women across the country says, "...One should not do politics on such incidents...doing politics on such incidents is saddening whether it is Manipur, Bengal, Rajasthan & Bihar...Why should… pic.twitter.com/dKkpIjMHDq

    — ANI (@ANI) July 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मणिपूर प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक : मणिपूर पोलिसांनी शनिवारी मणिपूर महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केली आहे. 4 मे 2023 रोजी घडलेल्या या घटनेत आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भाजप खासदाराने शनिवारी पश्चिम बंगालच्या मालदा येथील एक क्लिप देखील शेअर केली आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics: अनुराग ठाकूर यांचा ६ महिन्यात दुसरा मुंबई दौरा; शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
  2. Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर प्रकरणावर पुन्हा गदारोळ; पंतप्रधानांनी निवेदन करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक तर भाजपने केला 'हा' आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.